शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अदखलपात्र गुन्ह्यांची दखल, हायकोर्टाने ओढले ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:47 IST

एका प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यांची दखल घेऊन एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. अशी गंभीर चूक करणाऱ्या पोलिसांना सेवेत कायम ठेवणे प्रशासन व गुन्ह्याच्या तपासाकरिता धोकादायक ठरू शकते. अशा चुकांमुळे न्यायदान प्रक्रिया प्रभावित होते, असे न्यायालय म्हणाले.

ठळक मुद्देअशी चूक होणे धोकादायक : न्यायदान प्रक्रिया प्रभावित होते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका प्रकरणात अदखलपात्र गुन्ह्यांची दखल घेऊन एफआयआर नोंदविण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. अशी गंभीर चूक करणाऱ्या पोलिसांना सेवेत कायम ठेवणे प्रशासन व गुन्ह्याच्या तपासाकरिता धोकादायक ठरू शकते. अशा चुकांमुळे न्यायदान प्रक्रिया प्रभावित होते, असे न्यायालय म्हणाले.हे प्रकरण वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील असून, त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. शैलेंद्र शाहू (४४) यांच्यावर तहसील कार्यालयात प्रवेश करून गोंधळ घालणे, सरकारी कामकाजात अडथळे निर्माण करणे व तहसीलदारांना धमकी देणे, असे आरोप करण्यात आले होते. ६ जून २०१८ रोजी प्रभारी तहसीलदार व्ही. एस. भागवत यांच्या तक्रारीवरून देवळी पोलिसांनी शाहू यांच्याविरुद्ध भादंवितील कलम १८६ व ५०६ हे गुन्हे नोंदविले. त्यामुळे शाहू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शाहू यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप अदखलपात्र होते व असे असताना त्याची दखल घेण्यात आली, ही बाब याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने संतप्त होऊन कडक शब्दात ताशेरे ओढले.पोलिसांच्या स्पष्टीकरणावर असमाधान व्यक्तदेवळी पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून महिला पोलीस कॉन्स्टेबल जयश्री नाईक यांच्याकडून अनावधानाने ही चूक झाल्याचे सांगितले व या प्रकरणात सक्षम न्यायालयात अदखलपात्र समरी दाखल करण्यात आल्याची माहिती दिली. परंतु, त्यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. ही अनावधानाने झालेली चूक असू शकत नाही. कारण, कायदे व कायदेशीर प्रक्रियेचे मूलभूत प्रशिक्षण दिल्यानंतरच पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली जाते. अशा परिस्थितीतही अनावधानाने चूक झाली असल्यास त्यातून संबंधित पोलीस कर्मचाºयाची असक्षमता दिसून येते. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व भविष्यात या चुकीची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.त्या कॉन्स्टेबलवर एक रुपया दंडया चुकीमुळे शाहू यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना योग्य भरपाई मंजूर करून ती भरपाई ही चूक करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल नाईक यांच्या वेतनातून वसूल करण्याचा विचार न्यायालयाने केला होता. परंतु, या चुकीसाठी पोलीस प्रशिक्षण अभ्यासक्रमातील त्रुटीदेखील कारणीभूत असल्याची बाब लक्षात घेता, न्यायालयाने शाहू यांना लाक्षणिक स्वरूपात केवळ एक रुपया भरपाई मंजूर केली व हा एक रुपया नाईक यांच्या वेतनातून कपात करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. शाहू यांच्यातर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस