शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
2
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
3
टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
4
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
5
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
6
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
7
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
8
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
9
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
10
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
11
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
12
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
13
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
14
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...
15
नोकरी गमावली, वडिलांनी घराबाहेर काढलं..तरुणाने उभं केलं कोट्यवधींचे साम्राज्य, नेमकं काय करतो?
16
रिन्यूएबल्स, डिफेन्ससह फायनान्समधील 'हे' ५ स्टॉक्स देतील जबरदस्त परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राईज
17
हलगर्जीपणाचा कळस! नर्सने रागात चुकीची आयव्ही लाईन लावली, इन्फेक्शनमुळे हात कापण्याची वेळ
18
Diwali 2025: मनी प्लांटचा 'डबल धमाका'! दिवाळीत 'या' दिवशी' खरेदी करा, दुप्पट लाभ मिळवा!
19
HCL-TCS Salary Hike: एचसीएल आणि टीसीएस कर्मचाऱ्यांना मिळालं दिवाळी गिफ्ट; इनक्रिमेंट आणि बोनसची घोषणा
20
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

पर्यावरणाचा व मेंदूचा घनिष्ठ संबंध :चंद्रशेखर मेश्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 23:33 IST

मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले.

ठळक मुद्देकोरोनासारखे आजार टाळायचे असल्यास पर्यावरणाचे संवर्धन गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाचे स्वास्थ्य हे पृथ्वीच्या स्वास्थ्याशी संबंधित आहे. विशेष म्हणजे, पर्यावरण व मेंदूचा घनिष्ठ संबंध असतो. जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या रोगामुळे पर्यावरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘कोविड-१९’ हा प्राणिमात्राची संबंधित रोग आहे. मानवाला होणारे ७५ टक्के संसर्गजन्य रोग प्राण्यांपासून होतात. त्यामुळे पुढील काळात जर असे साथीचे आजार टाळायचे असतील तर पर्यावरणाचे संवर्धन करणे फार आवश्यक आहे, असे आवाहन जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने ते ‘लोकमत’शी बोलत होते. डॉ. मेश्राम म्हणाले, कोरोनासंदर्भात आणखी एक बाब संशोधनातून सामोर आली. या रोगामुळे फुफ्फुसे निकामी होतात आणि रुग्ण दगावतो. मेंदूमध्ये विषाणूचा प्रभाव झाल्याने विशेषत: मेंदूमध्ये श्वासाचे जे केंद्र आहे, त्यात बिघाड झाल्यामुळे असे होते.प्रदूषणामुळे १८ लाख लोक मृत्युमुखी पडतातडॉ. मेश्राम म्हणाले, पर्यावरणातील प्रदूषणामुळे व वायुप्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जगात दरवर्षी वायुप्रदूषणामुळे ९० लोक मृत्युमुखी पडतात तर भारतात ही संख्या साधारण १८ लाख एवढी आहे. एड्स, क्षयरोग व मलेरिया या सर्वांमुळे जेवढे लोक दगावतात त्यापेक्षा जास्त लोक एकट्या वायू प्रदूषणामुळे दरवर्षी दगावतात.३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूतनुकत्याच झालेल्या संशोधनामुळे हे लक्षात आले की, ३० टक्के पक्षाघाताला वायूप्रदूषण कारणीभूत ठरते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगातील ९० टक्के लोक प्रदूषित वायूमध्ये श्वास घेतात. यामुळे पक्षाघाताशिवाय, स्वमग्नता, लक्षात न राहणे, एकाग्रता न होणे हे रोग लहान मुलांमध्ये होतात, तर मोठ्यांमध्ये स्मृतिभ्रंश व पार्किन्सनसारखे आजार होतात. आवाजातील प्रदूषणामुळे ‘आॅबर्शन’ाचे प्रमाण महिलांमध्ये जास्त असल्याचे एका अभ्यासातूनही समोर आले असल्याचेही डॉ. मेश्राम म्हणाले.भारतात दोन तृतियांश लोकांकडून घातक इंधनाचा वापरजगातील ३०० कोटी लोक स्वयंपाकासाठी घातक इंधनाचा वापर करतात. भारतात दोन तृतियांश लोक घातक इंधनाचा वापर करीत असल्याचेही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जगात सर्वाधिक २० प्रदूषित शहरे आहेत त्यापैकी १६ शहरे एकट्या भारतात आहे. यामुळे आजच्या घडीला सर्वांनी मिळून पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणcorona virusकोरोना वायरस बातम्या