शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर

By नरेश डोंगरे | Updated: November 5, 2025 06:42 IST

प्रशासनाचा गोंधळ; अधिकृत माहितीसाठी 'वेट अँड वॉच'

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: छत्तीसगडमधील बिलासपूरजवळ मंगळवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताच्या वृत्ताने सर्वत्र प्रवाशांच्या आणि नातेवाइकांच्या काळजात चर्रर झाले. त्यांचा आक्रोश सुरू असताना रेल्वे प्रशासनाने जारी केलेली हेल्पलाइन पुरती हेल्पलेस असल्याचे स्पष्ट झाले.

भारतीय रेल्वेच्या प्रत्येक झोन (विभाग)मधील अधिकाऱ्यांकडून छोट्या-छोट्या कामांचा गवगवा केला जातो. प्रत्येक गोष्ट चढवून बढवून सांगितली जाते. मात्र, अडचणीच्या वेळी रेल्वेचे बहुतांश वरिष्ठ अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात. जनसंपर्क अधिकारी हतबलता व्यक्त करतात. मंगळवारी दुपारी बिलासपूरजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर पुन्हा त्याचा प्रत्यय आला. अपघाताचे वृत्त कळाल्यानंतर हादरलेल्या प्रवाशांच्या ठिकठिकाणच्या नातेवाइकांनी स्थिती जाणून घेण्यासाठी रेल्वेने जारी केलेल्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क सुरू केले. मात्र, रात्री ९ वाजेपर्यंत कसलीही माहिती हेल्पलाइन नंबरवरून मिळत नव्हती.

'लोकमत' प्रतिनिधीने या संबंधाने शहानिशा करण्यासाठी रेल्वेच्या सर्वच हेल्पलाइनवर वारंवार संपर्क केले. मात्र, प्रतिसाद मिळत नव्हता. तर, घटनास्थळीच्या ९७५२४८५४९९ आणि ८६०२००७२०२ या दोन्ही क्रमांकावर अपघाताची माहिती मिळण्याऐवजी रेल्वेच्या १०० दिवसीय टीबी मुक्त जागरूकता अभियानाचा जागर होत होता. या संतापजनक प्रकाराबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे (बिलासपूर झोन) जनसंपर्क अधिकारी डॉ. सुष्कर विपूल यांच्याशी रात्री ९ पर्यंत प्रस्तुत प्रतिनिधीने वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांनीही फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. रेल्वेचे काही कर्मचारी 'वेट न वॉच'चा सल्ला देत होते.

डीआरएम यांच्याकडून दखल

लोकमतने रात्री दपूम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांना संपर्क केला. त्यांनी मृत अथवा जखमीबाबत कसलीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. अपघातस्थळी चार लाइन्स असल्याने रेल्वे संचालनावर फारसा प्रभाव पडला नाही, असेही स्पष्ट केले. संबंधित प्रवाशी तसेच नातेवाइकांची अस्वस्थता आणि हेल्पलेस हेल्पलाइनची जाणीव करून दिल्यानंतर त्यांनी स्थानिक पीआरओ मार्फत एक बुलेटीन जारी केले. त्यात अपघातामुळे नागपूर मार्गे धावणाऱ्या कोणत्या गाड्या प्रभावित झाल्या त्याची माहिती देण्यात आली.

दपूम रेल्वेच्या तीन गाड्या प्रभावित

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची कोरबा येथून ४.१० वाजता निघणारी ट्रेन नंबर १८५१७ कोरबा - विशाखापट्टनम एक्स्प्रेस ५ तास विलंबाने पोहचेल. कोरबा येथूनच सायंकाळी ६.१३ वाजता नागपूरसाठी निघणारी ट्रेन नंबर १८२३९ गेवरा रोड - नेताजी सुभाषचंद्र बोस एक्सप्रेस ३ तास ३० मिनिटे विलंबाने नागपूरकडे निघेल. बिलासपूरहून टाटानगरकडे सायंकाळी ६.५० वाजता निघणारी ट्रेन नंबर १८११४ ३ तास विलंबाने निघेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Train Accident: Relatives' Outcry, Helpless Helpline, TB Awareness Instead

Web Summary : Bilaspur train accident left relatives distressed as helpline offered TB awareness instead of accident information. Senior officials avoided providing details, leaving families anxious. DRM intervened, issuing a bulletin on affected trains after Lokmat's intervention.
टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वे