शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने उगवले नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवते व आर्थिक नुकसान हाेते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी धान व साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारभा येथील कार्यक्रमात बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासायची, हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.

कृषी सहायक संदीप देशमुख यांनी उगवणशक्ती तपासण्याची पद्धती समजावून सांगितली. सुती पोते किंवा चौकोनी कापड किंवा वर्तमानपत्र (एकावर एक पाच वर्तमानपत्र) यापैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे पाण्यात भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरुण ठेवावी. त्यावर विशिष्ट पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बिया ठेवून १०-१० रांगा तयार कराव्या. नंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना आतील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गुंडाळलेले पोते/वर्तमानपत्र/सुती कापड सुतळीने बांधावे. तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही, अशा ठिकाणी सावलीत ते ठेवून त्यावर दिवसातून ३-४ वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.

तीन ते चार दिवसांनी उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणे मोड आलेले आहेत, यातील सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे, असेही संदीप देशमुख यांनी सांगितले. यावेळी चक्रधर गभणे, कृषी पर्यवेक्षक एस. सातपुते, रवी राठोड, राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, रमेश बरबटे, शंकर पटिये, जागेश्वर गडे, शंकर गडे यांच्यासह स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

...

पेरणीसाठी किती बियाणे वापरावे?

१०० बियांपैकी किमान ७० बिया सुदृढ व निकाेप उगवल्यास ते बियाणे पेरणीयाेग्य असून, त्याची उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे ग्राह्य धरावे. किमान ७० ते ८० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे पेरणीसाठी प्रति एकर ३० किलाे वापरावे. ही उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रत्येकी एक टक्का उगवणशक्ती कमी याप्रमाणे एकरी अर्धा किलाे बियाणे वाढवावे. अर्थात ६९ टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे एकरी ३०.५ किलाे वापरावे. ६८ टक्के असल्यास ३१ किलाे बियाणे वापरावे. उगवणशक्ती ६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले.