शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

दिलासादायक! ६४ टक्के रुग्णांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 11:00 IST

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे.

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एक दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होत असलेल्यांच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ११७ म्हणजे १९.२४ टक्के होती. पंधरा दिवसांत म्हणजे १५ मे रोजी टक्केवारीत वाढ होऊन ती ५५.१२ टक्क्यांवर आली, तर २० मे रोजी आणखी सुधारणा होत बरे झालेल्या रुग्णांच्या टक्केवारीचा आकडा ६४.७२ टक्के इतका झाला आहे.देशभरात हाहाकार माजविणाºया कोरोना विषाणूची साथ नेमकी संपणार तरी कधी, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाशी झुंजतच जगावे लागणार असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. या पार्श्वभूमीवर ‘कोविड-१९’चे बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण हे या आजाराची भीती काहीशी कमी करण्यास मदत करणारी ठरणार आहे. विदर्भात सर्वाधिक रुग्णांची नोंद आतापर्यंत नागपुरात झाली आहे. अकोल्यातही झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. विशेष म्हणजे आता सर्वच जिल्ह्यात रुग्ण दिसून येत असलेतरी त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाºया रुग्णांची संख्याही वाढत आहे. ८ मे रोजी विदर्भात ६०८ रुग्णसंख्या होती. यातील ११७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यांची टक्केवारी १९.२४ टक्के होती. ९ मे रोजी १३७ रुग्ण बरे झाले, टक्केवारी २१.६७ टक्के होती. १० मे रोजी १८५ रुग्ण बरे झाले, यांची टक्केवारी २८.२४ टक्के होती. ११ मे रोजी २०१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. टक्केवारी ३०.१८ टक्के होती. १२ मे रोजी २४७ रुग्ण बरे झाले. टक्केवारी ३५.९५ टक्के होती. १३ मेपासून अकोला, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांसाठी सुधारित डिस्चार्ज धोरण लागू करण्यात आले. यामुळे १३ मे रोजी ३१० रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४२.९९ टक्के होती. १४ मे रोजी १४ मे ३४९ रुग्ण बरे झाले. यांची टक्केवारी ४६.७२ टक्के होती. १५ मेपासून नागपुरातही सुधारित डिस्चार्ज धोरण राबविणे सुरू झाले. यामुळे एकट्या मेयो रुग्णालयातून ५१ रुग्ण बरे झाले. तर विदर्भात ४३० म्हणजे ५५.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. १६ मे रोजी ही टक्केवारी वाढून ६०.३२ टक्क्यांवर पोहचली. १७ मे रोजी यात किंचित घट आली. बरे होणाºया रुग्णांची टक्केवारी ५८.८५ टक्के असताना १८ मे रोजी पुन्हा यात वाढ होऊन ती ६३.९२ टक्क्यांवर पोहचली. १९ मे रोजी बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६१९ वर गेली. टक्केवारीतही वाढ होऊन ६६.३४ पोहचली तर २० मे पर्यंत १,०१२ रुग्णांची नोंद झाली असताना ६५५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यांची टक्केवारी ६४.७२ टक्के होती, हे दिलासादायक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस