शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

'देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेस जबाबदार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 15:57 IST

भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नागपूर : फक्त काँग्रेसमुळे देशात गरिबी असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काही फायदा नाही असेही ते म्हणाले.

आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्यावरून राज्यभरात टीका करण्यात आली. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, पंतप्रधान मोदी जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यांनी त्या वेळच्या परिस्थितीला धरून आपली प्रतिक्रिया दिली होती, असे म्हणत आठवलेंनी मोंदीना पाठिंबा दर्शविला.

शिवसेना वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे. अडीच-अडीच वर्षांचा जो फार्मूला ठरला होता त्यानुसार अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

पाचही राज्यात भाजप एनडीएचे सरकार येणार

पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांसाठी मोदी यांनी मोठे मन  करून कायदे मागे घेतले. यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांचा भाजपला आता पाठिंबा असून भाजपला नाकारता येत नाही. तर, उत्तर प्रदेशमध्येही भाजपने चांगल काम केलं आहे. उत्तर प्रदेशात फक्त मायावती एकट्याच नाहीत, आरपीआयला लोकांचा पाठिंबा आहे. भाजपला आमचा पाठिंबा असून उत्तर प्रदेशात भाजपला जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले