शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नागपुरात  भाजपाची तिरंगा यात्रा तर काँग्रेसची संविधान रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 23:02 IST

गणराज्यदिनी भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. भाजपाने तिरंगा यात्रा काढत संविधानाला कुणीही बदलू शकत नसल्याचे सांगत काही घटक समाजात फूट पाडण्यासाठी अशा अफवा पसरवीत असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने संविधान बचाव रॅली काढत संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

ठळक मुद्देगणराज्यदिनी राजकीय जुगलबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणराज्यदिनी भाजपा व काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये राजकीय जुगलबंदी रंगल्याची पाहायला मिळाली. भाजपाने तिरंगा यात्रा काढत संविधानाला कुणीही बदलू शकत नसल्याचे सांगत काही घटक समाजात फूट पाडण्यासाठी अशा अफवा पसरवीत असल्याचा आरोप केला. तर काँग्रेसने संविधान बचाव रॅली काढत संविधान बदलण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरोधात लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.भाजपातर्फे सकाळी १० वाजता टिळक पुतळा चौकापासून ते संविधान चौकापर्यंत तिरंगा यात्रा काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, राज्यमंत्री सुधाकर देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, डॉ. उपेंद्र कोठेकर, शिवानी दाणी, संजय फांजे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ५०० फुटांचा तिरंगा लहरवीत आग्याराम देवी मंदिर, कॉटन मार्केट, व्हेरायटी चौक, झिरो माईल्समार्गे संविधान चौकात पोहोचले. येथे डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.यावेळी कोहळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. आज तिरंगा हा राष्ट्रध्वज आपल्या देशाची आन, बान व शान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशाला दिशा मिळाली आहे. हे संविधान कुणीही तोडू शकत नाही. मात्र, सत्तेची लालसा असलेले काही घटक काही सामाजाकि तत्त्वांशी हातमिळवणी करून अफवा पसरवीत आहेत. समाज तोडण्याचे काम करीत आहेत. भाजपाने सदैव एकता व अखंडतेचा पुरस्कार केला आहे. समाज जोडण्याचे काम केले आहे, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी जमाल सिद्दीकी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सुधीर हिरडे, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, भोजराज डुंबे, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, कीर्तिदा अजमेरा, बंडू राऊत, किशन गावंडे, अब्दुल कदीर, नरेश जुमानी, वंदना यंगटवार, किशोर पलांदूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसतर्फे संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. माजी मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते ‘संविधान बचाव’चे फलक घेऊन नारे देत व्हेरायटी चौकात पोहोचले. येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, काँग्रेसने नेहमी संविधानाचे पालन व संरक्षण केले आहे. काही घटक संविधान बदलण्याचा व लोकशाही संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, काँग्रेस संविधानाच्या रक्षणासाठी आपला लढा अधिक तीव्र करेल, असा इशारा त्यांनी दिला.रॅलीमध्ये माजी आ. एस.क्यू. जमा, सुरेश भोयर, जयंत लुटे, बंडोपंत टेंभूर्णे, संदेश सिंगलकर, रमण पैगवार, रत्नाकर जयपूरकर, संजय महाकाळकर, प्रशांत धवड, वासुदेव ढोके, रामगोविंद खोब्रागडे, प्रज्ञा बडवाईक, डॉ. रिचा जैन, इर्शाद अली, अतिक कुरेशी, महेश श्रीवास, अजय नासरे, अ‍ॅड. अक्षय समर्थ, मुक्तार अन्सारी, पंकज निघोट, रेखा बाराहाते, अंबादास गोंडाणे, अब्दुल शकील, संजय सरायकर, राजेश कुंभलकर, रवी गाडगे, मोंटी गडेचा, हाजी समीर, रिंकू जैन, विवेक निकोसे, दिनेश वाघमारे, आकाश तायवाडे, वैभव काळे, डॉ. प्रकाश ढगे आदींनी भाग घेतला.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस