शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

By कमलेश वानखेडे | Updated: July 7, 2024 20:59 IST

"लोकसभेत उद्धव ठाकरेंपेक्षा आमचा स्ट्राईक रेट जास्त."

नागपूर: कट, कमिशन व करप्शन ही काँग्रेसची त्रिसूत्री आहे. २०२४ मध्ये जंग जंग पछाडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभव करू शकले नाही. घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

मुख्यमंत्री शिंदे नागपुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळा टू जी स्कॅम नॅशनल हेरॉल्ड, यासारखे अनेक घोटाळे झाले आहे. घोटाळ्यांची मालिका इतकी मोठी होती की २०१४ व २०१९ मध्ये जनतेने काँग्रेसला घरी बसवले. लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिले की उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आम्हाला जास्त मते मिळाली. आम्हाला १९ टक्के मते, तर ठाकरे यांना १४ टक्के मते मिळाली आहेत. लोकांनी आता यावर शिक्कामोर्तब केले आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडल्याने लोकांनी आमच्या बाजूने मतदान केले.

आम्ही १३ जागांवर लढलो, सात जिंकलो. त्यांच्यापेक्षा दोन लाख मत आम्ही जास्त घेतले. उद्धव ठाकरेचा सेनेचा ४२ टक्के स्ट्राईक रेट होता. तर आमच्या ४७ टक्के स्ट्राइक रेट आहे. आता रडणं बंद करा. शिवसेनेचा मूळ मतदार हा धनुष्यबाणासोबत आहे. याची प्रचिती विधानसभेत येईल. बाळासाहेबांचे विचार सोडून तुम्ही काय चुकी केली, अभद्र युती केली याचा परिणाम विधानसभेत भोगावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. शेतकऱ्यांची वीज माफ केली आहे. ती कायमस्वरूपी राहील. हे शेती पंप सोलरवर आम्ही कन्वर्ट करू. जे वीज बिल माफ केल आहे, ते पर्मनंट राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजना कायम स्वरुपी राहील- महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार रुपये देत आहोत. तीन सिलेंडर मोफत देत आहोत. भावाकडून बहिणीला भाऊबीज आणि रक्षाबंधन भेट आहे. ती दिलेली सन्मानाची भेट आहे. आमच्या सरकारची देण्याची दानत आहे. ही योजना कायमस्वरूपी मिळत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती सर्व नऊ जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेcongressकाँग्रेसnagpurनागपूर