शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

वाणिज्य शाखेची ‘बल्ले बल्ले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:21 IST

एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, विज्ञान व कला शाखेत मुलींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देनिकाल घसरले : जिल्ह्याचा निकाल ८४ टक्के : ईशिका सतिजा ‘टॉप’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी बारावीच्या निकालात विज्ञान शाखेचा वरचष्मा दिसून येतो. मात्र यंदा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी सर्वांनाच धक्का देत अव्वल स्थान पटकाविले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विज्ञान शाखेचे निकाल प्रचंड घसरले आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही वाणिज्य, विज्ञान व कला शाखेत मुलींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे. निकालांनंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.शहरातील पहिले तिन्ही ‘टॉपर्स’ हे वाणिज्य शाखेतीलच आहेत. के.डी.एम.गर्ल्स कॉलेजमधील विद्यार्थिनी ईशिका सतिजा हिने ९६.३१ टक्के (६२६) गुण प्राप्त करीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्यापाठोपाठ डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी खुशी दायमा हिने ९६ टक्के (६२४) गुण प्राप्त करीत द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी भूषण ढुमणे हा ९५.५३ टक्के (६२१) गुण प्राप्त करीत तृतीय स्थानावर राहिला.विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कनक गजभिये हिने ९४.७० टक्के (६१६) गुण मिळवीत प्रथम स्थान मिळविले. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख फैझान शफी हा ९३.८४ टक्के (६१०) गुण मिळवीत द्वितीय क्रमांकावर आला. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनुरागिनी पौनीकर ही ९३.१० टक्के (६०५) गुणांसह तृतीय स्थानी आली.कला शाखेत हिस्लॉप महाविद्यालयाची विद्यार्थिनी पाखी मोर हिने ९५.६९ टक्के (६२२) गुण प्राप्त करीत प्रथम स्थान पटकाविले. हिस्लॉप महाविद्यालयाच्याच लक्ष्मीश्री अय्यर हिने ९४.९२ (६१७) टक्के गुण प्राप्त करीत दुसरे स्थान मिळविले. तर एलएडी महाविद्यालयाची ईशोदया गुप्ता ही विद्यार्थिनी ९४.१५ टक्के (६१२) गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजीनागपूर विभागातून ७७,१३८ पैकी ६६,५८६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८६.३२ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ७८.८९ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,१२७ पैकी २६,७०७ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ८८.६५ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी ४.६५ टक्क्यांनी कमी आहे. नागपूर जिल्ह्यातून ८०.२७ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.३२ टक्के इतका राहिला.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर