नागरिकांनी लसीकरणाबाबत भीती बाळगू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:40+5:302021-03-26T04:09:40+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेविड लसीकरणाबाबत ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाला असून, नागरिकांनी या लसीकरणाबाबत भीती बाळगू नये, ...

नागरिकांनी लसीकरणाबाबत भीती बाळगू नये
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेविड लसीकरणाबाबत ग्रामीण भागात संभ्रम निर्माण झाला असून, नागरिकांनी या लसीकरणाबाबत भीती बाळगू नये, असे आवाहन तहसीलदार सचिन यादव यांनी केले आहे.
तालुक्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधिग्रस्त गंभीर रुग्णांसाठी लसीकरण माेहीम सुरू केली आहे. कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषद हद्दीत ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे तसेच ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र तिष्टी, धापेवाडा, गोंडखैरी, मोहपा व ॲलाेपॅथिक दवाखाना तेलकामठी येथे लसीकरण सुरू आहे. २४ मार्चपर्यंत कळमेश्वर-ब्राह्मणी शहरी भागात ३,२५४ तर ग्रामीण भागात ४,५८९ नागरिकांचे लसीकरण, असे एकूण ७,८४३ नागरिकांना काेविड लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणामुळे व्यक्तीस कोणत्याही प्रकारची दुखापत वा इजा किंवा हानी हाेत नाही. त्यामुळे मनात भीती न बाळगता अधिकाधिक नागरिकांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कळमेश्वर-ब्राम्हणी नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय येथे नाव नोंदणी करून कोविड लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन तहसीलदार यादव यांनी केले आहे.