शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

'देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेस जबाबदार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 15:57 IST

भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नागपूर : फक्त काँग्रेसमुळे देशात गरिबी असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काही फायदा नाही असेही ते म्हणाले.

आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्यावरून राज्यभरात टीका करण्यात आली. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, पंतप्रधान मोदी जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यांनी त्या वेळच्या परिस्थितीला धरून आपली प्रतिक्रिया दिली होती, असे म्हणत आठवलेंनी मोंदीना पाठिंबा दर्शविला.

शिवसेना वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे. अडीच-अडीच वर्षांचा जो फार्मूला ठरला होता त्यानुसार अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

पाचही राज्यात भाजप एनडीएचे सरकार येणार

पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांसाठी मोदी यांनी मोठे मन  करून कायदे मागे घेतले. यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांचा भाजपला आता पाठिंबा असून भाजपला नाकारता येत नाही. तर, उत्तर प्रदेशमध्येही भाजपने चांगल काम केलं आहे. उत्तर प्रदेशात फक्त मायावती एकट्याच नाहीत, आरपीआयला लोकांचा पाठिंबा आहे. भाजपला आमचा पाठिंबा असून उत्तर प्रदेशात भाजपला जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले