शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राज्यात बालमृत्यूचा दर घसरतोय : आरोग्यमंत्र्यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:19 IST

राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देइस्पितळात दाखल नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण ८ टक्क्यांवर

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यात बालमृत्यूची समस्या कायम असली तरी बालमृत्यूच्या दरामध्ये सातत्याने घट होत आहे. २०११ मध्ये मृत्यूचा दर २५ इतका होता. तो २०१६ मध्ये १९ वर पोहोचला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधान परिषदेत दिली. हेमंत टकले, शरद रणपिसे, संजय दत्त इत्यादी सदस्यांनी या मुद्यावर लक्षवेधी सूचना मांडली होती.केंद्र शासनाच्या ‘एसआरएस’ या सर्वेक्षणानुसार राज्यातील बालमृत्यूचा दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. नवजात बालकांवर उपचारासाठी राज्यात त्रिस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. प्रत्येक प्रसूतीगृह व शस्त्रक्रियागृहामध्ये ‘न्यू बॉर्न केअर कॉर्नर’, ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालयस्तरावर ‘न्यू बॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट’ आणि जिल्हा रुग्णालयस्तरावर ‘स्पेशल न्यू बॉर्न केअर युनिट’ कार्यरत आहे. राज्यात सद्यस्थितीत ३६ ‘एसएनसीयू’ कार्यान्वित असून, दरवर्षी ५० हजारांहून अधिक बालकांवर उपचार करण्यात येतात. २०११-१२ मध्ये येथील मृत्यूंचे प्रमाण १२ टक्के इतके होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये हेच प्रमाण ८ टक्क्यांवर आले असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.नाशिकमध्ये आॅगस्ट महिन्यात ३४५ नवजात बालके दाखल झाली व यातील ५५ बालकांचा मृत्यू झाला. अपुऱ्या दिवसाचे बाळ, जन्मत: श्वसनावरोध, श्वसनाचा आजार, जंतूसंसर्ग इत्यादी कारणांमुळे हे मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Healthआरोग्य