शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दहावीची परीक्षा आटोपताच नातीला बोहल्यावर चढवण्याचा बेत; बाल सरंक्षण कक्षाच्या सतर्कनतेने टळला अनर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 16:49 IST

पीडित मुलीचे आईवडील विभक्त राहतात. ती आजी-आजोबांकडे राहते. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे.

ठळक मुद्देआई-वडील विभक्त; आजी-आजोबा लावत होते विवाह

नागपूर : लहानपणापासून तिच्या वाट्याला आनंदाचे क्षण आलेच नाहीत. थोडं समजायला लागलं तर आई-वडील कौटुंबिक वादातून विभक्त झाले. आजी-आजोबाने पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, या जबाबदारीतून मोकळे होण्यासाठी दहावीची परीक्षा आटोपताच तिचे लग्न लावून देण्याचा बेत आखला. बोहल्यावर चढण्याच्या एक दिवसापूर्वी  सुदैवाने शासकीय पथक तिच्या घरी धडकले व बालविवाह रोखला.

तिचा विवाह शुक्रवारी मध्यप्रदेशातील लांजी येथील मुलासोबत जरीपटका परिसलात होणार होता. चाईल्ड लाईनद्वारे ही माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाल्यानंतर जरीपटका भागात राहत असलेल्या मुलीच्या घरी पथकाने धडक दिली. मुलीच्या वयाचे कागदपत्र तपासले असता ती १६ वर्षांची असल्याचे निदर्शनास आले. पथकाने बाल विवाह प्रतिबंध कायदा २००६ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून बालविवाह थांबविला. जोपर्यंत मुलीचे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत लग्न लाऊ नये. अन्यथा बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी समज आजी-आजोबांना देण्यात आली. 

दरम्यान, गेल्या दीड वर्षात जिल्हा बाल संरक्षण कक्षाने पंधरावर बालविवाह थांबविले आहेत. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, विनोद शेंडे, साधना ठोंबरे, पोलीस निरीक्षक रुपाली फटींग, मुख्य सेविका दीपाली पवार, सारिका बारापात्रे, स्नेहलता गजभिये, वनिता नंदेश्वर आदी सहभागी होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नnagpurनागपूर