शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिशा प्रकरणावरुन गोंधळ, आदित्य ठाकरेंनी सांगितली भावनिक आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 17:14 IST

"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं

नागपूर  - येथील हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी दिशा सालियान प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ झाला. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी दिशा सालियान प्रकरणावरुन ठाकरेंना लक्ष्य करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, याप्रकरणी नव्याने चौकशीची मागणीही केली. त्यानंतर, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली. त्यामुळे, आता पुन्हा एकदा दिशा सालियान मृत्युप्रकरणाची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणेंनी याप्रकरणात आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. आता, यावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारवर जोरदार पलटवार केला आहे. तसेच, दिशा सालियान प्रकरणावर भावनिक प्रत्युत्तर दिलं.  

"मला या प्रकरणात एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. जी व्यक्ती आता हयात नाही. त्या व्यक्तीचे आई-वडील टीव्हीसमोर रडले, त्यांचं दुःख त्यांनी व्यक्त केलं. त्यांनी राष्ट्रपतींना सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाबाबत लिहिलेलं आहे. काही आमदारांनी त्यांच्याबाबत वक्तव्य केलं त्यांचीही बदनामी करण्यात आली,'' असे भावनिक प्रत्युत्तर आदित्य यांनी दिले. तसेच, आपलं राजकारण एवढं घाणेरडं कधीच नव्हतं. तिच्या आई-वडिलांनी विनंती करुन देखील, तसेच त्यांनी राष्ट्रपतींकडेही मागणी केली आहे की, आमची होणारी बदनामी थांबली नाहीतर आम्ही जगू शकणार नाही.", अशी आठवणही आदित्य यांनी करुन दिली. तसेच, खोके सरकार ३२ वर्षीय तरुणाला घाबरलं असल्याचंही ते म्हणाले. 

माझ्या बदनामीचे प्रयत्न सुरू - आदित्य

"एका 32 वर्षाच्या तरुणाला खोके सरकार घाबरलंय. म्हणूनच बदनामीचे प्रयत्न होत आहेत. जनतेला माहित आहे, आज हे गद्दार मुख्यमंत्री ज्या घोटाळा प्रकरणात अडकले आहेत, ते आम्हाला सभागृहात सादर करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी पक्ष हे सतत वेलमध्ये येत आहे आणि अध्यक्ष, तालिका अध्यक्ष आम्हाला बोलू देत नाहीत. त्या बाजूला 14 जणांना बोलू दिलं, तेही एकापाठोपाठ. अडीच वर्षात मी तरी असं हाऊस सुरु असल्याचं पाहिलं नाही. मी लहानपणापासून टीव्हीवर अधिवेशन पाहिलंय. पण सत्ताधारी पक्ष वेलमध्ये येऊ आंदोलन करतोय, असं कधीच दिसलं नाही." 

गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचे प्रयत्न

"यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राज्यपाल हटाओ आम्ही जी सातत्याने मागणी करत आहोत, ज्या महाराष्ट्रद्वेशी राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचा अपमान केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा फुलेंचा अपमान केला. त्यांना वाचवण्यासाठी हा पूर्ण प्रयत्न केला जात आहे. घोटाळेबाज, गद्दार मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे जे काही शोधायचंय ते शोधू द्यात. महत्त्वाची गोष्ट एकच आहे की, NIT चा घोटाळा आम्हाला सभागृहात सादर करु न देण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत," असंही आदित्य ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMLAआमदारSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत