शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

विटभट्ट्यांच्या निखाऱ्यावर कोमेजतेय बालपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 11:38 IST

धान पिकाची कापणी केल्यानंतर विटांच्या निर्मितीला सुरुवात केली जाते. कमी मजुरी द्यावी लागत असल्याने बालमजुरांना माेठ्या प्रमाणात कामावर ठेवले जाते.

ठळक मुद्देबालकामगार कायद्याचे उल्लंघन ग्रीन बेल्टमध्ये भट्ट्यांचे प्रमाण अधिक

सुदाम राखडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कामठी तालुक्यातील खैरी, खसाळा, म्हसाळा, कवठा, वारेगाव, सुरादेवी, शिरपूर, पावनगावसह अन्य शिवार ‘ग्रीन बेल्ट’ असताना या शिवारात विटांच्या भट्ट्यांची संख्या बरीच माेठी आहे. या भट्ट्या नियमबाह्य आहेत. यातील बहुतांश भट्ट्यांवर माेठ्या प्रमाणात बालमजुरांकडून काम करवून घेतले जात असल्याने विटभट्ट्यांचे मालक बालकामगार कायद्याचे खुलेआम उल्लंघन करीत असताना प्रशासन कारवाई करण्याची तसदी घेत नाही.

कामठी तालुक्यातील बहुतांश विटांच्या भट्ट्या १० ते १२ वर्षांपासून आहेत. या शिवारात शेतकऱ्यांना ओलितासाठी पाणी मिळत नाही. मात्र, वीटभट्टी मालकांना विटांच्या उत्पादनासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले जाते. महसूल विभागाने तालुक्यात माेजक्याच व्यक्तींना विटा तयार करण्याचा अधिकृत परवाना दिला असून, अनेकांच्या भट्ट्या अवैध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे राज्य सरकारला दरवर्षी या अवैध भट्ट्यांमुळे लाखाे रुपयांच्या महसुलावर पाणी साेडावे लागत आहे. या अवैध भट्ट्यावाल्यांना महसूल, पाेलीस व प्रशासनातील इतर अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

धानाच्या पिकाची कापणी केल्यानंतर विटांच्या निर्मितीला सुरुवात केली जाते. कमी मजुरी द्यावी लागत असल्याने बालमजुरांना माेठ्या प्रमाणात कामावर ठेवले जाते. या भट्ट्यांमध्ये इंधन म्हणून लाकडांचा वापर केला जात असून, त्यासाठी अवैधरीत्या वृक्षताेडही केली जाते. दगडी काेळसा वापरला जात असून, काही काेळसा चाेरीचा वापरला जाताे. मातीच्या खाेदकामादरम्यान माेठे खड्डे तयार झाले आहेत. ते धाेकादायक खड्डे बुजविण्याची तसदीही कुणीही घेत नाही. हा संपूर्ण प्रकार प्रशासनाला माहिती असून, आर्थिक लागेबांधे असल्याने कुणीही कारवाई करीत नाही.

धुरामुळे प्रदूषणात वाढ

या वीटभट्ट्यांमधून निघणाऱ्या सततच्या धुरामुळे या भागात वायुप्रदूषण वाढत आहे. धुरामुळे या भागातील तापमान वाढत असल्याने शेतकरी व शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या आराेग्यासह पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम हाेत आहे. या भट्ट्यांमुळे पिकांचे नुकसान हाेत असले तरी शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे व त्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याकडे महसूल विभाग व महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ लक्ष द्यायला तयार नाही.

अल्पवयीन मुलीचा मृत्यू

या विटांच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या काेणत्याही कामगाराला अथवा बालकामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने काेणतीही साधने किंवा सुविधा पुरविली जात नाही. दाेन वर्षांपूर्वी शिरपूर शिवारातील विटांच्या भट्टीवर बालकामगार असलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला हाेता. असे प्रकार अधूनमधून घडत असतात. मात्र, कामगारांच्या मृत्यूची दखलही प्रशासन घ्यायला तयार नाही.

राॅयल्टीचा गैरवापर

परवानाधारक भट्टीमालकांना महसूल विभागाने एक ब्रास मातीपासून १,५०० विटा तयार करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, भट्टीमालक एक ब्रास मातीपासून किमान तीन हजार विटा तयार करतात. शिवाय, माती खाेदकाम व वाहतुकीच्या राॅयल्टीचा वारंवार वापर करून एका राॅयल्टीवर दिवसभर मातीची वाहतूक केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकLabourकामगार