शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य शाखेची ‘बल्ले बल्ले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:21 IST

एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, विज्ञान व कला शाखेत मुलींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देनिकाल घसरले : जिल्ह्याचा निकाल ८४ टक्के : ईशिका सतिजा ‘टॉप’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, विज्ञान व कला शाखेत मुलींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे. निकालांनंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.शहरातील पहिले तिन्ही ‘टॉपर्स’ हे वाणिज्य शाखेतीलच आहेत. के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी ईशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करीत तृतीय स्थानावर राहिला.विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कनक गजभिये हिने ९४.७० टक्के (६१६) गुण मिळवीत प्रथम स्थान मिळविले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख फैझान शफी हा ९३.८४ टक्के (६१०) गुण मिळवीत द्वितीय क्रमांकावर आला. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुरागिनी पौनीकर ही ९३.१० टक्के (६०५) गुणांसह तृतीय स्थानी आली.कला शाखेत हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी पाखी मोर हिने ९५.६९ टक्के (६२२) गुण प्राप्त करीत प्रथम स्थान पटकाविले. हिस्लॉप महाविद्यालयाच्याच लक्ष्मीश्री अय्यर हिने ९४.९२ (६१७) टक्के गुण प्राप्त करीत दुसरे स्थान मिळविले. तर एलएडी महाविद्यालयाची ईशोदया गुप्ता ही विद्यार्थिनी ९४.१५ टक्के (६१२) गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजीनागपूर विभागातून ७७,१३८ पैकी ६६,५८६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.३२ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ७८.८९ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,१२७ पैकी २६,७०७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.६५ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी ४.६५ टक्क्यांनी कमी आहे. नागपूर जिल्ह्यातून ८०.२७ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.३२ टक्के इतका राहिला.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर