शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

सैनिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस राबविणार ‘जय जवान’ अभियान; मार्चमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ५० किमी न्याय यात्रा

By कमलेश वानखेडे | Updated: February 8, 2024 18:58 IST

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्री पद्धतीने नियुक्ती केली जाते.

नागपूर: केंद्र सरकारने अग्नीपथ योजना आणली. मात्र ही योजना लागू करण्यापूर्वी सैन्याचत नियमित भरतीसाठी शारिरीक चाचणी उत्तीर्ण केलेल्या सुमारे दीड लाख युवकांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. या युवकांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसतर्फे देशभरात ‘जय जवान’ अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अ.भा. काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. विनित पुनिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाते. मात्र, चार वर्षानंतर काय या चिंतेने युवक तनमनाने ही सेवा करतील, यात शंका आहे. अग्नीवीर शहीद झाले तर त्यांना शहीदाचा दर्जा मिळत नाही. सैनिकाला निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन यांना लागू नाही. ही योजना सैन्य विरोधी आहे. माजी सैनिकही या योजनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीनेच सैन्याची भरती व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जय जवान’ अभियानांतर्गत फेब्रुवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ते ‘ न्याय पत्र’ घेऊन ३० लाख कुटुंबांशी संपर्क साधतील. यानंतर ५ ते १० मार्च दरम्यान प्रत्येक शहरातील शहीद चौकात धरणे दिले जातील. १७ ते २० मार्च दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात ‘न्याय यात्रा’ काढली जाईल व या अंतर्गत ५० किलोमीटर पदयात्रा केली जाईल. बेरोजगार युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस ही लढाई लढत असल्याचे डॉ. पुनिया यांनी सांगितले. ‘न्याय पत्र’चे प्रकाशन‘जय जवान’ अभियानांतर्गत ३० लाख कुटुंना वितरित करण्यात येणाऱ्या ‘न्याय पत्र’चे यावेळी डॉ. विनित पुनिया यांच्यासह काँग्रेसचे नागपूर शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, अतुल कोटेचा, कमलेश समर्थ, प्रशांत धवड, नंदा पराते यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :nagpurनागपूरcongressकाँग्रेस