शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

हिंमत असेल तर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे : अनुराग ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:38 IST

सोनिया आणि राहुल गांधींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.

ठळक मुद्दे‘सीएए’संदर्भात कॉंग्रेस व विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन कॉंग्रेससह विरोधी पक्ष देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात हा कायदा कुणाचे नागरिकत्व हिरावणारा नसून नागरिकत्व देणारा आहे. संसदेने याला मान्यता दिली असून संवैधानिकरित्या तो मजबूत आहे. कॉंग्रेस या कायद्यासह ‘एनआरसी’ व ‘एनपीआर’ यांची सरमिसळ करुन उगाच संभ्रम निर्माण करत आहे. सोनिया आणि राहुल गांधींनी या कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून अन्यायाला कंटाळून भारतात आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्त्व मिळणार आहे. या शरणार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुसूचित जातीच्या लोकांचादेखील समावेश आहे. असे असताना सोनिया, काँग्रेस या कायद्याला जाणुनबुजून विरोध करत आहे का, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला.सोनियांना भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यावर कुणीच त्याला विरोध दर्शवला नव्हता. मग काँग्रेस इतरांच्या नागरिकत्त्वाला विरोध का दर्शवत आहे. भारताचे सर्व नागरिक समान असून हा देश आणि केंद्र सरकार संविधानावर चालते. आमचे सरकार किंवा कुठलाही कायदा मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही. मुस्लीम समाजानेदेखील हा कायदा समजून घ्यावा, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले. नागपूर पत्रकार क्लब येथे झालेल्या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.विकास कुंभारे, महापौर संदीप जोशी, डॉ.राजीव पोतदार, अर्चना डेहनकर, संदीप जाधव, चंदन गोस्वामी, शिवानी दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केलेशरणार्थ्यांना नागरिकत्व मिळावे ही महात्मा गांधी यांची इच्छा होती. आमच्या सरकारने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. परंतु व्होटबँकेच्या राजकारणासाठी कॉंग्रेस आकांडतांडव करत आहे. कॉंग्रेसचे लोक संसदेत तर येत नाही, परंतु बाहेर चुकीचे वक्तव्य करुन लोकांमध्ये भिती निर्माण करत आहेत.उद्धव ठाकरेंवर टीकास्त्रयावेळी अनुराग ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. ‘जीएसटी’च्या परताव्यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांचे मंत्रीदेखील उपस्थित होते. त्यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यावी व मग टीका करावी. परंतु त्यांच्याकडे नवीन जबाबदारी आहे व कधी नाही ते पद आले आहे. त्यामुळे ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या शब्दांत ठाकूर यांनी ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या ठाकरेंसह, ममता बॅनर्जी, कॉंग्रेस यांचे कुटुंब पाकिस्तानात असते व त्यांच्या कुटुंबातील महिलांवर अत्याचार झाले असते तर त्यांनी काय केले असते याचा विचार करावा, असेदेखील ते म्हणाले. अफगाणिस्तान, पाकमधील हिंदू लोकांवर अन्याय होत असताना शिवसेना मूकदर्शक का बनली आहे, असा सवालदेखील त्यांनी केला.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेसMediaमाध्यमे