शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

सुनील केदार व इतर नऊ आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 8:05 PM

माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतला घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी खोटे दस्तावेज तयार केले असा निष्कर्ष अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी नोंदवला.

ठळक मुद्देआरोपींनी कट रचून केला कोट्यवधी रुपयांचा रोखे घोटाळाआरोपींनी स्वत:ला वाचविण्यासाठी खोटे दस्तावेज खरे भासवले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी अध्यक्ष आमदार सुनील केदार यांनी अन्य १० आरोपींसोबत मिळून आधी कट रचला व त्यानंतर नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा रोखे घोटाळा केला. सर्व आरोपींचा घोटाळा करण्याचा समान उद्देश होता. तसेच, घोटाळा उघडकीस येऊ नये यासाठी आरोपींनी खोटे दस्तावेज तयार केले व ते दस्तावेज खरे आहेत असे भासवून रेकॉर्डवर आणले असा निष्कर्ष अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांनी गुरुवारी आरोपींविरुद्धच्या दोषारोपांवरील सुनावणीनंतर नोंदवला. त्यासोबतच न्यायालयाने केदार यांच्यासह नऊ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ४०९ (शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात), ४६८ (बनावट दस्तावेज तयार करणे), ४७१ (बनावट दस्तावेज खरे भासविणे), १२०-ब (कट रचणे) व ३४ (समान उद्देश) हे दोषारोप निश्चित केले.दोषारोप निश्चित झालेल्या अन्य आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक नामदेव चौधरी, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश दामोदर पेशकर (नागपूर), रोखे दलाल केतन कांतीलाल सेठ, सुबोध चंदादयाल भंडारी, नंदकिशोर शंकरलाल त्रिवेदी (सर्व मुंबई), अमित सीतापती वर्मा (अहमदाबाद), महेंद्र राधेश्याम अग्रवाल व श्रीप्रकाश शांतीलाल पोद्दार (कोलकाता) यांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी रोखे दलाल संजय हरीराम अग्रवाल याच्याविरुद्धच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच, दहाव्या क्रमांकाची आरोपी कानन वसंत मेवावाला फरार आहे. त्यामुळे या दोघांविरुद्ध दोषारोप निश्चित करण्यात आले नाहीत. या खटल्यात एकूण ११ आरोपी आहेत.साक्षीदार तपासण्याचा कार्यक्रम सादर करण्याचे निर्देशया खटल्यात आता आरोपींविरुद्धचे दोषारोप सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाचे साक्षीदार तपासले जातील. सरकार पक्षाने १५० साक्षीदारांची यादी तयार केली आहे. सुरुवातीला त्यापैकी सर्वात महत्त्वाचे साक्षीदार तपासले जातील. त्याचा कार्यक्रम १८ नोव्हेंबर रोजी सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सहायक सरकारी अभियोक्त्यांना दिले. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार या खटल्यावर २ डिसेंबरपासून रोज सुनावणी घ्यायची आहे. खटला निकाली काढण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे.केदार म्हणाले सर्व आरोप खोटेन्यायालयाने निश्चित झालेले दोषारोप सुनील केदार यांना वाचून दाखवले. तसेच, त्यांना दोषारोप मान्य आहेत का अशी विचारणा केली. त्यावर केदार यांनी दोषारोप मान्य नसल्याचे व त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे उत्तर दिले. न्यायालयाने त्यांचे म्हणणे रेकॉर्डवर घेतले. याशिवाय केदार यांनी त्यांना मिळालेल्या दोषारोपपत्राच्या प्रतीसंदर्भात तक्रार केली. दोषारोपपत्राची प्रत अस्पष्ट आहे. ती वाचता येत नाही. तसेच, त्यातील अनेक पाने गहाळ झाली आहेत असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. हा मुद्दा आधीच निकाली काढण्यात आल्यामुळे न्यायालयाने त्यावर काहीच मत व्यक्त केले नाही. त्यानंतर अन्य आरोपींनीही दोषारोप अमान्य केले.वर्ष २००० मध्ये रचला कटआरोपींनी वर्ष २००० मध्ये या घोटाळ्याचा कट रचला होता. १९९९ मध्ये बँकेने ठराव पारित करून मुंबईतील होम ट्रेड लिमिटेडला ४० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. ही कंपनी बँकेची सदस्य नसतानाही तिला २००० मध्ये ही रक्कम अदा करण्यात आली. तेथून घोटाळ्याची पुढील रचना झाली. बँकेच्या पैशाने सरकारी रोखे खरेदी करण्यात आलेल्यापैकी होम ट्रेड ही एकमेव कंपनी प्राधिकृत ब्रोकर होती. इंद्रमणी मर्चंटस् प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद व गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या कंपन्यांना सरकारी रोखे विकण्याचे अधिकार नव्हते अशी माहिती दोषारोपांवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाला देण्यात आली.खटला १७ वर्षापासून प्रलंबितहा खटला १७ वर्षापासून प्रलंबित आहे. ‘सीआयडी’ने आरोपींविरुद्ध २२ नोव्हेंबर २००२ रोजी पहिले दोषारोपपत्र दाखल केले होते. २००१-२००२ मध्ये बँकेच्या रकमेतून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. त्यात गैरव्यवहार करण्यात आला. आता व्याजासह या रकमेचा आकडा १५० कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकरणात २९ एप्रिल २००२ रोजी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती.

खटल्यावर उच्च न्यायालयाचे लक्षया खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ लक्ष ठेवून आहे. उच्च न्यायालयात या घोटाळ्यासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. हा खटला वेगात निकाली निघावा यासाठी उच्च न्यायालयानेच अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी एस. आर. तोतला यांचे विशेष न्यायपीठ स्थापन केले आहे. हे विशेष न्यायपीठ केवळ याच खटल्याचे कामकाज पाहणार आहे.

 

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार