शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 17:51 IST

काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता.

खापरखेडा (नागपूर) : आई व वडिलांचे काेराेनामुळे निधन झाल्याने अनाथ झालेले भाऊ-बहीण त्यांच्या काकांकडे भानेगाव (ता. सावनेर) येथे राहायला आले. मात्र, काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनीही घर साेडले. तर, खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांच्या पथकाने त्या दाेघांचा शाेध घेत त्यांना नागपूर शहरातील मानकापूर भागातून यशस्वीरीत्या ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मावस भावाच्या ताब्यात दिले. 

अंश हरीश झारिया (११) व हंसिका हरीश झारिया (१३) अशी या भाऊ व बहिणीची नावे आहेत. आई-वडिलांच्या निधनानंतर अंश व हंसिका वर्षभरापूर्वी महाराजपूर, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश येथून त्यांच्या उपासे ले आऊट, भानेगाव येथे काकाकडे राहायला आले हाेते. काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनी घर साेडण्याचा निर्णय घेत मंडला, मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या त्यांच्या आजीकडे जाण्याचे ठरविले हाेते. त्यातच दाेघांनी शुक्रवारी (दि. १०) दुपारी घर साेडले. तेथे जाण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी नागरिकांकडे पैसे मागून ते जमा केले हाेते. याच पैशातून दाेघांनी कामठी शहर गाठले.

कामठी फिरत असताना दाेघेही भानेगाव येथील एका ऑटाेचालकास दिसले. त्याने दाेघांनाही आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यावर त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली. त्या ऑटोचालकाने त्यांच्या गाेव्यात राहणाऱ्या सावत्र भावाला फोन करून माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरून ऑटाेचालकाने त्या दाेघांनाही त्याच्या मानकापूर, नागपूर येथे राहणाऱ्या मावस भावाकडे साेडून दिले.

घर साेडतेवेळी काका-काकू घरी नव्हते. घरी परत आल्यावर त्यांना दाेघेही घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल करून त्या दाेघांचे अपहरण करण्यात आल्याचे पाेलिसांना सांगितले. शिवाय, पाेलिसांनीही तातडीने त्या दाेघांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. पाेलिसांच्या एका टीमला कामठी शहरात ताे ऑटाेचालक भेटला. त्याच्या माध्यमातून पाेलिसांनी मानकापूर गाठले आणि त्या दाेघांना ताब्यात घेतले. पाेलिसांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाेघांनाही त्यांच्या मावस भावाच्या स्वाधीन केले. 

पैशासाठी छळ

अंश व हंसिका त्यांच्या आई व वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भानेगाव येथील काकांकडे राहायला आले हाेते. दाेघांचाही काेराेनामुळे मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. घर साेडण्यापूर्वी दाेघांनीही ‘आम्ही घर साेडून जात आहे. तुम्ही खुश राहा’ अशा आशयाचे पत्र लिहून ते दाराच्या कडीत ठेवले हाेते.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर