शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारताला ३ ट्रिलियन डाॅलरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:30 IST

Nagpur News हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देगेल्या २० वर्षात ७९ बिलियन डाॅलरचा फटकाजीडीपीचा ताेटा २ टक्क्यांवर

:

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदलामुळे हाेणारे नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महापूर, भूस्खलन, चक्रीवादळे, उष्ण लहरी किंवा शीतलहरींमुळे हाेणारे नुकसान हे थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. वर्ल्ड मेटरालाॅजिकल ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे. देशाचा जीडीपी १ टक्क्याने कमी झाला असून २०५० पर्यंत हे नुकसान तब्बल ३ ट्रिलियन डाॅलरवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाचे सदस्य सुरेश चाेपणे यांनी हवामान बदलाच्या परिणामांचे विश्लेषण केले. त्सुनामी, महापूर यामुळे अनेक नागरी वस्त्यांना फटका बसताे, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, राेजगार असे बरेच प्रश्न निर्माण हाेतात. जंगलावर, जैवविविधतेवर परिणाम हाेतात. अतिपाऊस, अवकाळी पावसाने शेतीला नुकसान हाेते. शेकडाे वर्षांपासून शेतकरी ऋतूंच्या ठराविक वेळेनुसार शेतीची मशागत करीत आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे शेतीला फटका बसला आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी पाऊस येणे हे त्याचे उदाहरण आहे. यामुळे अन्नसुरक्षा प्रभावित झाली असून अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली आहे. केवळ शेती नाही तर हवामान बदलाच्या प्रत्येक घडामाेडीमुळे मॅनुफॅक्चरिंग, रिटेल, टूरिझम, बांधकाम क्षेत्र, ट्रान्सपाेर्ट उद्याेगालाही फटका सहन करावा लागताे आहे आणि या घटनांचे सातत्य वाढले आहे. ही खरी धाेक्याची घंटा आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आकलनापेक्षा किती तरी अधिक असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशात ५० वर्षांत ३५० माेठ्या घटना

- १९९० ते २०२० पर्यंत सरासरी १.५ डिग्री तापमान वाढले.

- १९७० ते २०२० दरम्यान देशात हवामान बदलाच्या ३५० घटना घडल्या.

- त्सुनामी, मुंबईचा महापूर, केरळचा महापूर, चेन्नई पूर, केदारनाथ भूस्खलन, लेह भुस्खलन, पूर्व-पश्चिम दिशेची भारतीय वादळे, उष्ण लहरी, थंड लहरी.

- भारतातील ७५ टक्के जिल्हे हे क्लायमेट हॉटस्पॉट आहेत.

- देशातील २७ टक्के भूभागावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.

- मागील १५ वर्षांत ७९ जिल्हे हे दुष्काळ प्रभावित आणि २६ जिल्हे वादळे प्रभावित झाले आहेत.

भारताची स्थिती काय?

- भारताचा जागतिक हवामान बदल जोखीम निर्देशांक ७ वा आहे.

- भारताचा हवामान आपत्ती निर्देशांक ३ रा आहे.

-भारताचे गेल्या २० वर्षांत ७९.५ बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- भारताचे अति पावसामुळे १० बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- ‘काॅस्ट ऑफ क्लायमेट रिस्क इन इंडिया’च्या अहवालानुसार भविष्यात देशाचा दरवर्षी २.६ टक्के जीडीपी कमी होईल.

- १ डिग्री तापमान वाढीमुळे देशाचा ३ टक्के जीडीपी कमी होऊ शकतो. २०५० पर्यंत ४ टक्के जीडीपी कमी होण्याचा धोका.

 

देशातील कमी होत चाललेले जंगल, वाढलेले प्रदूषण आणि शहरीकरण यामुळे हवामान बदलाची गती वाढली आहे. देशाच्या एकूणच प्रगतीत हवामान बदल अडसर ठरत असून एकूण जीडीपीचे २% नुकसान होत आहे. आपण त्वरित हवामान बदल रोखू शकलो नाही तर देशाच्या सर्वच क्षेत्राचे, विशेषतः कृषी, आरोग्य आणि पर्यटन उद्योगाचे फार नुकसान होणार आहे.

- सुरेश चाेपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट साेसायटी

टॅग्स :pollutionप्रदूषण