शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांच्याविरोधात काँग्रेसची शेतकरी पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:35 IST

शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा ते दाभाडी ९० कि.मी.ची पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. देशात भाजपाची सत्ता आल्यास शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, युवकांना रोजगार अशा विविध प्रकारची १९ आश्वासने दिली होती. परंतु गेल्या चार वर्षात यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.चाय पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, कृषी व्याजदरात सवलत, कापसाला योग्य भाव व स्थानिकांना रोजगार, सोयाबीन शेती करणाऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी व्यवस्था करणे, कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा, देशभरात गोदाम व कोल्ड स्टोअरेजचे जाळे निर्माण करणे, पीक विमा घेण्यासाठी तात्काळ कर्ज, नद्या जोड प्रकल्प राबविणे, आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, देशात कृषी क्रांती आणली जाईल. गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाला गेट लावून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ४०० कोटींची मोफत वीज देण्यात येईल, अशा प्रकारची आश्वासने दिली होती.मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भाजपाला मते दिली. परंतु सत्तारूढ होताच भाजपाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकरीविरोधी धोरणामुळे यवतमाळ, चंद्रपूर व अदिलाबाद या तीन जिल्ह्यातील पाच लाख एकर शेतीला पाणी देण्याची क्षमता असलेला निम्न पैनगगां प्रकल्प २०१४ सालापासून बंद पडला आहे. याचा निषेध म्हणून ही पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभांना माजी खासदार नाना पटोले, नरेश पुगलिया, आ. विजय वडेट्टीवार, खा. राजीव सातव, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी, आ. नौशाद सोलंकी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली.पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेश सचिव व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश कुमरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन