शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तुमच्यासारखे गोविंद बागेत गेलो नाही; मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 05:52 IST

‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले. 

लोकमत न्यूज नेटवर्क   

नागपूर: प्रबोधनकारांनी अंधश्रद्धा,  कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, त्याच प्रबोधनकारांचे वारसदार लिंबू फिरवण्याची भाषा करू लागले आहेत. या लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका करतानाच ‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले. 

रेशीमबागेत गेलो म्हणून मला हिणवले, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम करतो आहे, त्यामुळे रेशीमबागेत गेलो, तुमच्यासारखे गोविंदबागेत गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांंना अप्रत्यक्षरीत्या लगावला.  

अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा   

विधानसभेत राजकीय भाषण होत नाही; पण तुम्ही सारखे तेच सांगत आहात. सहा महिन्यांपूर्वी काय घडले हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तुम्ही त्यातून बाहेर या, आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात, असल्या छोट्या-छोट्या गोष्टींत मन रमवू नका. तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांना जास्त टार्गेट करत आहात. मुले म्हणून सोडून द्या, तुमच्या  प्रवक्त्यांना बाहेर बोलायला सांगा, सभागृहात ते सांगू नका, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

सरकारला सहा महिने पूर्ण

सरकार स्थापन झाले त्याला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले. तो धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार पूर्ण कालावधी भक्कमपणे पूर्ण करील; तसेच येणाऱ्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती बहुमताने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.  

अजित पवारांना टोला 

मनात असूनही सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना आपण मोकळेपणाने दाद दिली नाही, हे मला जाणवले. तुमच्यावर महाविकास आघाडीचा दबाव असू शकतो, हे मी समजू शकतो. आपण माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत बसलात. ते करण्यापेक्षा घेतलेले निर्णय मोजले असते तर बरे वाटले असते, असा टोला शिंदेंनी अजित पवारांना लगावला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे