शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

नागपूर दंगलीतून शिंदेंकडून तुमची कोंडी?; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा संताप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:54 IST

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis: नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्‍यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारमधील एक उपमुख्यमंत्रीच हे घडवून आणत असतील, असा दावा ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी नागपुरातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "असं वक्तव्य करणं हा मूर्खपणा आहे. काही लोकं अशा घटनांमध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. घटना गंभीर आहे, या घटनेला कोणताही राजकीय अँगल नाही. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांना कठोर शासन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. 

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "ज्या शहराबद्दल आपण बोलतोय, त्या नागपूरमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येतात. जेव्हा पेटवा पेटवी होत होती, तेव्हा पोलीस उशिराने आले असं तिथले स्थानिक बोलत आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, ठिणगी पडते तेव्हा त्याचे इंटेलिजेंस रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकार बनल्यानंतर बीड असेल, परभणी असेल बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यात कधीतरी फोटो लीक होतात. माध्यमात काही गोष्टी येतात. कदाचित जे पेटवा पेटवी करत आहेत, त्यात मंत्रिमंडळातील काही लोक असतील. मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री भाषण करतात. आपण किती मोठे आहोत, आपलं वाचन आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर ते बोलले. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, हे लोकांसमोर आले पाहिजे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असं नाही. काही तरी गडबड आहे. एकमेकांवर बऱ्याचदा टीकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे त्यांच्या युतीमधीलच कुणी फडणवीसांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय का, याचा विचार केला पाहिजे," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाnagpurनागपूर