शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पाणीटंचाई व अतिक्रमणाच्या विळख्यातून आमची सुटका करा, जनसुनावणीत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2022 17:18 IST

नागरिकांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रांरीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुनावणी घेतली.

ठळक मुद्देवांजरा, पांजरा व कळमनातील नागरिक त्रस्त

नागपूर : शहराच्या काही भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. याचे पडसाद सोमवारी महापालिका मुख्यालयात आयोजित समस्या व तक्रारीवरील सुनावणीत उमटले. वांजरा, पांजरा व कळमना भागातील तसेच उत्तर नागपुरातील नागरिकांनी पाणीटंचाई व अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करून यातून सुटका करण्याची मागणी केली. तर उत्तर नागपुरातील रखडलेल्या पाईप लाईनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

नागरिकांच्या विविध विषयांच्या अनुषंगाने प्राप्त तक्रांरीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सुनावणी घेतली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीना, राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन यांच्यासह रेल्वे, जिल्हाधिकारी कार्यालय व नासुप्रचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सुबोध नंदागवळी व बालमुकुंद जनबंधू यांनी वांजरा, पांजरा आणि कळमना येथे नळजोडणी देण्याची मागणी केली. सुरेश पाटील, सतीश पाली, मनोज सांगोळे, राकेश निकोसे यांनी उत्तर नागपुरातील पाणीटंचाईची समस्या मांडली. यावर नितीन राऊत यांनी मनपा आणि नासुप्रला समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

भांडेवाडी येथे इसाई धर्मीयांसाठी दफनभूमीची मागणी ॲड. विपीन बाबर आणि फादर जोसेफ बाबर यांनी केली. संपूर्ण इसाई धर्मीयांसाठी दफनभूमी असावी, यादृष्टीने जागा देण्यासंदर्भात पालकमंत्र्यांनी यावेळी सूचित केले. मनपाद्वारे इसाई धर्मीयांना अटी आणि शर्तीच्या अधीन राहून जागेचे पालकत्व देण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

मोमिनपुरा येथील मुस्लीम लायब्ररीच्यासंदर्भात नुरूल हक आणि असलम मुल्ला खान यांनी समस्या मांडली. लीज नूतनीकरण करण्याची मागणी केली. मुस्लीम लायब्ररीचा ताबा मनपाने स्वत:कडे घेउन अन्य अतिक्रमण हटवून या जागेवर सुरक्षा भिंत बांधण्याचे निर्देश नितीन राऊत यांनी मनपाला दिले.

रेल्वेच्या जागेवरील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करा

भीमनगर झोपडपट्टी व जुना जरिपटका रेल्वे लाईनच्या बाजूला मागील ६० वर्षांपासून वसलेल्या झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी विनोद सोनकर, सुरेश जग्यासी, नेपाल शाह आणि विकास गौर यांनी केली. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी संवाद साधणार असल्याचे नितीन राऊत म्हणाले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणीNitin Rautनितीन राऊत