शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

छत्तीसगडच्या अधिकाऱ्याची आत्महत्या प्रशासकीय तणावातून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 00:48 IST

Chhattisgarh official commits suicide मोठ्या पदाची नोकरी अन् उच्चभ्रू नातेवाईकांचा गोतावळा असलेल्या राजेशकुमार श्रीवास्तव यांनी प्रशासकीय तणावामुळेच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे.

ठळक मुद्देअनेक दिवसांपासून होता ताणतणावकीटकनाशकाच्या पुड्या आढळल्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मोठ्या पदाची नोकरी अन् उच्चभ्रू नातेवाईकांचा गोतावळा असलेल्या राजेशकुमार श्रीवास्तव यांनी प्रशासकीय तणावामुळेच आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, आज त्यांचे नातेवाईक नागपुरात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्यांना राजेशकुमार यांचा मृतदेह सोपविला.

छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालक असलेले राजेशकुमार श्रीवास्तव गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड तणावात होते. बिलासपूरहून मनाविरुद्ध रायपूरला बदली झाल्यानंतर त्यांनी कोर्टातही दाद मागितली होती. या घडामोडीपासून ते डिप्रेशनमध्ये गेल्याने कुटुंबीय त्यांना दिलासा देत होते. सध्या छत्तीसगड सरकारचे रायपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशन असल्याने त्यांचे वाहन सरकारी यंत्रणेकडे जमा करण्यात आले होते. त्यामुळे खासगी वाहनानेच ते आपल्या कार्यालयात जात होते. १ मार्चला सकाळी ११ वाजता ते कार्यालयात पोहचले. नंतर ते बेपत्ता झाले. दुपारी १२. ३०पर्यंत ते रायपुरातच होते. नंतर मात्र त्यांचा मोबाईलही बंद असल्यामुळे घरच्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. श्रीवास्तव उच्चपदस्थ अधिकारी असल्याने आणि अचानक ते बेपत्ता झाल्याने पोलीस यंत्रणा त्यांना शोधण्यासाठी कामी लागली. परंतू त्यांचा छडा लागू शकला नाही. अचानक बुधवारी सायंकाळी सीताबर्डी पोलिसांना पूजा लॉजमधून फोन आला. रूम नंबर १०४ मध्ये थांबलेल्या पाहुण्याकडून काही प्रतिसाद मिळत नसल्याचे लॉजमधून सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस पथक तेथे पोहचले. दार तोडून आतमध्ये शिरलेल्या पोलिसांना संबंधित व्यक्ती मृतावस्थेत आढळली. त्यांच्याकडे मोबाईल, दागिने, रोख रक्कम तसेच आधारकार्ड आढळले. लॉजच्या रजिस्टरमध्ये त्यांनी जो मोबाईल नंबर नोंदवला होता, त्यावर पोलिसांनी संपर्क केला असता मृत व्यक्ती राजेशकुमार श्रीवास्तव असून ते छत्तीसगडमधील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचेही स्पष्ट झाले. श्रीवास्तव यांच्या उशीत कीटकनाशकाच्या तीन पुड्या आढळल्या. त्यातील एक रिकामी होती. ती खाऊनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज काढत नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह मेडिकलला रवाना केला.

दरम्यान, गुरुवारी सकाळी श्रीवास्तव यांचे नातेवाईक नागपुरात पोहचले. राजेशकुमार यांचा मुलगा सीए असून लॉ करीत आहे. मुलगी डॉक्टर आहे तर भाऊ चंद्रपुरात वेकोलित उच्चाधिकारी आहे. त्यांचा मेव्हणा उपजिल्हाधिकारी आहे. सुसाईड नोट वगैरे आढळली नसल्याने आत्महत्येचे कारण जाणून घेण्यासाठी सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनिस यांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी प्रशासकीय ताणतणावामुळे ते डिप्रेशनमध्ये होते, असे सांगितले. श्रीवास्तव कुटुंबीय शोकविव्हळ असल्याने पुढे काही विचारणे सांगणे झाले नाही. पोलिसांनी त्यांना राजेशकुमार यांचा मृतदेह सोपविला.

२ मार्चला पोहचले नागपुरात

१ मार्चला दुपारी रायपुरातून बेपत्ता झालेले श्रीवास्तव २ मार्चला सकाळी १० वाजता नागपुरात पोहचले. बुधवारी सकाळी ते लॉजमधून काही वेळेसाठी बाहेर गेले होते. परतल्यानंतर मात्र त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही. नंतर सायंकाळी त्यांचा मृतदेहच लॉज व्यवस्थापक आणि पोलिसांना मिळाला. १ मार्चला बेपत्ता झाल्यापासून तो कीटकनाशक घेण्यापर्यंत श्रीवास्तव यांनी कुणाशी संपर्क केला, त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर