शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

... म्हणून नागपुरातील क्राईम रेट जास्त दिसतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 14:21 IST

गेल्यावर्षी कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कलम १८८ अन्वये १३ तर यंदा १२ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. एनसीआरबीच्या अहवालात हे गुन्हेही जोडले गेले. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड फुगली.

ठळक मुद्दे२०११ च्या लोकसंख्येनुसार एनसीआरबीचा अहवालवाढलेल्या लोकसंख्येचा विचार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जनगणना आणि लोकसंख्येच्याआधारे एनसीआरबीत देशातील विविध महानगरांतील क्राईम रेकॉर्ड तयार होतो. २०११ ला नागपुरातील लोकसंख्या सुमारे २५ लाख होती. त्यात आता किमान पाच लाखांची भर पडली आहे. ते ध्यानात घेतले जात नसल्यामुळेच नागपुरातील क्राईम रेट जास्त दिसतो, असे मत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केले.

नागपूरला अलीकडे क्राईम कॅपिटल म्हणून संबोधले जाते. मात्र, हे वास्तव नसल्याचे ते म्हणाले. २०११ नंतर नागपूरचा वेगाने विस्तार झाला आहे. कामठीचे दोन आणि हिंगणा असे तीन नवीन पोलीस स्टेशन शहराला जोडले गेले. त्यातील गुन्ह्यांची संख्याही अर्थातच नागपूर आयुक्तालयात गणली जाते. गेल्यावर्षी कोविड संसर्गाच्या अनुषंगाने कलम १८८ अन्वये १३ तर यंदा १२ हजार गुन्हे नोंदविण्यात आले. एनसीआरबीच्या अहवालात हे गुन्हेही जोडले गेले. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या प्रचंड फुगली. गुन्हे वाढणे ही बाब चांगली नाही आणि आपल्याला ती मान्यही नाही, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

हत्येच्या गुन्ह्यांच्या संबंधाने त्यांनी जानेवारी ते ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान ७९ हत्येचे गुन्हे घडले. त्यातील २१ गुन्हे अचानक उद्भवलेल्या कारणामुळे झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. अचानक उद्भवलेल्या वादातून झालेल्या हत्येचे गुन्हे रोखता येत नाहीत. मात्र, एखाद्या शहरात सतत हत्येचे गुन्हे घडत असेल, तर ही बाब चांगली नसल्याचेही त्यांनी मान्य केले. या संबंधाने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीसोबत एक करार करून घडलेल्या गुन्ह्यांची कारणमीमांसा शोधण्यात आली असून, यानंतर ते गुन्हे कसे रोखावे, त्यासंबंधाने उपाययोजना तयार करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही आहेत कारणे -

गेल्या १० महिन्यांत घडलेल्या हत्येच्या ७९ घटनांमध्ये २१ गुन्हे कुटुंब कलह, शेजाऱ्यांशी वाद, भांडण सोडविण्यास जाण्याच्या कारणातून घडले. अनैतिक आणि प्रेम संबंध, चारित्र्यावर संशय आदी कारणांवरून १६, तर जुन्या वैमनस्यातून १६ जणांची हत्या करण्यात आली. भिकाऱ्यांमधील वाद, दारूत झालेले भांडण अशा कारणावरून १० जणांची, तर पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीची हत्या झाली.

१७० बलात्काराच्या गुन्ह्यांपैकी

१६७ गुन्ह्यांमधील आरोपी ओळखीचे

यावर्षी बलात्काराचे १७० गुन्हे दाखल झाले. त्यातील १६७ गुन्ह्यांमधील आरोपी तक्रारदार महिला-मुलीच्या संपर्कातील आहे. प्रेम प्रकरण, अनैतिक संबंधाचा बोभाटा, लग्नास नकार देणे, आदी कारणे या गुन्ह्यांमागे आहेत. मात्र, महिला-मुलींच्या अत्याचाराच्या संबंधाने पोलीस अतिशय गंभीर असून, आरोपींना कठोर शासन व्हावे, यासाठी ‘ॲक्शन प्लान तयार करण्यात आला आहे. प्रत्येक पोलीस उपायुक्ताला ५ गुन्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जलदगती न्यायालयात सुनावणी चालवून आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

कोरोनानंतर नशाखोरी वाढली

कोविडमुळे शाळा-महाविद्यालये बंद झाली. श्रीमंतांच्या तुलनेत गरीब कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणाची साधनं उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत, असे एका अभ्यासातून पुढे आल्याचे पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. शाळा-महाविद्यालयापासून दुरावलेली ही मुले पानटपरी आणि चौकात गर्दी करत असून, समाजकंटकाच्या जाळ्यात ते अडकत आहेत. त्यामुळे नशाखोरीचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी गेल्या ९ महिन्यांत मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या २८६ आरोपींना अटक करून अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या आरोपींनी अंमली पदार्थाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचा धक्कादायक खुलासा केल्याचेही पोलीस आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी