शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

नागरिकांनी बंद पाडला नागपुरातील रामेश्वरीचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:36 PM

सोमवारी रामेश्वरी व काशीनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भरणारा अनधिकृत बाजार परिसरातील नागरिकांनी बंद पाडला.

ठळक मुद्देआयुक्त मुंढे यांच्यापासून घेतली प्रेरणा : मोकळ्या जागेत उद्यान व समाजभवन उभारण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत आणि रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजारांचे अतिक्रमण काढण्याचा धडाका लावला आहे. या मोहिमेत नागरिकांनीही आता सहभाग घ्यायला सुरुवात केली आहे. याचा प्रत्यय सोमवारी रामेश्वरी व काशीनगर परिसरात आला. गेल्या अनेक वर्षांपासून तेथे भरणारा अनधिकृत बाजार परिसरातील नागरिकांनी बंद पाडला.मागील काही वर्षांपासून काशीनगर येथील सम्राट अशोक कॉलनी परिसरात दर सोमवारी अनधिकृत साप्ताहिक बाजार भरतो. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र, याची दखल घेतली जात नव्हती. आठवडी बाजारातील अतिक्रमणामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. गुन्हेगारी घटनाही वाढल्या होत्या.दरम्यान तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच अनधिकृत आठवडी बाजारांवर कारवाई सुरू केली. नियोजित जागेवरच बाजार भरावा, त्यांच्या या भूमिकेचे समर्थन करीत सम्राट अशोक कॉलनी काशीनगर, रामेश्वरी रहिवासी कृती समिती व सम्राट अशोक कॉलनी बुद्ध विहार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिसरातील सोमवार बाजार भरणार नाही, अशी भूमिका घेतली. प्रशासनाच्या कारवाईची वाट न बघता त्यांनी स्वत:च हा बाजार भरू नये, यासाठी पुढाकार घेतला आणि बाजार भरू दिला नाही.सायंकाळी काही बाजारातील विक्रेते आणि स्थानिक रहिवासी यांच्यात वाद झाला. यानंतर अजनी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आणि मनपा कर्मचाऱ्यांनी येऊन स्थितीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही दुकानदार आंदोलनाला विरोध करण्यासही पुढे आले. परंतु महिलांनी पुढाकार घेऊन एकही दुकान लावू दिले नाही.सम्राट अशोक कॉलनी काशीनगर रहिवासी कृती समितीच्या अनिता कांबळे, सुनिता मगरे, संध्या पाटील, ज्योती झोडापे, भूपेंद्र बोरकर, डॉ. मधुकर मून, भीमराव मगरे, शिरीष जंगले, सचिन बोईनवार, सचिन श्रीवास, रोशन शेंडे, सोनू उपासक, अमित उपासक, अभय शंभरकर, अमीय पाटील, अर्जुन चव्हाण, राहुल येन्नावार आदी नागरिकांनी बाजार बंद करण्यात सक्रिय सहभाग नोंदविला.उद्यान, समाज भवन उभारारामेश्वरी परिसरात महापालिकेची मोकळी जागा आहे. येथे बाजार बसविण्याचा घाट या सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे. परंतु, दाट वस्तीसह रस्त्यांची समस्या असलेल्या या पट्ट्यात बाजाराऐवजी परिसरातील नागरिकांना गरज असलेले उद्यान, वाचनालय, समाज भवन, खेळाचे मैदान निर्माण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.जनतेचे आयुक्त अशी प्रतिमाआयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बाजारासह निकृष्ट कामांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. प्रशासनाच्या चांगल्या कारवाईत स्वत: नागरिक योगदान देत असल्यामुळे संपूर्ण शहरात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास अनधिकृत कामांवर वचक बसेल, असे बोलतानाच तुकाराम मुंढे केवळ मनपाचे नव्हे तर खºया अर्थाने जनतेचे आयुक्त होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.असामाजिक तत्त्वाची दगडफेकरामेश्वरी भागात घरांच्या दारासमोर बाजाराची दुकाने व ग्राहकांची गर्दी यामुळे अनेकांचे घरातून बाहेर निघणे बंद झाले आहे. स्थानिक नागरिकांना वेळप्रसंगी घरातून गाडी काढणे, प्रसंगी रुग्णाला सेवा पुरविणे कठीण झाले आहे. बाजारामुळे परिसरात घाण पसरते. लघुशंका, धूम्रपान, मद्यपान, शिवीगाळ आदींमुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या सोमवारी एका घरावर असामाजिक तत्त्वाने दगडफेक करून खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन हा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Marketबाजारagitationआंदोलन