शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

विटभट्ट्यांच्या निखाऱ्यावर कोमेजतेय बालपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 11:38 IST

धान पिकाची कापणी केल्यानंतर विटांच्या निर्मितीला सुरुवात केली जाते. कमी मजुरी द्यावी लागत असल्याने बालमजुरांना माेठ्या प्रमाणात कामावर ठेवले जाते.

ठळक मुद्देबालकामगार कायद्याचे उल्लंघन ग्रीन बेल्टमध्ये भट्ट्यांचे प्रमाण अधिक

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कामठी तालुक्यातील खैरी, खसाळा, म्हसाळा, कवठा, वारेगाव, सुरादेवी, शिरपूर, पावनगावसह अन्य शिवार ‘ग्रीन बेल्ट’ असताना या शिवारात विटांच्या भट्ट्यांची संख्या बरीच माेठी आहे. या भट्ट्या नियमबाह्य आहेत. यातील बहुतांश भट्ट्यांवर माेठ्या प्रमाणात बालमजुरांकडून काम करवून घेतले जात असल्याने विटभट्ट्यांचे मालक बालकामगार कायद्याचे खुलेआम उल्लंघन करीत असताना प्रशासन कारवाई करण्याची तसदी घेत नाही.

कामठी तालुक्यातील बहुतांश विटांच्या भट्ट्या १० ते १२ वर्षांपासून आहेत. या शिवारात शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळत नाही. मात्र, वीटभट्टी मालकांना विटांच्या उत्पादनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाते. महसूल विभागाने तालुक्यात माेजक्याच व्यक्तींना विटा तयार करण्याचा अधिकृत परवाना दिला असून, अनेकांच्या भट्ट्या अवैध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारला दरवर्षी या अवैध भट्ट्यांमुळे लाखाे रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागत आहे. या अवैध भट्ट्यावाल्यांना महसूल, पाेलीस व प्रशासनातील इतर अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

धानाच्या पिकाची कापणी केल्यानंतर विटांच्या निर्मितीला सुरुवात केली जाते. कमी मजुरी द्यावी लागत असल्याने बालमजुरांना माेठ्या प्रमाणात कामावर ठेवले जाते. या भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून लाकडांचा वापर केला जात असून, त्यासाठी अवैधरीत्या वृक्षताेडही केली जाते. दगडी काेळसा वापरला जात असून, काही काेळसा चाेरीचा वापरला जाताे. मातीच्या खाेदकामादरम्यान माेठे खड्डे तयार झाले आहेत. ते धाेकादायक खड्डे बुजविण्याची तसदीही कुणीही घेत नाही. हा संपूर्ण प्रकार प्रशासनाला माहिती असून, आर्थिक लागेबांधे असल्याने कुणीही कारवाई करीत नाही.

धुरामुळे प्रदूषणात वाढ

या वीटभट्ट्यांमधून निघणाऱ्या सततच्या धुरामुळे या भागात वायुप्रदूषण वाढत आहे. धुरामुळे या भागातील तापमान वाढत असल्याने शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या आराेग्यासह पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम हाेत आहे. या भट्ट्यांमुळे पिकांचे नुकसान हाेत असले तरी शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे व त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याकडे महसूल विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ लक्ष द्यायला तयार नाही.

अल्पवयीन मुलीचा मृत्यू

या विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या काेणत्याही कामगाराला अथवा बालकामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने काेणतीही साधने किंवा सुविधा पुरविली जात नाही. दाेन वर्षांपूर्वी शिरपूर शिवारातील विटांच्या भट्टीवर बालकामगार असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला हाेता. असे प्रकार अधूनमधून घडत असतात. मात्र, कामगारांच्या मृत्यूची दखलही प्रशासन घ्यायला तयार नाही.

राॅयल्टीचा गैरवापर

परवानाधारक भट्टीमालकांना महसूल विभागाने एक ब्रास मातीपासून १,५०० विटा तयार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, भट्टीमालक एक ब्रास मातीपासून किमान तीन हजार विटा तयार करतात. शिवाय, माती खाेदकाम व वाहतुकीच्या राॅयल्टीचा वारंवार वापर करून एका राॅयल्टीवर दिवसभर मातीची वाहतूक केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकLabourकामगार