शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सचिवांपासून शिपायापर्यंत ओळखपत्र सक्तीचे शासनाचे परिपत्रक

By admin | Updated: May 10, 2014 02:21 IST

शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना पटावी, यासाठी आता मुख्य सचिवांपासून ...

 कार्यालयात ओळखपत्र लावूनच करावे लागणार काम

नागपूर : शासकीय कार्यालयात काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची ओळख सर्वसामान्य नागरिकांना पटावी, यासाठी आता मुख्य सचिवांपासून तर शिपायापर्यंतच्या कर्मचार्‍यापर्यंत सर्वांनाच कार्यालयात काम करताना ओळखपत्र लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. पी.एस. मीना यांनी बुधवारी त्यासंबंधीचे परिपत्रकच जारी केले आहे. राज्यातील नागरिक त्यांच्या कामाच्या निमित्ताने निरनिराळ्या शासकीय कार्यालयात येत असतात. त्यांच्या कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांचे नाव व पदनाम माहिती होण्यासाठी किंवा त्यांची भेट घेण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांची ओळख पटणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचारी आणि अधिकार्‍यांना ओळखपत्र जारी करण्यात आलेले असते. परंतु शासकीय कार्यालयात हजर असलेले अधिकारी कर्मचारी ओळखपत्र वापरत नाहीत. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांची ओळख पटविण्यास अडचण येते. अनेकदा याचा गैरफायदा घेतला जातो. स्वत:ला अधिकारी व कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकारही होत असतात. एखाद्या जागरुक नागरिकाने अधिकार्‍याकडे ओळखपत्राची मागणी केल्यास दाखविले जात नाही. यासंबंधात शासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या. विधानसभा आणि विधान परिषदेमध्येसुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला होता. या सर्व बाबींची सामान्य प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार आता सर्वांनाच ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले आहे. इतकेच नव्हे तर सर्व शासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयात असताना त्यांचे ओळखपत्र त्यांनी दर्शनी भागावर लावावे. जेणेकरून नागरिकांना ते दिसेल व संबंधितांची ओळख पटविता येईल, असे परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. तसेच यात कुचराई करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही जारी केले आहेत. (प्रतिनिधी)