शहरं
Join us  
Trending Stories
1
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
2
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
3
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
4
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
5
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
6
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
7
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
8
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
9
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
10
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
11
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
12
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
13
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
14
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
15
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
16
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
17
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
18
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
19
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
20
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?

पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यात धानाची राेवणी व साेयाबीनची पेरणी माेठ्या प्रमाणात केली जाते. पेरणी केल्यानंतर बियाणे व्यवस्थित व पूर्ण क्षमतेने उगवले नाही तर दुबार पेरणीचे संकट ओढवते व आर्थिक नुकसान हाेते. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी धान व साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बघावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चारभा येथील कार्यक्रमात बियाण्यांची उगवणशक्ती कशी तपासायची, हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले.

कृषी सहायक संदीप देशमुख यांनी उगवणशक्ती तपासण्याची पद्धती समजावून सांगितली. सुती पोते किंवा चौकोनी कापड किंवा वर्तमानपत्र (एकावर एक पाच वर्तमानपत्र) यापैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे पाण्यात भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरुण ठेवावी. त्यावर विशिष्ट पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बिया ठेवून १०-१० रांगा तयार कराव्या. नंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना आतील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. गुंडाळलेले पोते/वर्तमानपत्र/सुती कापड सुतळीने बांधावे. तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही, अशा ठिकाणी सावलीत ते ठेवून त्यावर दिवसातून ३-४ वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.

तीन ते चार दिवसांनी उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणे मोड आलेले आहेत, यातील सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे, असेही संदीप देशमुख यांनी सांगितले. यावेळी चक्रधर गभणे, कृषी पर्यवेक्षक एस. सातपुते, रवी राठोड, राजेंद्र चौधरी, सागर चौधरी, रमेश बरबटे, शंकर पटिये, जागेश्वर गडे, शंकर गडे यांच्यासह स्थानिक व परिसरातील गावांमधील शेतकरी उपस्थित होते.

...

पेरणीसाठी किती बियाणे वापरावे?

१०० बियांपैकी किमान ७० बिया सुदृढ व निकाेप उगवल्यास ते बियाणे पेरणीयाेग्य असून, त्याची उगवणशक्ती ७० टक्के असल्याचे ग्राह्य धरावे. किमान ७० ते ८० टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे पेरणीसाठी प्रति एकर ३० किलाे वापरावे. ही उगवणशक्ती ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास प्रत्येकी एक टक्का उगवणशक्ती कमी याप्रमाणे एकरी अर्धा किलाे बियाणे वाढवावे. अर्थात ६९ टक्के उगवणशक्ती असलेले बियाणे एकरी ३०.५ किलाे वापरावे. ६८ टक्के असल्यास ३१ किलाे बियाणे वापरावे. उगवणशक्ती ६० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्यास ते बियाणे पेरणीसाठी वापरू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे यांनी केले.