शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सरकारचे अपयश लपविण्यासाठी नागपुरात धार्मिक भावना भडकविली काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:11 IST

काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा अहवाल सादर : समितीने अहवालात काय म्हटले ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरातील दंगलप्रकरणी प्रदेश काँग्रेसने स्थापन केलेल्या सत्यशोधन समितीने आपला अहवाल बुधवारी प्रदेश काँग्रेसला दिला. मुस्लिम धर्मीयांना उद्रेकित करण्याच्या हेतूनेच धार्मिक भावना भडकविण्यात आली. राज्य सरकारच्या इशाऱ्यावरून विहिंप, बजरंग दल व भाजपने पूर्वनियोजित पद्धतीने हे घडवून आणले, असा आरोपवजा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली होती. ठाकरे यांच्यासह माजी खासदार हुसैन दलवाई यांनी दंगलग्रस्त भागातील नागरिकांशी चर्चा केली. यानंतर सत्यशोधन समितीने बुधवारी प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल सादर केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत विश्व हिंदू परिषद व बजरंग या संघटनांना पुढे करून आंदोलन पेटविण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामागे दोन धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी, धार्मिक ध्रुवीकरण व्हावे, असा हेतू होता, असा आरोप समितीने अहवालात केला आहे.

औरंगजेबाची कबर ३०० वर्षापेक्षा अधिक काळापासून या राज्यात आहे. या आधी कधीही हा मुद्दा नव्हता. मात्र, सरकारचे अपयश झाकण्यासाठी हा मुद्दा उकरून काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्ये सरकारमधील मंत्रीच करीत होते. पण त्यावर काहीच कारवाई होत नव्हती. मुस्लिमविरोधी ध्रुवीकरण करण्याच्या हेतूने हे सर्व केले जात होते. राहुल सोलापूरकर व प्रशांत कोरटकर या संघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याने राज्यभर पडसाद उमटले. यावरून लक्ष वळविण्यासाठी औरंगजेबाविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली. मात्र, या आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर थेट मुस्लिम समाजाच्या आस्थेवरच हल्ला करण्यात आला, असा आरोपही अहवालात करण्यात आला आहे.

समितीने अहवालात काय म्हटले ?समितीने आपल्या अहवालात काँग्रेस पदाधिकारी ओ. एस. कादरी, अतुल लोंढे, जुल्फिकार अहमद भुट्टो, नितीन कुंभलकर, डॉ. अन्वर सिद्धीकी, कमलेश समर्थ, डॉ. मोहम्मद ओवेस हसन यांचे म्हणणे अहवालात नमूद केले आहे. दंगलीत दगडफेक करणारे युवक हे भालदारपुरा, महाल या भागातील नव्हते. विहिंप, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी सौम्य स्वरूपाची कलमे लावण्यात आली. सत्यशोधन समितीला दंगलग्रस्त भागात भेट देण्याची परवानगी पोलिस आयुक्तांनी नाकारली.

उत्तर प्रदेश व गुजरातचा प्रयोगया घटनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, गुजरातच्या धर्तीवर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या माध्यमातून सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न झाला, असेही समितीने अहवालात नमूद केले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूर