शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

मुख्यमंत्री स्वबळावर सरकार खेचत आहे; जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 14:41 IST

केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देपत्रपरिषदेत मांडला सरकारच्या अपयशाचा लेखाजोखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथ्या वर्षातही राज्य सरकारची कामगिरी दिसत नाही. आर्थिक धोरणे सपशेल अपयश ठरलेली आहेत. कर्जमाफीची घोषणा करण्यात आली परंतु शेतकऱ्यांना लाभ झालेला दिसत नाही. प्रकल्पांच्या बाबतही अशीच अवस्था आहे. गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोलचे भाव लिटरमागे १० रुपयांनी अधिक आहे. केंद्राच्या आदेशानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वबळावर सरकार खेचत असून मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी मजा घेत असल्याची टीका राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार प्रकाश गजभिये उपस्थित होते.केंद्र व राज्य सरकारमधील अस्वस्थता विचारात घेता लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुका एकत्रित घेणार नाही. दोन्ही निवडणुका एकत्रित घेतल्यातर लोकसभेच्याही जागा कमी होतील अशी भाजपा नेत्यांना भिती आहे. या देशात जेव्हाजेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्यात आला. तेव्हातेव्हा मतदारांनी सत्ता बदल घडविला.. देशात अशीच परिस्थिती आहे. पुरोगामी विचाराचे राष्ट्रीवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भाजपा सारख्या जातीयवादी पक्षासोबत कधीही जाणार नाही. आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी पवार यांच्यावर आरोप केले जातात. गोपीनाथ मुुंडे, गो.रा. खैरनार यांनी असेच आरोप केले होते. आता डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीही अशाच प्रकारचे आरोप केले आहेत. वास्तविक भिमा कोरेगाव घटना घडताच हे मनुवाद्यांचे षडयंत्र असल्याचे पवारांनी स्पष्ट केल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.संभाजी भिडे तरुणांची डोकी भडकावण्याचे काम करतात. फुले, शाहू व आंबेडकरांवर ते कधी बोलत नाही. खा. उदयनराजे भोसले म्हणतात ते उच्च शिक्षित आहेत. परंतु ते शिकले कि ती आहे. त्यांनी कोणत्या पदव्या घेतलेल्या आहे. याचा भिडे यांनी जाहीर खुलासा करावा, असे आव्हाण देत भाजपाच्या राज्यात त्यांना अटक होण्याची शक्यता नसल्याचे आव्हाड यांनी सांगितले.न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरण विधिमंडळाच्या अधिवेशनात गाजणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. भिमा कोरेगाव प्रकरणाची न्यायालयीन चौकशी हा फार्स आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही. पंतप्रधात नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणाचा आजच्या परिस्थितीशी कोणताही संबंध नाही. त्यांनी चुकीचा इतिहास जनतेपुढे मांडला. मोदी देश सांभाळू शकतात तर मग अखिल भारतीय काँग्रेसचे अध्ययक्ष राहूल गांधी देश का सांभाळू शकणार नाहीत. असा सवाल आव्हाड यांनी प्रश्नाच्या उत्तरात केला.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस