शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

महाराष्ट्र राज्यात १३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:56 IST

वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाऊर्जेचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण भागात आणि पाच हजार लोकवस्तीच्या मोठ्या ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या नळयोजनांकडे वीजबिलाची थकबाकी खूप वाढली. थकबाकीपोटी अनेक योजनांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला. यावर उपाययोजना म्हणून पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेण्याची संकल्पना ऊर्जामंत्र्यांनी पुढे आणली आणि त्यादृष्टीने महाऊर्जाने प्रयत्न केले. परिणामी एकापाठोपाठ एक अशा नळयोजना आता सौर ऊर्जेवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे नळयोजनांपुढील वीजबिलाची समस्या संपुष्टात येणार आहे आणि नळयोजनांना लागणाºया विजेची बचत होऊन ती वीज अन्य ग्राहकांकडे वळती करता येणे शक्य होईल.राज्यात पुणे विभागाला १७८ नळयोजनांचे लक्ष्य दिले होते. यापैकी १४३ योजना पूर्ण झाल्या असून ३६ योजनांची कामे सुरू आहेत. औरंगाबाद विभागात १५८ पैकी १३० नळयोजनांचे काम पूर्ण झाले आहे. २८ योजनांची कामे सध्या विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. नाशिक विभागात १९६ पैकी १७६ नळयोजना पूर्ण झाल्या असून २० योजनांचे काम सुरू आहे. अकोला विभागात १२२ नळयोजनांपैकी ११० पूर्ण झाल्या असून १२ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. चंद्रपूर विभागात ८५ पैकी ७७ योजनांची कामे पूर्ण झाली असून आठ योजनांची कामे सुरू आहे. कोल्हापूर विभागात १६६ योजनांच्या लक्ष्यापैकी फक्त ३६ योजनांची कामे पूर्ण झाली असून कोल्हापूर विभाग माघारला असल्याचे दिसते. १३० योजना प्रलंबित आहेत. अमरावती विभागात ८७ पैकी ६६ नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहे. २१ योजनांची कामे प्रलंबित आहेत. मुंबई विभागात १४८ योजनांपैकी १३८ योजनांची कामे पूर्ण झाली तर १० नळयोजनांची कामे सुरू आहेत. लातूर विभागात १८० पैकी १२५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ५५ नळ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. नागपूरमध्ये ३७६ पैकी ३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण झाली असून ५६ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.राज्यातील एकूण १५१५ नळयोजनांपैकी ११७२ नळयोजना पूर्ण झाल्या असून १८५ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर १५८ नळ योजनांची कामे प्रलंबित आहेत.

 

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र