शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जावे : अनुराग ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:38 IST

सोनिया आणि राहुल गांधींनी नागरिकत्व सुधारणा कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले.

ठळक मुद्दे‘सीएए’संदर्भात कॉंग्रेस व विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन कॉंग्रेससह विरोधी पक्ष देशातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात हा कायदा कुणाचे नागरिकत्व हिरावणारा नसून नागरिकत्व देणारा आहे. संसदेने याला मान्यता दिली असून संवैधानिकरित्या तो मजबूत आहे. कॉंग्रेस या कायद्यासह ‘एनआरसी’ व ‘एनपीआर’ यांची सरमिसळ करुन उगाच संभ्रम निर्माण करत आहे. सोनिया आणि राहुल गांधींनी या कायद्यातील एकही चुकीचा शब्द दाखवून द्यावा. तसेच जर हिंमत असेल कॉंग्रेसने याविरोधात न्यायालयात जावे असे आव्हान केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिले. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून अन्यायाला कंटाळून भारतात आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्त्व मिळणार आहे. या शरणार्थ्यांमध्ये मोठ्या संख्येने अनुसूचित जातीच्या लोकांचादेखील समावेश आहे. असे असताना सोनिया, काँग्रेस या कायद्याला जाणुनबुजून विरोध करत आहे का, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला.सोनियांना भारतीय नागरिकत्त्व मिळाल्यावर कुणीच त्याला विरोध दर्शवला नव्हता. मग काँग्रेस इतरांच्या नागरिकत्त्वाला विरोध का दर्शवत आहे. भारताचे सर्व नागरिक समान असून हा देश आणि केंद्र सरकार संविधानावर चालते. आमचे सरकार किंवा कुठलाही कायदा मुस्लीम समाजाच्या विरोधात नाही. मुस्लीम समाजानेदेखील हा कायदा समजून घ्यावा, असे प्रतिपादन अनुराग ठाकूर यांनी केले. नागपूर पत्रकार क्लब येथे झालेल्या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.विकास कुंभारे, महापौर संदीप जोशी, डॉ.राजीव पोतदार, अर्चना डेहनकर, संदीप जाधव, चंदन गोस्वामी, शिवानी दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण केलेशरणार्थ्यांना नागरिकत्व मिळावे ही महात्मा गांधी यांची इच्छा होती. आमच्या सरकारने त्यांची इच्छा पूर्ण केली आहे. परंतु व्होटबँकेच्या राजकारणासाठी कॉंग्रेस आकांडतांडव करत आहे. कॉंग्रेसचे लोक संसदेत तर येत नाही, परंतु बाहेर चुकीचे वक्तव्य करुन लोकांमध्ये भिती निर्माण करत आहेत.उद्धव ठाकरेंवर टीकास्त्रयावेळी अनुराग ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीकास्त्र सोडले. ‘जीएसटी’च्या परताव्यासंदर्भात झालेल्या बैठकीत त्यांचे मंत्रीदेखील उपस्थित होते. त्यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यावी व मग टीका करावी. परंतु त्यांच्याकडे नवीन जबाबदारी आहे व कधी नाही ते पद आले आहे. त्यामुळे ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना’ या शब्दांत ठाकूर यांनी ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले. नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करणाऱ्या ठाकरेंसह, ममता बॅनर्जी, कॉंग्रेस यांचे कुटुंब पाकिस्तानात असते व त्यांच्या कुटुंबातील महिलांवर अत्याचार झाले असते तर त्यांनी काय केले असते याचा विचार करावा, असेदेखील ते म्हणाले. अफगाणिस्तान, पाकमधील हिंदू लोकांवर अन्याय होत असताना शिवसेना मूकदर्शक का बनली आहे, असा सवालदेखील त्यांनी केला.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेसMediaमाध्यमे