शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

जप्ती टळली, रेल्वेची धनादेश देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 21:50 IST

अमरावती जिल्ह्याच्या आकोलीत रेल्वे लाईनसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा २० वर्षांपासून मोबदला मिळाला नसल्यामुळे तीन पीडित नागरिक शुक्रवारी न्यायालयातून जप्तीचा आदेश घेऊन अजनीतील बांधकाम विभागात पोहोचले. धनादेश न मिळाल्याने त्यांनी विभागातील फर्निचर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे रेल्वे अधिकारी धास्तावले, त्यांनी मुंबई मुख्यालयात संपर्क साधल्यानंतर पीडितांना धनादेश देण्यास तयार झाले. पीडितांना हा धनादेश न्यायालयामार्फत देण्यात येणार आहे. पीडित नागरिक परतल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देअजनी रेल्वेच्या बांधकाम विभागात तणावाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती जिल्ह्याच्या आकोलीत रेल्वे लाईनसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा २० वर्षांपासून मोबदला मिळाला नसल्यामुळे तीन पीडित नागरिक शुक्रवारी न्यायालयातून जप्तीचा आदेश घेऊन अजनीतील बांधकाम विभागात पोहोचले. धनादेश न मिळाल्याने त्यांनी विभागातील फर्निचर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यामुळे रेल्वे अधिकारी धास्तावले, त्यांनी मुंबई मुख्यालयात संपर्क साधल्यानंतर पीडितांना धनादेश देण्यास तयार झाले. पीडितांना हा धनादेश न्यायालयामार्फत देण्यात येणार आहे. पीडित नागरिक परतल्यानंतर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नि:श्वास सोडला.अमरावती जिल्ह्याच्या आकोलीत प्रकाश केला, सुभाष शिंदे आणि प्रकाश व्यास यांची जमीन मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाने अमरावती-नरखेड रेल्वेलाईनच्या निर्मितीसाठी २० वर्षांपूर्वी अधिग्रहित केली होती. त्यांच्या मते त्यावेळी दिलेला मोबदला बाजारभावापेक्षा कमी होता. दहा वर्षे वाट पाहूनही मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी अमरावतीच्या न्यायालयात अपील केले. मागील वर्षी रेल्वेच्या बांधकाम विभागाने मोबदला देण्याचे आश्वासन देऊनही मोबदला दिला नाही. अखेर जुलै २०१८ मध्ये या पीडितांच्या बाजूने निकाल लागला. या वर्षी फेब्रुवारीला बांधकाम विभागाला ४० लाख रुपये देण्याची नोटीस जारी करण्यात आली. त्यानंतरही मोबदला न मिळाल्यामुळे पीडितांनी जप्तीचा आदेश आणला. त्यानुसार स्थानिक जिल्हा न्यायालयाचे बेलिफ नितीन बरगट आणि वकिलासोबत प्रकाश केला, सुभाष शिंदे, प्रकाश व्यास शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता अजनी रेल्वेच्या बांधकाम विभागात पोहोचले. त्यांनी ४० लाख रुपयांचा धनादेश द्या अन्यथा विभागाची संपत्ती जप्त करण्याचा आदेश असल्याचे सांगितले.रेल्वे अधिकारी धास्तावलेजप्तीच्या आदेशामुळे रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता पी. के. चतुर्वेदी, कावरे, फारुकी, शर्मासह इतर अधिकारी धास्तावले. त्यांनी रेल्वे मुख्यालयात संपर्क साधून पीडितांना मोबदला देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत रेल्वेचे वकील नितीन लांबट तेथे पोहोचले. त्यांनी पीडित नागरिक आणि बेलीफ यांना दोन दिवसात मोबदला देण्याचे आश्वासन दिले.लवकरच मोबदला देऊ : चतुर्वेदीमध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाचे उपमुख्य अभियंता पी. के. चतुर्वेदी यांनी ‘लोकमत’शी बोलताना पीडित नागरिकांना लवकरच ४० लाख देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी मुंबई मुख्यालयाशी संपर्क साधला असून सायंकाळपर्यंत धनादेश तयार होऊन दुसऱ्या दिवशी धनादेश न्यायालयात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर