शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

"..तर, राज्य तासाभरात लोडशेडिंगमुक्त होऊ शकते"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2022 12:21 IST

उर्जामंत्री विविध कारणे सांगून महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत, असा आरोप भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

ठळक मुद्दे या सरकारने महाराष्ट्राला अंधारात ढकलण्याचं काम केलयं, चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

नागपूर : वारंवार सांगूनही राज्य सरकारने जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कोळशाचा स्टॉक केला नाही. व आता केंद्र सरकारवर त्याच खापर फोडत आहेत. दुसरीकडे राज्याचे उर्जामंत्री विविध कारणे सांगून महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत. महाविकास आघाडी सरकार आपलं पाप केंद्रावर ढकलतायत, असा आरोप भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे केला. 

मागील सरकारपेक्षा जास्त कोळसा या सरकारला देण्यात आला, केंद्राने मदत केली पण २५०० मेगावॉटचे प्लांट बंद पडले यात राज्य सरकारचं फेल्युअर आहे, असे बावनकुळे म्हणले. उर्जामंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जात असून एक नंबरच विजेचं राज्य असलेल्या महाराष्ट्राला या सरकारने अंधारात टाकण्याचं काम केल्याचेही बावनकुळे म्हणाले. सरकारनं भ्रष्टाचाराचं मूळ सोडलं तर राज्य एका तासाच्या आत लोडशेडिंगमुक्त होऊ शकते, अशी खोचक टीकाही बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केली. 

आज राज्यात वीज टंचाईचे संकट आहे, अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू असून जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. भाजप सरकारच्या काळात एकही तासाचे लोडशेडिंग नव्हते, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मात्र, महाविकास आघाडीतील मंत्री आपसात वाद करीत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. 

वीज खरेदीमध्ये एक मोठा भ्रष्टाचार करण्याचा या सरकारचा उद्देश्य आहे. महाराष्ट्राला लोडशेडिंग दाखवायची, आपले प्लांट ब्रेक डाऊन दाखवायचे आणि दुसरीकडे महागडी वीज खरेदी करून जनतेकडून पैसा वसूल करायचा. आणि त्या महागड्या वीज खरेदीमध्ये युनिटवाईज भ्रष्टाचार करायचा, हा या सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप बावनकुळेंनी केला. 

टॅग्स :electricityवीजMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNitin Rautनितीन राऊतBJPभाजपाMLAआमदार