शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलामुळे २०५० पर्यंत भारताला ३ ट्रिलियन डाॅलरचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 07:30 IST

Nagpur News हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे.

ठळक मुद्देगेल्या २० वर्षात ७९ बिलियन डाॅलरचा फटकाजीडीपीचा ताेटा २ टक्क्यांवर

:

निशांत वानखेडे

नागपूर : ग्लाेबल वार्मिंग आणि हवामान बदलामुळे हाेणारे नुकसान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. महापूर, भूस्खलन, चक्रीवादळे, उष्ण लहरी किंवा शीतलहरींमुळे हाेणारे नुकसान हे थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. वर्ल्ड मेटरालाॅजिकल ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार हवामान बदलाच्या घडामाेडीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मागील २० वर्षांत ७९.५ बिलियन डाॅलरचा फटका सहन करावा लागला आहे. देशाचा जीडीपी १ टक्क्याने कमी झाला असून २०५० पर्यंत हे नुकसान तब्बल ३ ट्रिलियन डाॅलरवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

केंद्रीय वने, पर्यावरण आणि जल वायू परिवर्तन मंत्रालयाचे सदस्य सुरेश चाेपणे यांनी हवामान बदलाच्या परिणामांचे विश्लेषण केले. त्सुनामी, महापूर यामुळे अनेक नागरी वस्त्यांना फटका बसताे, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, राेजगार असे बरेच प्रश्न निर्माण हाेतात. जंगलावर, जैवविविधतेवर परिणाम हाेतात. अतिपाऊस, अवकाळी पावसाने शेतीला नुकसान हाेते. शेकडाे वर्षांपासून शेतकरी ऋतूंच्या ठराविक वेळेनुसार शेतीची मशागत करीत आले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत ऋतुचक्रात झालेल्या बदलामुळे शेतीला फटका बसला आहे. ऐन पीक काढण्याच्या वेळी पाऊस येणे हे त्याचे उदाहरण आहे. यामुळे अन्नसुरक्षा प्रभावित झाली असून अन्नधान्य आयात करण्याची वेळ आली आहे. केवळ शेती नाही तर हवामान बदलाच्या प्रत्येक घडामाेडीमुळे मॅनुफॅक्चरिंग, रिटेल, टूरिझम, बांधकाम क्षेत्र, ट्रान्सपाेर्ट उद्याेगालाही फटका सहन करावा लागताे आहे आणि या घटनांचे सातत्य वाढले आहे. ही खरी धाेक्याची घंटा आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा आकलनापेक्षा किती तरी अधिक असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

देशात ५० वर्षांत ३५० माेठ्या घटना

- १९९० ते २०२० पर्यंत सरासरी १.५ डिग्री तापमान वाढले.

- १९७० ते २०२० दरम्यान देशात हवामान बदलाच्या ३५० घटना घडल्या.

- त्सुनामी, मुंबईचा महापूर, केरळचा महापूर, चेन्नई पूर, केदारनाथ भूस्खलन, लेह भुस्खलन, पूर्व-पश्चिम दिशेची भारतीय वादळे, उष्ण लहरी, थंड लहरी.

- भारतातील ७५ टक्के जिल्हे हे क्लायमेट हॉटस्पॉट आहेत.

- देशातील २७ टक्के भूभागावर प्रतिकूल प्रभाव पडला आहे.

- मागील १५ वर्षांत ७९ जिल्हे हे दुष्काळ प्रभावित आणि २६ जिल्हे वादळे प्रभावित झाले आहेत.

भारताची स्थिती काय?

- भारताचा जागतिक हवामान बदल जोखीम निर्देशांक ७ वा आहे.

- भारताचा हवामान आपत्ती निर्देशांक ३ रा आहे.

-भारताचे गेल्या २० वर्षांत ७९.५ बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- भारताचे अति पावसामुळे १० बिलियन डॉलरचे नुकसान झाले.

- ‘काॅस्ट ऑफ क्लायमेट रिस्क इन इंडिया’च्या अहवालानुसार भविष्यात देशाचा दरवर्षी २.६ टक्के जीडीपी कमी होईल.

- १ डिग्री तापमान वाढीमुळे देशाचा ३ टक्के जीडीपी कमी होऊ शकतो. २०५० पर्यंत ४ टक्के जीडीपी कमी होण्याचा धोका.

 

देशातील कमी होत चाललेले जंगल, वाढलेले प्रदूषण आणि शहरीकरण यामुळे हवामान बदलाची गती वाढली आहे. देशाच्या एकूणच प्रगतीत हवामान बदल अडसर ठरत असून एकूण जीडीपीचे २% नुकसान होत आहे. आपण त्वरित हवामान बदल रोखू शकलो नाही तर देशाच्या सर्वच क्षेत्राचे, विशेषतः कृषी, आरोग्य आणि पर्यटन उद्योगाचे फार नुकसान होणार आहे.

- सुरेश चाेपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट साेसायटी

टॅग्स :pollutionप्रदूषण