शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने उगवले नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवते व आर्थिक नुकसान हाेते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी धान व साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारभा येथील कार्यक्रमात बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासायची, हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.

कृषी सहायक संदीप देशमुख यांनी उगवणशक्ती तपासण्याची पद्धती समजावून सांगितली. सुती पोते किंवा चौकोनी कापड किंवा वर्तमानपत्र (एकावर एक पाच वर्तमानपत्र) यापैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे पाण्यात भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरुण ठेवावी. त्यावर विशिष्ट पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बिया ठेवून १०-१० रांगा तयार कराव्या. नंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना आतील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गुंडाळलेले पोते/वर्तमानपत्र/सुती कापड सुतळीने बांधावे. तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही, अशा ठिकाणी सावलीत ते ठेवून त्यावर दिवसातून ३-४ वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.

तीन ते चार दिवसांनी उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणे मोड आलेले आहेत, यातील सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे, असेही संदीप देशमुख यांनी सांगितले. यावेळी चक्रधर गभणे, कृषी पर्यवेक्षक एस. सातपुते, रवी राठोड, राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, रमेश बरबटे, शंकर पटिये, जागेश्वर गडे, शंकर गडे यांच्यासह स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

...

पेरणीसाठी किती बियाणे वापरावे?

१०० बियांपैकी किमान ७० बिया सुदृढ व निकाेप उगवल्यास ते बियाणे पेरणीयाेग्य असून, त्याची उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे ग्राह्य धरावे. किमान ७० ते ८० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे पेरणीसाठी प्रति एकर ३० किलाे वापरावे. ही उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रत्येकी एक टक्का उगवणशक्ती कमी याप्रमाणे एकरी अर्धा किलाे बियाणे वाढवावे. अर्थात ६९ टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे एकरी ३०.५ किलाे वापरावे. ६८ टक्के असल्यास ३१ किलाे बियाणे वापरावे. उगवणशक्ती ६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले.