शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

नागपुरात  रेल्वे मार्गावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:07 IST

रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाला अहवाल देणार : विविध बाबींची होणार चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.रेल्वे बोर्डाने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीत मध्य रेल्वे मुख्यालयाचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभागाचे डीआरएम सोमेश कुमार श्रीवास्तव आणि मेट्रोचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर यांचा समावेश आहे. ही समिती मेट्रोची लोकल कुठून येणार, ती चालवणार कोण, कुठून कुठपर्यंत धावणार, किती स्टेशनला थांबा राहील, संबंधित मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कसा राहील, मेन्टेनन्स कुठे होईल, उत्पन्नातील वाट्याची विभागणी कशी होईल तसेच तिकीट दर किती राहतील याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. रेल्वे रुळावर लोकल मेट्रो चालविण्याचा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला होता. मेट्रोच्या दुसºया टप्प्यातील प्रकल्प अहवाल सादर करण्यापूर्वी गडकरींनी याबाबत आढावा बैठक घेतली होती. बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षित रामटेक, कामठी, वर्धा, भंडारा पर्यंत रेल्वेमार्गावर मेट्रो लोकल चालविण्याबाबत सादरीकरण केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत महामेट्रोने दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावून रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून ही समिती नियुक्त केली आहे. सध्या रेल्वेकडे मुंबई मार्गावर अप आणि डाऊन अशा दोनच लाईन आहेत. याच लाईनवरून प्रवासी, माल वाहतूक करण्यात येते. हे मार्ग अतिशय व्यस्त असून थर्ड लाईन झाल्याशिवाय लोकल मेट्रो चालविणे शक्य होणार नाही. तसेच इटारसी-नागपूर आणि सेवाग्राम-बल्लारशा दरम्यानही थर्ड लाईन झाल्यावरच हा प्रकल्प अस्तित्वात येऊ शकणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर