शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

"..तर, राज्य तासाभरात लोडशेडिंगमुक्त होऊ शकते"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 12:21 IST

उर्जामंत्री विविध कारणे सांगून महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत, असा आरोप भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्दे या सरकारने महाराष्ट्राला अंधारात ढकलण्याचं काम केलयं, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

नागपूर : वारंवार सांगूनही राज्य सरकारने जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कोळशाचा स्टॉक केला नाही. व आता केंद्र सरकारवर त्याच खापर फोडत आहेत. दुसरीकडे राज्याचे उर्जामंत्री विविध कारणे सांगून महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत. महाविकास आघाडी सरकार आपलं पाप केंद्रावर ढकलतायत, असा आरोप भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे केला. 

मागील सरकारपेक्षा जास्त कोळसा या सरकारला देण्यात आला, केंद्राने मदत केली पण २५०० मेगावॉटचे प्लांट बंद पडले यात राज्य सरकारचं फेल्युअर आहे, असे बावनकुळे म्हणले. उर्जामंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जात असून एक नंबरच विजेचं राज्य असलेल्या महाराष्ट्राला या सरकारने अंधारात टाकण्याचं काम केल्याचेही बावनकुळे म्हणाले. सरकारनं भ्रष्टाचाराचं मूळ सोडलं तर राज्य एका तासाच्या आत लोडशेडिंगमुक्त होऊ शकते, अशी खोचक टीकाही बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केली. 

आज राज्यात वीज टंचाईचे संकट आहे, अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू असून जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. भाजप सरकारच्या काळात एकही तासाचे लोडशेडिंग नव्हते, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मात्र, महाविकास आघाडीतील मंत्री आपसात वाद करीत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. 

वीज खरेदीमध्ये एक मोठा भ्रष्टाचार करण्याचा या सरकारचा उद्देश्य आहे. महाराष्ट्राला लोडशेडिंग दाखवायची, आपले प्लांट ब्रेक डाऊन दाखवायचे आणि दुसरीकडे महागडी वीज खरेदी करून जनतेकडून पैसा वसूल करायचा. आणि त्या महागड्या वीज खरेदीमध्ये युनिटवाईज भ्रष्टाचार करायचा, हा या सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप बावनकुळेंनी केला. 

टॅग्स :electricityवीजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNitin Rautनितीन राऊतBJPभाजपाMLAआमदार