शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

भारत बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद; नागपुरात आंदोलनाची तीव्रता अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 20:23 IST

अ‍ॅट्रोसिटी कायद्यामध्ये फेर बदल करण्याचे जे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ते अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला आज नागपुरात तीव्र तर उर्वरित विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.

ठळक मुद्देनागपुरात बसला आग, दगडफेक, रेल रोकोयवतमाळात काळ्या फिती लावून केली कामेवर्ध्यात मोर्चा काढून निवेदने सादरगडचिरोलीतील आदिवासीबहुल भागात निघाले मोर्चे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अ‍ॅट्रोसिटी कायद्यामध्ये फेर बदल करण्याचे जे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले ते अन्यायकारक असल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या भारत बंदला आज नागपुरात तीव्र तर उर्वरित विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.नागपूर शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. संविधान चौकात रास्ता रोको करण्यात आला. इंदोरा चौकात बसला आग लावण्यात आली. गड्डीगोदाममध्ये रेल रोको करण्यात आली. अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड व दगडफेक करण्यात आली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे हा कायदा शिथील झाला आहे. दलित-आदिवासींवर होणारे जातीय हल्ले व अत्याचार रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेला हा कायद्याचा उपयोगच संपला आहे, त्यामुळे दलित-आदिवासी समाजामध्ये न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रचंड असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मिकी समाजने सोमवारी भारत बंदचे आवाहन केले होते. उत्तर भारतासह नागपुरातही या आंदोलनाला तीव्र प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौकात विविध संघटनांनी जोरदार आंदोलन करत नारेबाजी केली. इंदोर चौकात एक बस पेटवण्यात आली, तर एका बसवर दगडफेक करण्यात आली.काही भागात या बंदच्या निमित्ताने लोकांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा लावला आहे. देशात असलेल्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल होऊ नये, अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे.यवतमाळात महादलित परिसंघाच्या नेतृत्वात यवतमाळ नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. तसेच मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात कुठेही बंद पाळण्यात आला नाही. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.चंद्रपूर जिल्ह्यात माजरी येथील आंबेडकर चौकात राष्ट्रीय महादलित परिसंघ, काँग्रेस पार्टी, भारिप बहुजन महासंघ आदी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र जमले होते. भद्रावतीचे नायब तहसीलदार यांच्याकडे राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी एक निवेदन देण्यात आले. ब्रह्मपुरी, सावली येथेही निवेदन देण्यात आले. सकाळच्या वेळेस काही तासांसाठी दुकाने बंद करण्यात आली होती. बल्लारपूर, वरोरा, नागभीड, सिंदेवाही, मूल, चिमूर येथे बंदचा प्रभाव दिसला नाही.वर्धा जिल्ह्यात बंदला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये सुरळीत सुरू होते. भीम आर्मीच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले. पुलगाव शहरात बसपाने मोर्चा काढून निवेदन दिले.भारत बंदला अमरावतीत अल्प प्रतिसाद मिळाला. विविध संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान, येथील इर्विन चौक ते जिल्हा कचेरीदरम्यान शासनविरोधात रॅली काढण्यात आली. भीम आर्मी, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, बहुजन समाज पार्टी, रिपाइं (गवई गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांच्यासह विविध दलित संघटनांनी शांततेत रॅलीद्वारे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर केले. तसेच तिवसा, नांदगाव खंडेश्वरसह अन्य तालुकास्तरावरून दलित- आदिवासी संघटनांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठविले.गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात बंद पाळण्यात आला. मात्र या बंदची माहिती लोकांना पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीसह भामरागड, कोरची या आदिवासीबहुल भागात मोर्चे काढून निवेदन देण्यात आले. यात विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव व सडक-अर्जुनी तालुक्यात बंद पाळण्यात आला असतानाच तिरोडा तालुक्यातील ग्राम करटी बु. येथे खैरलांजी मार्गावर अनु.जाती-जमाती समाजबांधवांनी टायर जाळून विरोध दर्शविला. याशिवाय अन्य तालुक्यांत तहसीलदारामार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. विशेष म्हणजे, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात बंद नसतानाच कोणत्याही संघटनेकडून निवेदनही देण्यात आले नसल्याचे कळले.भंडारा जिल्ह्यातील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लाखनीत टायर जाळून निषेध करण्यात आला. भंडारा, साकोली, पवनी, लाखांदूर, मोहाडी, तुमसर येथे दूचाकी रॅली काढून निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाला अ‍ॅट्रासिटी निर्णयासंबंधी निवेदन सोपविण्यात आले.

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा