शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बाळासाहेबांचे वारसदार..; चित्रा वाघ यांची ठाकरेंवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2022 17:54 IST

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे.

नागपूर : सावरकरांचा अपमान हा देशाचा अपमान आहे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही जर आमच्या अस्तित्वावर घाला घालणार असाल तर ते आम्ही कधीही खपवून घेणार नाही, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघराहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाल्या. तर, सावरकरांचा सतत अपमान करणांऱ्यासोबत बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार कसे काय फिरु शकतात? अशी खोचक टीका ठाकरेंवर केली.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी राहुल गांधींचा निषेध म्हणून पुतळे जाळण्यात येत आहेत. नागपुरातही भाजप युवा मोर्चा आणि महिला आघाडीच्यावतीने चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत राहुल गांधींचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला. 

एका बाजूला सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करायची आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचे हात बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्याचे चिरंजीव आदित्य ठाकरे करत आहेत. ज्यांच्या विचाराने जाज्वल्य इतिहास उजळला त्यांची महाराष्ट्रात अवहेलना केली जाते, हे कसं काय शक्य आहे असा प्रश्न महाष्ट्रातला प्रत्येकजण विचारतोय, असे वाघ म्हणाल्या. पुढे बोलताना, कुणीतरी काहीतरी लिहून द्यायचं आणि आपण ते म्हणायचं ही कसली राजकीय प्रगल्भता? ही तर राजकीय दिवाळखोरी आहे, अशी खोचक त्यांनी टीका राहुल गांधींवर केली.

तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? 

संजय राठोडबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना चित्रा वाघ पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसून आले. तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण आरोप करण्याचा नाही, असे त्या म्हणाल्या. माझी भूमिका स्पष्ट आहे, मी माझी लढाई सोडलेली नाही. संजय राठोडविरुद्धचा लढा सुरुच राहणार. संजय राठोड यांच्याशी माझी वैयक्तिक दुश्मनी नाही. पण जे झालं ते चुकीच होतं आणि त्यासाठीच मी लढत होते, असही त्यांनी सांगितलं. यवतमाळमध्ये झालेल्या पत्रपरिषदेवरुन प्रश्न विचारला असता, तुम्हाला मानापमान आहे आम्हाला नाही का? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. तुम्हाला जर इतक वाटत असेत तर तुम्हीही माझ्या लढ्यात सहभागी व्हा असे म्हणत चुकली असेल तर एक हजारदा चित्रा वाघ माफी मागेल पण एक महिला म्हणून घेरत असाल तर मी पण चित्रा वाघ आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

अशी तर गांधींचीही पत्रं दाखवता येतील; रणजीत सावरकरांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर, तक्रारीत अटकेची मागणी

महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा

राज्यात गत तीन महिन्यांपासून महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सरकारने पुढाकार घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. महिलांवर होणारे अत्याचार दूर व कमी व्हावे यावर आमचे कार्य सुरू असून, महिलांची सुरक्षा हाच आमचा अजेंडा असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गत तीन महिन्यांत जिथे महिलांवर अत्याचार झाले, त्यामधील संबंधितांवर लगेच कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच्या सरकारने विविध घटनांवर डोळेझाकपणा करून महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, असेही त्या म्हणाल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :PoliticsराजकारणChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे