शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना : विदर्भात १३८ शेतकऱ्यांनी पैसे भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:49 IST

‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेत विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १० हजार ५०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील १३८ शेतकऱ्यांनी महावितरणकडून मागणी पत्र दिल्यावर आवश्यक पैसे जमा केले आहेत.

ठळक मुद्देदहा हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेत विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत १० हजार ५०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील १३८ शेतकऱ्यांनी महावितरणकडून मागणी पत्र दिल्यावर आवश्यक पैसे जमा केले आहेत.पूर्ण राज्यात मार्च- २०१९ पर्यंत ५० हजार सौर कृषी पंप लावण्याचे महावितरणचे नियोजन आहे. राज्यात आतापर्यंत ५९ हजार ९५७ शेतकरी बांधवानी महावितरणकडे ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेत अर्ज केले आहेत. विदर्भात सर्वाधिक अर्ज वाशीम जिल्ह्यातून आले आहेत. येथे २५१६ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यातील ४१० शेतकऱ्यांना महावितरणकडून मागणीपत्र दिल्यावर २० शेतकऱ्यांनी पैसे जमा केले आहेत. नागपूर जिल्ह्यात ८०१ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून यातील २६२ जणांना मागणीपत्र दिले आहे. यातील ५४ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. येथून १०५८ अर्ज आले आहेत. भंडारा जिल्ह्यातून ८८९ अर्ज आले असून २४४ जणांना मागणीपत्र महावितरणकडून देण्यात आले आहे.या योजनेत शेतकऱ्यांना तीन आणि पाच अश्वशक्तीचे सौर कृषी पंप वितरित करण्यात येणार आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना तीन अश्वशक्तीसाठी २५,५०० रुपये तर पाच अश्वशक्तीसाठी ३८,५०० रुपये एवढी रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभाथ्यार्ला अर्धी म्हणजे १२,७५० रुपये आणि १९,२५० रुपये भरावे लागणार आहेत. शाश्वत जलस्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपरिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषी पंप देण्यात येणार आहेत. योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात व्हॉट्स अ‍ॅपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता समाज माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. काही शेतकऱ्यांचे अर्ज तांत्रिक चुकांमुळे बाद झाले आहेत. तरी शेतकरी बांधवांनी अर्ज भरतेवेळी पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी