शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सैनिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस राबविणार ‘जय जवान’ अभियान; मार्चमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ५० किमी न्याय यात्रा

By कमलेश वानखेडे | Updated: February 8, 2024 18:58 IST

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्री पद्धतीने नियुक्ती केली जाते.

नागपूर: केंद्र सरकारने अग्नीपथ योजना आणली. मात्र ही योजना लागू करण्यापूर्वी सैन्याचत नियमित भरतीसाठी शारिरीक चाचणी उत्तीर्ण केलेल्या सुमारे दीड लाख युवकांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या युवकांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे देशभरात ‘जय जवान’ अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. विनित पुनिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाते. मात्र, चार वर्षानंतर काय या चिंतेने युवक तनमनाने ही सेवा करतील, यात शंका आहे. अग्नीवीर शहीद झाले तर त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही. सैनिकाला निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन यांना लागू नाही. ही योजना सैन्य विरोधी आहे. माजी सैनिकही या योजनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच सैन्याची भरती व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जय जवान’ अभियानांतर्गत फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ते ‘ न्याय पत्र’ घेऊन ३० लाख कुटुंबांशी संपर्क साधतील. यानंतर ५ ते १० मार्च दरम्यान प्रत्येक शहरातील शहीद चौकात धरणे दिले जातील. १७ ते २० मार्च दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘न्याय यात्रा’ काढली जाईल व या अंतर्गत ५० किलोमीटर पदयात्रा केली जाईल. बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस ही लढाई लढत असल्याचे डॉ. पुनिया यांनी सांगितले. ‘न्याय पत्र’चे प्रकाशन‘जय जवान’ अभियानांतर्गत ३० लाख कुटुंना वितरित करण्यात येणाऱ्या ‘न्याय पत्र’चे यावेळी डॉ. विनित पुनिया यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, नंदा पराते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस