शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

महाराष्ट्र राज्यात १३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:56 IST

वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाऊर्जेचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण भागात आणि पाच हजार लोकवस्तीच्या मोठ्या ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या नळयोजनांकडे वीजबिलाची थकबाकी खूप वाढली. थकबाकीपोटी अनेक योजनांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला. यावर उपाययोजना म्हणून पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेण्याची संकल्पना ऊर्जामंत्र्यांनी पुढे आणली आणि त्यादृष्टीने महाऊर्जाने प्रयत्न केले. परिणामी एकापाठोपाठ एक अशा नळयोजना आता सौर ऊर्जेवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे नळयोजनांपुढील वीजबिलाची समस्या संपुष्टात येणार आहे आणि नळयोजनांना लागणाºया विजेची बचत होऊन ती वीज अन्य ग्राहकांकडे वळती करता येणे शक्य होईल.राज्यात पुणे विभागाला १७८ नळयोजनांचे लक्ष्य दिले होते. यापैकी १४३ योजना पूर्ण झाल्या असून ३६ योजनांची कामे सुरू आहेत. औरंगाबाद विभागात १५८ पैकी १३० नळयोजनांचे काम पूर्ण झाले आहे. २८ योजनांची कामे सध्या विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. नाशिक विभागात १९६ पैकी १७६ नळयोजना पूर्ण झाल्या असून २० योजनांचे काम सुरू आहे. अकोला विभागात १२२ नळयोजनांपैकी ११० पूर्ण झाल्या असून १२ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. चंद्रपूर विभागात ८५ पैकी ७७ योजनांची कामे पूर्ण झाली असून आठ योजनांची कामे सुरू आहे. कोल्हापूर विभागात १६६ योजनांच्या लक्ष्यापैकी फक्त ३६ योजनांची कामे पूर्ण झाली असून कोल्हापूर विभाग माघारला असल्याचे दिसते. १३० योजना प्रलंबित आहेत. अमरावती विभागात ८७ पैकी ६६ नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहे. २१ योजनांची कामे प्रलंबित आहेत. मुंबई विभागात १४८ योजनांपैकी १३८ योजनांची कामे पूर्ण झाली तर १० नळयोजनांची कामे सुरू आहेत. लातूर विभागात १८० पैकी १२५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ५५ नळ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. नागपूरमध्ये ३७६ पैकी ३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण झाली असून ५६ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.राज्यातील एकूण १५१५ नळयोजनांपैकी ११७२ नळयोजना पूर्ण झाल्या असून १८५ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर १५८ नळ योजनांची कामे प्रलंबित आहेत.

 

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र