शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

'देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेस जबाबदार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 15:57 IST

भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली.

नागपूर : फक्त काँग्रेसमुळे देशात गरिबी असल्याची टीका केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. गरीबी हटाव असा नारा इंदिरा गांधीनी दिला होता, पण त्या नाऱ्याचा काही फायदा नाही असेही ते म्हणाले.

आज ते नागपुरात आले असता माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील गरिबी, जातीयवाद, बेरोजगारीसाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचे म्हटले. तर, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत काँग्रेसचा इतिहास मांडला. भाजपने अनेक योजना केल्या होत्या. त्याचा फायदा अनेक लोकांना मिळाला. चांगले काम केले असते तर नरेंद्र मोदी सत्ते वर आले नसते,  असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली. त्यावरून राज्यभरात टीका करण्यात आली. याबाबत बोलताना आठवले म्हणाले, पंतप्रधान मोदी जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. त्यांनी त्या वेळच्या परिस्थितीला धरून आपली प्रतिक्रिया दिली होती, असे म्हणत आठवलेंनी मोंदीना पाठिंबा दर्शविला.

शिवसेना वाचवायची असेल तर उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावे. अडीच-अडीच वर्षांचा जो फार्मूला ठरला होता त्यानुसार अडीच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

पाचही राज्यात भाजप एनडीएचे सरकार येणार

पाचही राज्यात भाजपला सत्ता मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. पंजाबमध्ये शेतकऱ्यांसाठी मोदी यांनी मोठे मन  करून कायदे मागे घेतले. यामुळे पंजाबच्या शेतकऱ्यांचा भाजपला आता पाठिंबा असून भाजपला नाकारता येत नाही. तर, उत्तर प्रदेशमध्येही भाजपने चांगल काम केलं आहे. उत्तर प्रदेशात फक्त मायावती एकट्याच नाहीत, आरपीआयला लोकांचा पाठिंबा आहे. भाजपला आमचा पाठिंबा असून उत्तर प्रदेशात भाजपला जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपाRamdas Athawaleरामदास आठवले