शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मुख्यमंत्र्यांनी एनसीआरबीच्या अहवालानुसार गुन्हेगारीवर बोलावे - धनंजय मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 17:44 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. 

नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी एनसीआरबीने भ्रष्टाचार, गुन्हेगारीचा अहवाल सादर केला होता. त्या अहवालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिम्मत असेल तर बोलावे, असा हल्लाबोल विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी राज्य सरकारवर आरोप केले. देशातील सध्या वातावरण पाहता असे आहे की, सरकार विरोधात बोलले की देशद्रोही ठरविले जाते. राज्य सरकारवर आरोप केले तर राज्याला बदनाम करतायत असे सांगितले जाते. आम्ही दिलेले पुरावे खोटे असतील तर आमच्यावर बदनामीचे खटले भरा. आम्हाला कुठल्याही चौकात शिक्षा द्या आम्ही तयार आहोत. मात्र, पुराव्यांची शहानिशा करा, असे धनंजय मुंडे म्हणाले. यापुढे म्हणाले, असंख्य पुरावे देऊनही राज्याचे मुख्यमंत्री मंत्र्यांना क्लिन चीट देतात. ११ कोटी जनतेचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री 11 जनतेची फसवणूक करत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यावर भ्रष्टाचार मुक्त करु असे म्हणाले होते. मात्र, सत्तेत आल्यापासून प्रथम क्रमांकाचे भ्रष्टाचार युक्त राज्य केले आहे. तसेच, आम्ही नागपूरला क्राइम वाढल्याची टीका केली. यावर मुख्यमंत्री म्हणातात विरोधक नागपूरला बदनाम करत आहेत. मग आता एनसीआरबीचा अहवाल भ्रष्टाचार, क्राईम वाढल्याचे सांगत आहे. या एनसीआरबीच्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी बोलावे, असेही धनंजय मुंडे म्हणाले. याचबरोबर, महिलांच्या विनयभंगाबाबतीत राज्य प्रथम क्रमांकावर आहे. असे असताना...मी लाभार्थी हे माझे सरकार, अशी जाहिरात करते. तसेच, बिहारला मागे टाकून महाराष्ट्र पुढे गेला आहे. त्यामुळे आता हे माझे सरकार अशी पुन्हा जाहीरात करणार का? असा सवालही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडे