शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

नाव नोंदणीसाठी सवलत पण मनपा अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:08 IST

जन्म प्रमाणपत्रावर एप्रिल २०२६ पर्यंत नाव नोंदणीची सवलत राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महत्वाच्या दस्तावेजासाठी जन्मप्रमाणपत्र अनिवार्य ...

जन्म प्रमाणपत्रावर एप्रिल २०२६ पर्यंत नाव नोंदणीची सवलत

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महत्वाच्या दस्तावेजासाठी जन्मप्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. परंतु नाव नोंदणी करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करता राज्य सरकारने २७ एप्रिल २०२६ पर्यंत १५ वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना नाव नोंदणीसाठी पुन्हा सवलत दिली आहे. परंतु या आदेशाबाबत मनपा प्रशासन अजूनही अनभिज्ञ आहे.

या संदर्भात राज्याचे आरोग्य उपसंचालक व उपमुख्य निबंधक, जन्म -मृत्यू डॉ. जी.एम. गायकवाड यांनी मे २०२१ मध्ये आदेश जारी केले आहे. परंतु मनपा प्रशासनाला या आदेशाबाबत अजूनही कल्पना नाही. या संदर्भात संबंधित विभागाकडून मनपाला कोणत्याही स्वरुपाचे अधिकृत पत्र व ई-मेल प्राप्त झाला नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १४ व महाराष्ट्र जन्म व मृत्यू नोंदणी नियम २००० नुसार जन्मापासून १५ वर्षापर्यंत नाव नोंदणी करता येते. त्यानंतर नाव नोंदणी करण्याची सुविधा नाही. राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात लोकांची नाव नोंदणी झालेली नसल्याने नाव नोंदणीला तीन वेळा मुदतवाढ दिली. त्यानंतरही जन्माची नोंद प्रमाणपत्रावर नसलेल्यांची संख्या मोठी आहे. याचा विचार करता राज्य सरकारने एप्रिल २०२६ पर्यत नाव नोंदविण्याला मुदतवाढ दिली आहे.

या अधिसूचनेनुसार मोठ्या संख्येने नागरिक मनपात जन्म -मृत्यू प्रमाणपत्र विभागात येत आहेत. परंतु त्यांना परत पाठविले जात आहे. महिनाभरापासून ही समस्या आहे. संबंधित विभागाच्या उपायुक्त रंजना लाडे यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र यावर कोणताही निर्णय घेतला नाही.

..

तीनदा मिळाली सवलत

राज्य सरकारने यापूर्वी जन्म प्रमाणपत्रात नाव नोंदविण्यासाठी तीनदा सवलत दिली. सर्व प्रथम २६ ऑक्टोबर २००५ ते २५ ऑक्टोबर २००७, दुसऱ्यांदा १ जानेवारी २०१३ ते १३ डिसेंबर २०१४ व १५ मे २०१५ ते १४ मे २०२० पर्यंंत सवलत दिली होती. पुन्हा पाच वर्षे सवलत मिळाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

...........

माहिती मिळाली पण आदेश नाही -लाडे

जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदणीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती दुसऱ्या माध्यमातून मिळाली. परंतु या संदर्भात मनपाला कोणत्याही स्वरुपाचे लिखित आदेश मिळालेले नाही. अशी माहिती मनपाच्या उपायुक्त रंजना लाडे यांनी दिली. आदेशासंदर्भात संबंधित विभागाला पत्र लिहिले आहे. यावर उत्तर मिळताच त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

..........

अशी आहे नाव नोंदणीची प्रक्रिया

-जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदणीसाठी संबंधित व्यक्तीला विभागाकडे अर्ज करावा लागेल.

-दोन सरकारी दस्तावेज जोडावे लागतील. यात शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र, पॅन कार्ड, मतदार ओळख पत्र, ड्रायव्हींग लायसन्स, सरकारी कार्यालयात कर्मचारी असल्यास ओळख पत्र

-ज्याचे नाव नोंदवायचे आहे त्याचे पूर्ण नाव लिहावे लागेल.

- प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र विभाग कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करेल. त्यानंतर जन्म प्रमाणपत्रावर नाव नोंदविले जाईल.

-काही तांत्रिक अडचण आल्यास विभागातर्फे अर्जधारकाला कळविले जाईल.