शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

नागपूरच्या सुधारगृहातून मुलांचे सिनेस्टाईल पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:19 IST

विविध गुन्ह्यात आरोपी म्हणून पकडलेली आणि अल्पवयीन असल्यामुळे सुधारगृहात ठेवण्यात आलेली पाच मुले जरीपटक्यातील सुधारगृहातून शनिवारी रात्री पळून गेली. आपल्याला पळून जाताना अडवू नये म्हणून त्यांनी कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. या घटनेमुळे सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकर्मचाऱ्याच्या डोळ्यात फेकली मिरची पूड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विविध गुन्ह्यात आरोपी म्हणून पकडलेली आणि अल्पवयीन असल्यामुळे सुधारगृहात ठेवण्यात आलेली पाच मुले जरीपटक्यातील सुधारगृहातून शनिवारी रात्री पळून गेली. आपल्याला पळून जाताना अडवू नये म्हणून त्यांनी कर्मचाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. या घटनेमुळे सुधारगृह प्रशासन आणि पोलिसांत प्रचंड खळबळ उडाली आहे.जरीपटक्यातील पाटणकर चौकात हे सुधारगृह आहे. शनिवारी रात्री सुधारगृहाचा एक कर्मचारी जेवण वाढण्याच्या तयारीत होता तर, अन्य जण आपापल्या कामात व्यस्त होते. प्रवेशद्वारावर कुणीच नसल्याची संधी साधून रात्री ७ ते ८ च्या सुमारास जेवण वाढायला आलेल्या कर्मचाऱ्याच्या डोळ्यात पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पाच जणांनी मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. तो अर्धमेल्या अवस्थेत पडल्यानंतर आरोपी पळून गेले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सुधारगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांनी आधी वरिष्ठांना आणि नंतर जरीपटका पोलिसांना कळविले. पोलिसांनी लगेच परिसरात नाकेबंदी करून पळून गेलेल्या मुलांची शोधाशोध सुरू केली, मात्र वृत्त लिहिस्तोवर कुणीही हाती लागले नव्हते. यासंबंधाने अधिक माहिती देण्यासाठी जरीपटका ठाण्यात वारंवार प्रयत्न करूनही पोलिसांकडून माहिती किंवा जखमी कर्मचाऱ्याचे नाव मिळाले नाही.विशेष म्हणजे, येथील सुरक्षा व्यवस्था अत्यंत तकलादू आहे. त्यामुळे येथून मुले पळून जाण्याच्या घटना वर्षभरात किमान दोन ते तीनवेळा घडतात. दोन वर्षांपूर्वी एकाच वेळी चक्क २२ मुले या सुधारगृहातून पळून गेली होती. मात्र, या घटना थांबविण्यासाठी प्रभावी उपाययोजना होत नाही. त्यामुळे आजही तसेच झाले.हत्याकांडातील आरोपी?पळून जाणाऱ्यांमध्ये तिघे खापरखेड्यातील आकाश पानपत्ते याच्या हत्येच्या आरोपात ताब्यात घेतलेले आरोपी होते. त्यांनी १६ डिसेंबर २०१७ ला पानपत्तेच्या डोक्यात गोळ्या घालून त्याची सिनेस्टाईल हत्या केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पळून जाण्याचा कट त्यांनी आधीच रचला होता. त्यासाठी त्यांनी मिरची पावडर आधीच जमवून ठेवली होती.टाईल्सने फोडले कुलूपआरोपींनी पळून जाण्यासाठी मिरची पावडरसोबतच आतमध्ये लावलेल्या टाईल्सचाही वापर केला. या टाईल्सने त्यांनी प्रवेशद्वाराला लावलेले तीन कुलूप तोडले, अशी माहिती घटनास्थळावरील सूत्रांनी लोकमत प्रतिनिधीला दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या कर्मचा-याच्या डोळळ्यात मिरची पावडर फेकून आरोपींनी मारहाण केली. त्या कर्मचा-याचे नाव ताराचंद नेवारे असून ते तेथे सुरक्षा रक्षकासोबतच मदतनिसाचेही काम करतात. 

 

टॅग्स :nagpurनागपूरCrimeगुन्हा