शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशतवादाचे षडयंत्र रचले, मुख्यमंत्र्यांचा दावा

By योगेश पांडे | Updated: August 1, 2025 13:30 IST

Nagpur : बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर थेट कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्होटबॅंक डोळ्यासमोर ठेवूनच कॉंग्रेसने भगव्या दहशवादाचे षडयंत्र रचले व त्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नाहक अडकविण्याचा प्रयत्न केला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शुक्रवारी ते नागपुरात बोलत होते. 

मालेगाव बॉम्बस्फोटानंतर २००८ चे जे षडयंत्र होते ते सर्वांसमोर उघडे पडले आहे. त्यावेळच्या सरकारने मतांच्या राजकारणासाठी भगवा दहशतवाद हा शब्द तयार केले होते. १९९० च्या दशकाच्या अखेरच्या टप्प्यात संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात दहशतवादी घटना होत होत्या व इस्लामिक दहशतवाद हा जगात चर्चेचा विषय होता. त्यावेळी व्होटबॅंकेच्या स्वार्थातून हा प्रकार करण्यात आला होता. तशी थिअरी तयार करून लोकांना अटक करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचे हे षडयंत्र होते. मात्र खूप प्रयत्न करूनदेखील कुठलाही पुरावा जमा करू शकले नव्हते. याबाबत हळू हळू लोक बोलतील व अनेक गंभीर बाबी समोर येतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

अनेक दहशतवादी घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचले होते. त्यातून इस्लामिक दहशतवाद हा नॅरेटिव्ह जगात तयार झाला होता. संपूर्ण मुस्लिमांना कुणीही दहशतवादी ठरविले नव्हते. मात्र सर्व हिंदूंना दहशतवादी ठरविण्यासाठी संपुआ व कॉंग्रेसने षडयंत्र रचले होते. त्यांनी पोलीस यंत्रणेतील तत्कालिन अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता. पुरावे नसतानादेखील कारवाई करा असे अलिखित निर्देश देण्यात आले होते. मात्र काही अधिकारी या दबावाला बळी पडले नाहीत. आता याचा भंडाफोड झाला आहे. त्यावेळच्या देश व राज्यातील सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून हिंदू संघटनांना संपविण्यासाठी प्रयत्न कसा केला होता हे जगासमोर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये होते. त्यांच्याच सरकारने भगवा दहशतवाद हा शब्द आणला होता. तेव्हा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आठवला नव्हता का असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.

बेशिस्त वर्तन करणाऱ्या मंत्र्यांवर थेट कारवाईकोकाटे यांच्या बाबतीत जी घटना घडली त्यानंतर जनतेत रोष होता. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेअंती कोकाटे यांचे खाते बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तरी मंत्रीमंडळात कुठलाही दुसरा बदल होईल अशी शक्यता नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहे. आम्ही काय बोलतो, कसे वागतो हे जनता पाहत असते. त्यामुळे वागताना नियंत्रित वागले पाहिजे. आता मंत्रीमंडळातील कुठल्याही सदस्याने बेशिस्त वर्तन केले तर ते खपवून घेणार नाही व त्यांच्यावर कारवाई होईल. आम्ही तिघांनीही हे निश्चित केले आहे. हा सर्वांसाठी संकेत आहे, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान,  माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी काही कामासाठी माझी तीनदा भेट घेतली आहे. मात्र मंत्रीमंडळाची चर्चा धनंजय मुंडे यांच्या स्तरावर होत नसते, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस