शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

नागपुरातील कोराडी व खापरखेडाजवळच्या २१ गावातील नागरिक पीत आहेत विषारी पाणी; हानीकारक घटकांचे प्रमाण १५ पट अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 20:07 IST

Nagpur News काेराडी आणि खापरखेडा या दाेन्ही औष्णिक वीज प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

ठळक मुद्देवीज केंद्राजवळ सर्वेक्षणातील भयावह वास्तव 

 

नागपूर : काेराडी आणि खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पामुळे हाेणाऱ्या वायूप्रदूषणाची कल्पना बहुतेकांना आहे. मात्र, वीज केंद्रातील राखेमुळे जलप्रदूषणाची स्थिती त्याहून भयावह झालेली आहे. दाेन्ही प्रकल्पांच्या आसपासच्या २१ गावांमधील घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये फ्लायॲशमधले आर्सेनिक, मर्क्युरी, फ्लाेराईडसारखे विषारी घटक माेठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. त्यामुळे या सर्व गावांमधील नागरिक पाण्याच्या रूपात विष पित आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट (सीएफएसडी), नागपूर, मंथन अध्ययन केंद्र, पुणे आणि असर साेशल इम्पॅक्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिकांच्या सहभागातून केलेल्या अभ्यासात हे वास्तव समाेर आले आहे. सीएफएसडीच्या संचालक लीना बुद्धे, मंथनचे समन्वयक श्रीपाद धर्माधिकारी यांनी या अभ्यासातील माहिती लाेकमतला दिली. फ्लायॲशच्या नमुन्यांमध्ये पीएम-२.५ व पीएम-१० च्या कणांसह आर्सेनिक, कॅडमियम, क्राेमियम, लेड, मॅंगनीज, मर्क्युरी, काेबाल्ट आदी जड धातूंचे घटक माेठ्या प्रमाणात असतात. हेच विषारी घटक आसपासच्या परिसरातील भूपृष्ठावरील पाणी, भूजलाच्या नमुन्यातही आढळले. टीमने २५ ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात माेठ्या प्रमाणात गढूळपणा, जडपणा, क्षार व विरघळलेले घनतत्व आढळून आले.

यापेक्षा गंभीर म्हणजे या सर्व नमुन्यात सर्वात धाेकादायक मानले जाणारे मर्क्युरी, आर्सेनिक, लिथियम, अल्युमिनियम, सेलेनियम, आयर्न, काॅपर, निकेल, झिंक, फ्लाेराईड, ॲन्टिमाॅनी, बाेराेन, माॅलिबडेनम आदी विषारी घटकांचे प्रमाण सुरक्षित पाण्याच्या निकषाच्या १५ पट अधिक आढळून आले. यातील काही ठिकाणच्या नमुन्यात मर्क्युरी, आर्सेनिक व अल्युमिनियमचे प्रमाण माेठ्या प्रमाणात आहे. कन्हान नदी काठावरील ठिकाणी घेतलेल्या नमुन्यात अल्युमिनियम १०० पट अधिक हाेते. खैरी गावाजवळच्या नमुन्यात मर्क्युरी व फ्लाेराईडचे प्रमाण ५०पट अधिक आढळले. हे पाणी पिण्यासाठी, आंघाेळ, कपडे धुण्यासह इतर घरघुती उपयाेग, मासेमारी, सिंचन व गुरांसाठीही वापरले जाते. या गावातील नागरिक अनेक गंभीर आजारांच्या विळख्यात सापडले असून, त्यांना गंभीर धाेक्यात जगावे लागत आहे.

१८ गावे राखेने बाधित

सर्वेक्षण केलेल्या २१ गावांपैकी १८ गावे दाेन्ही वीज केंद्रातून उत्सर्जन व धुरांड्याद्वारे निघणाऱ्या काेळशाच्या राखेने बाधित झाली आहेत. लाेकांच्या घराच्या छतावर, पाण्याचे साठे, माेकळ्या जागा व वाहनांवर दरराेज राख साचून राहते. ही राख पिकांवर साचून राहते. त्यामुळे पिकांची वाढ थांबते, उत्पन्नात घट हाेते तसेच जनावरे व दुग्ध उत्पादनांवर परिणाम हाेत आहे.

वाॅटर एटीएमचे पाणीही बाधित

शुद्ध पाणी मिळावे म्हणून प्रकल्पाजवळच्या गावांमध्ये वाॅटर एटीएम लावण्यात आले. या एटीएमच्या पाण्यातही कमी प्रमाणात असले तरी विषारी घटक आढळल्याचे श्रीपाद धर्माधिकारी यांनी सांगितले.

नागपूरला येणारे पाणीही प्रदूषित

कन्हान नदीवरूनच नागपूर शहराला पाणीपुरवठा हाेताे. मागील वेळी नदी पात्रात राख साचल्याने पाणीपुरवठा बाधित झाला हाेता. शहरातील पाण्याचे नमुने तपासले नसले तरी राखेतील विषारी घटकांचे प्रदूषण शहरात येणाऱ्या पाण्यातही असण्याची शक्यता धर्माधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणHealthआरोग्य