शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

नागपुरात  रेल्वे मार्गावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 23:07 IST

रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.

ठळक मुद्देरेल्वे बोर्डाला अहवाल देणार : विविध बाबींची होणार चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्यासाठी रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून चार सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे. समितीत मेट्रो आणि रेल्वे अधिकाऱ्यांचा समावेश असून विविध बाबींची चाचपणी केल्यानंतर ही समिती रेल्वेच्या रुळावर लोकल मेट्रो चालविण्याबाबत आपला अहवाल सादर करणार आहे.रेल्वे बोर्डाने नियुक्त केलेल्या संयुक्त समितीत मध्य रेल्वे मुख्यालयाचे प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभागाचे डीआरएम सोमेश कुमार श्रीवास्तव आणि मेट्रोचे रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथूर यांचा समावेश आहे. ही समिती मेट्रोची लोकल कुठून येणार, ती चालवणार कोण, कुठून कुठपर्यंत धावणार, किती स्टेशनला थांबा राहील, संबंधित मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद कसा राहील, मेन्टेनन्स कुठे होईल, उत्पन्नातील वाट्याची विभागणी कशी होईल तसेच तिकीट दर किती राहतील याबाबतचा अहवाल सादर करणार आहे. रेल्वे रुळावर लोकल मेट्रो चालविण्याचा विचार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडला होता. मेट्रोच्या दुसºया टप्प्यातील प्रकल्प अहवाल सादर करण्यापूर्वी गडकरींनी याबाबत आढावा बैठक घेतली होती. बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दिक्षित रामटेक, कामठी, वर्धा, भंडारा पर्यंत रेल्वेमार्गावर मेट्रो लोकल चालविण्याबाबत सादरीकरण केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हा प्रकल्प पुढे नेण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत महामेट्रोने दिल्लीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावून रेल्वे बोर्डाच्या आदेशावरून ही समिती नियुक्त केली आहे. सध्या रेल्वेकडे मुंबई मार्गावर अप आणि डाऊन अशा दोनच लाईन आहेत. याच लाईनवरून प्रवासी, माल वाहतूक करण्यात येते. हे मार्ग अतिशय व्यस्त असून थर्ड लाईन झाल्याशिवाय लोकल मेट्रो चालविणे शक्य होणार नाही. तसेच इटारसी-नागपूर आणि सेवाग्राम-बल्लारशा दरम्यानही थर्ड लाईन झाल्यावरच हा प्रकल्प अस्तित्वात येऊ शकणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर