शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने पालक हिरावले, काका-ककूंनीही पैशासाठी छळले; कंटाळून भाऊ-बहिणीने घरच सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 17:51 IST

काेराेनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता.

खापरखेडा (नागपूर) : आई व वडिलांचे काेराेनामुळे निधन झाल्याने अनाथ झालेले भाऊ-बहीण त्यांच्या काकांकडे भानेगाव (ता. सावनेर) येथे राहायला आले. मात्र, काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनीही घर साेडले. तर, खापरखेडा (ता. सावनेर) पाेलिसांच्या पथकाने त्या दाेघांचा शाेध घेत त्यांना नागपूर शहरातील मानकापूर भागातून यशस्वीरीत्या ताब्यात घेतले आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मावस भावाच्या ताब्यात दिले. 

अंश हरीश झारिया (११) व हंसिका हरीश झारिया (१३) अशी या भाऊ व बहिणीची नावे आहेत. आई-वडिलांच्या निधनानंतर अंश व हंसिका वर्षभरापूर्वी महाराजपूर, जिल्हा मंडला, मध्य प्रदेश येथून त्यांच्या उपासे ले आऊट, भानेगाव येथे काकाकडे राहायला आले हाेते. काका व काकूचा त्रास असह्य झाल्याने दाेघांनी घर साेडण्याचा निर्णय घेत मंडला, मध्य प्रदेश येथे राहणाऱ्या त्यांच्या आजीकडे जाण्याचे ठरविले हाेते. त्यातच दाेघांनी शुक्रवारी (दि. १०) दुपारी घर साेडले. तेथे जाण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी नागरिकांकडे पैसे मागून ते जमा केले हाेते. याच पैशातून दाेघांनी कामठी शहर गाठले.

कामठी फिरत असताना दाेघेही भानेगाव येथील एका ऑटाेचालकास दिसले. त्याने दाेघांनाही आस्थेवाईकपणे विचारपूस केल्यावर त्यांनी संपूर्ण हकीकत सांगितली. त्या ऑटोचालकाने त्यांच्या गाेव्यात राहणाऱ्या सावत्र भावाला फोन करून माहिती दिली. त्याच्या सांगण्यावरून ऑटाेचालकाने त्या दाेघांनाही त्याच्या मानकापूर, नागपूर येथे राहणाऱ्या मावस भावाकडे साेडून दिले.

घर साेडतेवेळी काका-काकू घरी नव्हते. घरी परत आल्यावर त्यांना दाेघेही घरी नसल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल करून त्या दाेघांचे अपहरण करण्यात आल्याचे पाेलिसांना सांगितले. शिवाय, पाेलिसांनीही तातडीने त्या दाेघांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. पाेलिसांच्या एका टीमला कामठी शहरात ताे ऑटाेचालक भेटला. त्याच्या माध्यमातून पाेलिसांनी मानकापूर गाठले आणि त्या दाेघांना ताब्यात घेतले. पाेलिसांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाेघांनाही त्यांच्या मावस भावाच्या स्वाधीन केले. 

पैशासाठी छळ

अंश व हंसिका त्यांच्या आई व वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भानेगाव येथील काकांकडे राहायला आले हाेते. दाेघांचाही काेराेनामुळे मृत्यू झाल्याने सरकारने अंश व हंसिकाला आर्थिक मदत मंजूर केली हाेती. हा पैसा आपल्याला मिळावा, अशी त्यांच्या काका-काकूची इच्छा हाेती. याच कारणामुळे त्यांनी अंश व हंसिकाचा छळ सुरू केला हाेता. घर साेडण्यापूर्वी दाेघांनीही ‘आम्ही घर साेडून जात आहे. तुम्ही खुश राहा’ अशा आशयाचे पत्र लिहून ते दाराच्या कडीत ठेवले हाेते.

टॅग्स :Socialसामाजिकnagpurनागपूर