शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपूर दंगलीतून शिंदेंकडून तुमची कोंडी?; आदित्य ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा संताप, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 15:54 IST

आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

CM Devendra Fadnavis: नागपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीदरम्यान गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्‍यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारमधील एक उपमुख्यमंत्रीच हे घडवून आणत असतील, असा दावा ठाकरे यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याचा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेत हे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याविषयी नागपुरातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "असं वक्तव्य करणं हा मूर्खपणा आहे. काही लोकं अशा घटनांमध्येही राजकारण करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. घटना गंभीर आहे, या घटनेला कोणताही राजकीय अँगल नाही. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या लोकांना कठोर शासन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. 

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

नागपूर हिंसाचाराबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं की, "ज्या शहराबद्दल आपण बोलतोय, त्या नागपूरमधून राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री येतात. जेव्हा पेटवा पेटवी होत होती, तेव्हा पोलीस उशिराने आले असं तिथले स्थानिक बोलत आहेत. जेव्हा अशा घटना घडतात, ठिणगी पडते तेव्हा त्याचे इंटेलिजेंस रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे येणे गरजेचे असते. महाराष्ट्रात सरकार बनल्यानंतर बीड असेल, परभणी असेल बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. त्यात कधीतरी फोटो लीक होतात. माध्यमात काही गोष्टी येतात. कदाचित जे पेटवा पेटवी करत आहेत, त्यात मंत्रिमंडळातील काही लोक असतील. मुख्यमंत्र्यांनंतर एक उपमुख्यमंत्री भाषण करतात. आपण किती मोठे आहोत, आपलं वाचन आहे हे दाखवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनंतर ते बोलले. सरकारमध्ये कुणीतरी असं आहे जे मुख्यमंत्र्यांना जुमानत नाही, हे लोकांसमोर आले पाहिजे. सरकारमध्ये सर्व काही ठीक आहे असं नाही. काही तरी गडबड आहे. एकमेकांवर बऱ्याचदा टीकाटिप्पणी करत असतात. त्यामुळे त्यांच्या युतीमधीलच कुणी फडणवीसांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय का, याचा विचार केला पाहिजे," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला होता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाnagpurनागपूर