शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

महाराष्ट्र राज्यात १३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:56 IST

वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महाऊर्जेचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढती विजेची मागणी आणि सार्वजनिक सुविधांसाठी होणाऱ्या वीज बिलाच्या खर्चाची बचत व्हावी या दृष्टीने ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील गावखेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळयोजना सौर ऊर्जेवर घेण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आणि सकारात्मक निर्णयामुळे पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेणे शक्य झाले आहे. आजमितीला राज्यातील विविध जिल्ह्यात १३२० सौर नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहेत.ग्रामीण भागात आणि पाच हजार लोकवस्तीच्या मोठ्या ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या नळयोजनांकडे वीजबिलाची थकबाकी खूप वाढली. थकबाकीपोटी अनेक योजनांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला. यावर उपाययोजना म्हणून पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर घेण्याची संकल्पना ऊर्जामंत्र्यांनी पुढे आणली आणि त्यादृष्टीने महाऊर्जाने प्रयत्न केले. परिणामी एकापाठोपाठ एक अशा नळयोजना आता सौर ऊर्जेवर घेण्यात येत आहेत. त्यामुळे नळयोजनांपुढील वीजबिलाची समस्या संपुष्टात येणार आहे आणि नळयोजनांना लागणाºया विजेची बचत होऊन ती वीज अन्य ग्राहकांकडे वळती करता येणे शक्य होईल.राज्यात पुणे विभागाला १७८ नळयोजनांचे लक्ष्य दिले होते. यापैकी १४३ योजना पूर्ण झाल्या असून ३६ योजनांची कामे सुरू आहेत. औरंगाबाद विभागात १५८ पैकी १३० नळयोजनांचे काम पूर्ण झाले आहे. २८ योजनांची कामे सध्या विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. नाशिक विभागात १९६ पैकी १७६ नळयोजना पूर्ण झाल्या असून २० योजनांचे काम सुरू आहे. अकोला विभागात १२२ नळयोजनांपैकी ११० पूर्ण झाल्या असून १२ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. चंद्रपूर विभागात ८५ पैकी ७७ योजनांची कामे पूर्ण झाली असून आठ योजनांची कामे सुरू आहे. कोल्हापूर विभागात १६६ योजनांच्या लक्ष्यापैकी फक्त ३६ योजनांची कामे पूर्ण झाली असून कोल्हापूर विभाग माघारला असल्याचे दिसते. १३० योजना प्रलंबित आहेत. अमरावती विभागात ८७ पैकी ६६ नळयोजनांची कामे पूर्ण झाली आहे. २१ योजनांची कामे प्रलंबित आहेत. मुंबई विभागात १४८ योजनांपैकी १३८ योजनांची कामे पूर्ण झाली तर १० नळयोजनांची कामे सुरू आहेत. लातूर विभागात १८० पैकी १२५ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. ५५ नळ योजनांची कामे प्रगतिपथावर आहेत. नागपूरमध्ये ३७६ पैकी ३२० सौर नळ योजनांची कामे पूर्ण झाली असून ५६ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत.राज्यातील एकूण १५१५ नळयोजनांपैकी ११७२ नळयोजना पूर्ण झाल्या असून १८५ नळयोजनांची कामे प्रगतिपथावर आहेत, तर १५८ नळ योजनांची कामे प्रलंबित आहेत.

 

टॅग्स :WaterपाणीMaharashtraमहाराष्ट्र