शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 17:51 IST

काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता.

खापरखेडा (नागपूर) : आई व वडिलांचे काेराेनामुळे निधन झाल्याने अनाथ झालेले भाऊ-बहीण त्यांच्या काकांकडे भानेगाव (ता. सावनेर) येथे राहायला आले. मात्र, काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनीही घर साेडले. तर, खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांच्या पथकाने त्या दाेघांचा शाेध घेत त्यांना नागपूर शहरातील मानकापूर भागातून यशस्वीरीत्या ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मावस भावाच्या ताब्यात दिले. 

अंश हरीश झारिया (११) व हंसिका हरीश झारिया (१३) अशी या भाऊ व बहिणीची नावे आहेत. आई-वडिलांच्या निधनानंतर अंश व हंसिका वर्षभरापूर्वी महाराजपूर, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश येथून त्यांच्या उपासे ले आऊट, भानेगाव येथे काकाकडे राहायला आले हाेते. काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनी घर साेडण्याचा निर्णय घेत मंडला, मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या त्यांच्या आजीकडे जाण्याचे ठरविले हाेते. त्यातच दाेघांनी शुक्रवारी (दि. १०) दुपारी घर साेडले. तेथे जाण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी नागरिकांकडे पैसे मागून ते जमा केले हाेते. याच पैशातून दाेघांनी कामठी शहर गाठले.

कामठी फिरत असताना दाेघेही भानेगाव येथील एका ऑटाेचालकास दिसले. त्याने दाेघांनाही आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यावर त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली. त्या ऑटोचालकाने त्यांच्या गाेव्यात राहणाऱ्या सावत्र भावाला फोन करून माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरून ऑटाेचालकाने त्या दाेघांनाही त्याच्या मानकापूर, नागपूर येथे राहणाऱ्या मावस भावाकडे साेडून दिले.

घर साेडतेवेळी काका-काकू घरी नव्हते. घरी परत आल्यावर त्यांना दाेघेही घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल करून त्या दाेघांचे अपहरण करण्यात आल्याचे पाेलिसांना सांगितले. शिवाय, पाेलिसांनीही तातडीने त्या दाेघांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. पाेलिसांच्या एका टीमला कामठी शहरात ताे ऑटाेचालक भेटला. त्याच्या माध्यमातून पाेलिसांनी मानकापूर गाठले आणि त्या दाेघांना ताब्यात घेतले. पाेलिसांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाेघांनाही त्यांच्या मावस भावाच्या स्वाधीन केले. 

पैशासाठी छळ

अंश व हंसिका त्यांच्या आई व वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भानेगाव येथील काकांकडे राहायला आले हाेते. दाेघांचाही काेराेनामुळे मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. घर साेडण्यापूर्वी दाेघांनीही ‘आम्ही घर साेडून जात आहे. तुम्ही खुश राहा’ अशा आशयाचे पत्र लिहून ते दाराच्या कडीत ठेवले हाेते.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर