शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सैनिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस राबविणार ‘जय जवान’ अभियान; मार्चमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ५० किमी न्याय यात्रा

By कमलेश वानखेडे | Updated: February 8, 2024 18:58 IST

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्री पद्धतीने नियुक्ती केली जाते.

नागपूर: केंद्र सरकारने अग्नीपथ योजना आणली. मात्र ही योजना लागू करण्यापूर्वी सैन्याचत नियमित भरतीसाठी शारिरीक चाचणी उत्तीर्ण केलेल्या सुमारे दीड लाख युवकांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या युवकांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे देशभरात ‘जय जवान’ अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. विनित पुनिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाते. मात्र, चार वर्षानंतर काय या चिंतेने युवक तनमनाने ही सेवा करतील, यात शंका आहे. अग्नीवीर शहीद झाले तर त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही. सैनिकाला निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन यांना लागू नाही. ही योजना सैन्य विरोधी आहे. माजी सैनिकही या योजनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच सैन्याची भरती व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जय जवान’ अभियानांतर्गत फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ते ‘ न्याय पत्र’ घेऊन ३० लाख कुटुंबांशी संपर्क साधतील. यानंतर ५ ते १० मार्च दरम्यान प्रत्येक शहरातील शहीद चौकात धरणे दिले जातील. १७ ते २० मार्च दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘न्याय यात्रा’ काढली जाईल व या अंतर्गत ५० किलोमीटर पदयात्रा केली जाईल. बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस ही लढाई लढत असल्याचे डॉ. पुनिया यांनी सांगितले. ‘न्याय पत्र’चे प्रकाशन‘जय जवान’ अभियानांतर्गत ३० लाख कुटुंना वितरित करण्यात येणाऱ्या ‘न्याय पत्र’चे यावेळी डॉ. विनित पुनिया यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, नंदा पराते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस