शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कोळसा संकटाने राज्यात वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 07:00 IST

Nagpur News राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत.

ठळक मुद्देचार युनिटचे उत्पादन ठप्प

कमल शर्मा

नागपूर : राज्यातील औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाच्या टंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध असल्याने राज्यातील वीज केंद्र संवेदनशील स्थितीत पोहोचले आहेत. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील चार युनिटचे उत्पादन कोळसा नसल्याने ठप्प पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक ६ सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो. (Coal crisis in power stations in the state; Only two days stock available)

 

तीन दिवसापेक्षा कमी कोळशाचा स्टॉक असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते. राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत. महाजेनकोच्या सूत्रानुसार, सर्वाधिक कोळशाचा पुरवठा वेकोलिकडून होतो. परंतु मागील अनेक दिवसापासून अपेक्षित १८ रॅकऐवजी केवळ १० रॅकचा पुरवठा होत आहे. सर्व कोळसा कंपन्यांमधून दररोज २५ रॅक कोळशाचा पुरवठा अपेक्षित असतो. परंतु सध्या सरासरी १८ रॅक मिळत आहेत. यामुळे वीज केंद्रांमधील स्टॉक कमी होत चालला आहे. सूत्रांचा असा दावा आहे की, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माेठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने कोळसा उत्पादन प्रभावित झाले. वाहतुकीतही समस्या येत आहे. त्यामुळे स्टॉक कमी कमी होत चालला आहे. आता परिस्थिती अशी आहे की रोजच्या पुरवठ्यावर सर्वकाही अवलंबून आहे. गुरुवारी विजेची मागणी १८,०३७ मेगावॅट इतकी होती. ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला आहे. परंतु भविष्यात संकट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

-बंद पडले युनिट

कोळसा नसल्याने राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद पडले आहेत. यात चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ४, नाशिक येथील युनिट क्रमांक ५ व खापरखेडा येथील युनिट क्रमांक १ व २ यांचा समावेश आहे. कोराडीतील एक युनिट आपात्कालीन कारणांमुळे बंद आहे. येतील एक युनिट कोळशाअभावी कधीही बंद पडू शकतो.

 

- एनटीपीसी, खासगी क्षेत्रही प्रभावित, गॅसचाही तुटवडा

कोळसा संकटामुळे मौदा येथील एनटीपीसी औष्णिक वीज केंद्रातील एक युनिटही ठप्प पडले आहे. खासगी क्षेत्रही प्रभावित झाले आहे. अदानी तिरोडा वीज केंद्रातील उत्पादन कमी झाले आहे. तर रतन इंडियाचे एक युनिट व सीजीपीएलचे दोन युनिट बंद करावे लागले. दुसरीकडे गॅसआधारित उरण प्रकल्पातील एक युनिट गॅस उपलब्ध नसल्याने बंद आहे.

टॅग्स :electricityवीज