शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

मोदी यांच्याविरोधात काँग्रेसची शेतकरी पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 20:35 IST

शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिवाजीराव मोघे : पांढरकवडा ते दाभाडी ९० कि.मी.ची पदयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. देशात भाजपाची सत्ता आल्यास शेतीमालाला योग्य भाव, शेतकऱ्यांना सक्षम बनविणे, युवकांना रोजगार अशा विविध प्रकारची १९ आश्वासने दिली होती. परंतु गेल्या चार वर्षात यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने मोदी यांच्याविरोधात काँग्रेसतर्फे ५ ते ८ एप्रिल दरम्यान पांढरकवडा ते दाभाडी अशी ९० किलोमीटरची शेतकरी पदयात्रा काढणार असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.चाय पे चर्चा कार्यक्रमाच्या माध्यमातून मोदी यांनी शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा, कृषी व्याजदरात सवलत, कापसाला योग्य भाव व स्थानिकांना रोजगार, सोयाबीन शेती करणाऱ्यांना अधिक लाभ होईल, अशी व्यवस्था करणे, कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा, देशभरात गोदाम व कोल्ड स्टोअरेजचे जाळे निर्माण करणे, पीक विमा घेण्यासाठी तात्काळ कर्ज, नद्या जोड प्रकल्प राबविणे, आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मदत, देशात कृषी क्रांती आणली जाईल. गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्पाला गेट लावून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ४०० कोटींची मोफत वीज देण्यात येईल, अशा प्रकारची आश्वासने दिली होती.मोदी यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी भाजपाला मते दिली. परंतु सत्तारूढ होताच भाजपाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकरीविरोधी धोरणामुळे यवतमाळ, चंद्रपूर व अदिलाबाद या तीन जिल्ह्यातील पाच लाख एकर शेतीला पाणी देण्याची क्षमता असलेला निम्न पैनगगां प्रकल्प २०१४ सालापासून बंद पडला आहे. याचा निषेध म्हणून ही पदयात्रा काढली जाणार आहे. पदयात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभांना माजी खासदार नाना पटोले, नरेश पुगलिया, आ. विजय वडेट्टीवार, खा. राजीव सातव, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी, आ. नौशाद सोलंकी आदी मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवाजीराव मोघे यांनी दिली.पत्रपरिषदेला काँग्रेसचे प्रदेश सचिव व नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश कुमरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन