शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:33 IST

मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले.

ठळक मुद्देकोरोनासारखे आजार टाळायचे असल्यास पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाचे स्वास्थ्य हे पृथ्वीच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण व मेंदूचा घनिष्ठ संबंध असतो. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या रोगामुळे पर्यावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘कोविड-१९’ हा प्राणिमात्राची संबंधित रोग आहे. मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, कोरोनासंदर्भात आणखी एक बाब संशोधनातून सामोर आली. या रोगामुळे फुफ्फुसे निकामी होतात आणि रुग्ण दगावतो. मेंदूमध्ये विषाणूचा प्रभाव झाल्याने विशेषत: मेंदूमध्ये श्वासाचे जे केंद्र आहे, त्यात बिघाड झाल्यामुळे असे होते.प्रदूषणामुळे १८ लाख लोक मृत्युमुखी पडतातडॉ. मेश्राम म्हणाले, पर्यावरणातील प्रदूषणामुळे व वायुप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जगात दरवर्षी वायुप्रदूषणामुळे ९० लोक मृत्युमुखी पडतात तर भारतात ही संख्या साधारण १८ लाख एवढी आहे. एड्स, क्षयरोग व मलेरिया या सर्वांमुळे जेवढे लोक दगावतात त्यापेक्षा जास्त लोक एकट्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी दगावतात.३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूतनुकत्याच झालेल्या संशोधनामुळे हे लक्षात आले की, ३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूत ठरते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील ९० टक्के लोक प्रदूषित वायूमध्ये श्वास घेतात. यामुळे पक्षाघाताशिवाय, स्वमग्नता, लक्षात न राहणे, एकाग्रता न होणे हे रोग लहान मुलांमध्ये होतात, तर मोठ्यांमध्ये स्मृतिभ्रंश व पार्किन्सनसारखे आजार होतात. आवाजातील प्रदूषणामुळे ‘आॅबर्शन’ाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातूनही समोर आले असल्याचेही डॉ. मेश्राम म्हणाले.भारतात दोन तृतियांश लोकांकडून घातक इंधनाचा वापरजगातील ३०० कोटी लोक स्वयंपाकासाठी घातक इंधनाचा वापर करतात. भारतात दोन तृतियांश लोक घातक इंधनाचा वापर करीत असल्याचेही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात सर्वाधिक २० प्रदूषित शहरे आहेत त्यापैकी १६ शहरे एकट्या भारतात आहे. यामुळे आजच्या घडीला सर्वांनी मिळून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणcorona virusकोरोना वायरस बातम्या