शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

दिलासादायक! ६४ टक्के रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:00 IST

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ११७ म्हणजे १९.२४ टक्के होती. पंधरा दिवसांत म्हणजे १५ मे रोजी टक्केवारीत वाढ होऊन ती ५५.१२ टक्क्यांवर आली, तर २० मे रोजी आणखी सुधारणा होत बरे झालेल्या रुग्णांच्या टक्केवारीचा आकडा ६४.७२ टक्के इतका झाला आहे.देशभरात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूची साथ नेमकी संपणार तरी कधी, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाशी झुंजतच जगावे लागणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोविड-१९’चे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे या आजाराची भीती काहीशी कमी करण्यास मदत करणारी ठरणार आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद आतापर्यंत नागपुरात झाली आहे. अकोल्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे आता सर्वच जिल्ह्यात रुग्ण दिसून येत असलेतरी त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्याही वाढत आहे. ८ मे रोजी विदर्भात ६०८ रुग्णसंख्या होती. यातील ११७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यांची टक्केवारी १९.२४ टक्के होती. ९ मे रोजी १३७ रुग्ण बरे झाले, टक्केवारी २१.६७ टक्के होती. १० मे रोजी १८५ रुग्ण बरे झाले, यांची टक्केवारी २८.२४ टक्के होती. ११ मे रोजी २०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. टक्केवारी ३०.१८ टक्के होती. १२ मे रोजी २४७ रुग्ण बरे झाले. टक्केवारी ३५.९५ टक्के होती. १३ मेपासून अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे १३ मे रोजी ३१० रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४२.९९ टक्के होती. १४ मे रोजी १४ मे ३४९ रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४६.७२ टक्के होती. १५ मेपासून नागपुरातही सुधारित डिस्चार्ज धोरण राबविणे सुरू झाले. यामुळे एकट्या मेयो रुग्णालयातून ५१ रुग्ण बरे झाले. तर विदर्भात ४३० म्हणजे ५५.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. १६ मे रोजी ही टक्केवारी वाढून ६०.३२ टक्क्यांवर पोहचली. १७ मे रोजी यात किंचित घट आली. बरे होणाºया रुग्णांची टक्केवारी ५८.८५ टक्के असताना १८ मे रोजी पुन्हा यात वाढ होऊन ती ६३.९२ टक्क्यांवर पोहचली. १९ मे रोजी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१९ वर गेली. टक्केवारीतही वाढ होऊन ६६.३४ पोहचली तर २० मे पर्यंत १,०१२ रुग्णांची नोंद झाली असताना ६५५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यांची टक्केवारी ६४.७२ टक्के होती, हे दिलासादायक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस