शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 17:54 IST

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे.

नागपूर : सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर आमच्या अस्तित्वावर घाला घालणार असाल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघराहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. तर, सावरकरांचा सतत अपमान करणांऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार कसे काय फिरु शकतात? अशी खोचक टीका ठाकरेंवर केली.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचा निषेध म्हणून पुतळे जाळण्यात येत आहेत. नागपुरातही भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्यावतीने चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत राहुल गांधींचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. 

एका बाजूला सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करायची आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्याचे चिरंजीव आदित्य ठाकरे करत आहेत. ज्यांच्या विचाराने जाज्वल्य इतिहास उजळला त्यांची महाराष्ट्रात अवहेलना केली जाते, हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न महाष्ट्रातला प्रत्येकजण विचारतोय, असे वाघ म्हणाल्या. पुढे बोलताना, कुणीतरी काहीतरी लिहून द्यायचं आणि आपण ते म्हणायचं ही कसली राजकीय प्रगल्भता? ही तर राजकीय दिवाळखोरी आहे, अशी खोचक त्यांनी टीका राहुल गांधींवर केली.

तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? 

संजय राठोडबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण आरोप करण्याचा नाही, असे त्या म्हणाल्या. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी माझी लढाई सोडलेली नाही. संजय राठोडविरुद्धचा लढा सुरुच राहणार. संजय राठोड यांच्याशी माझी वैयक्तिक दुश्मनी नाही. पण जे झालं ते चुकीच होतं आणि त्यासाठीच मी लढत होते, असही त्यांनी सांगितलं. यवतमाळमध्ये झालेल्या पत्रपरिषदेवरुन प्रश्न विचारला असता, तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. तुम्हाला जर इतक वाटत असेत तर तुम्हीही माझ्या लढ्यात सहभागी व्हा असे म्हणत चुकली असेल तर एक हजारदा चित्रा वाघ माफी मागेल पण एक महिला म्हणून घेरत असाल तर मी पण चित्रा वाघ आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा

राज्यात गत तीन महिन्यांपासून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारने पुढाकार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार दूर व कमी व्हावे यावर आमचे कार्य सुरू असून, महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गत तीन महिन्यांत जिथे महिलांवर अत्याचार झाले, त्यामधील संबंधितांवर लगेच कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच्या सरकारने विविध घटनांवर डोळेझाकपणा करून महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, असेही त्या म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे