शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागीय बोर्डाचा कारभार प्रभारीवर : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 20:19 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा हंगाम सुरू झाला आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या परीक्षा हाताळण्यासाठी नागपूर विभागीय बोर्डाकडे प्रभारी अधिकाऱ्यांची फौज आहे. त्यामुळे परीक्षेचा आवाका कसा सांभाळणार? असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.

ठळक मुद्देमंडळाच्या सदस्यांची नियुक्ती नाही : कसा सांभाळणार परीक्षाचा व्याप ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेचा हंगाम सुरू झाला आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या परीक्षा हाताळण्यासाठी नागपूर विभागीय बोर्डाकडे प्रभारी अधिकाऱ्यांची फौज आहे. त्यामुळे परीक्षेचा आवाका कसा सांभाळणार? असा सवाल शिक्षण क्षेत्रातून उपस्थित करण्यात येत आहे.नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून दहावी आणि बारावीला लाखो विद्यार्थी परीक्षा देतात. या परीक्षांचे नियोजन बोर्डासाठी एक मोठी कसरतच असते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यापासून त्यांचा निकाल लागेस्तव एक मोठी परिक्रमा विभागाला करावी लागते. परीक्षांच्या काळात ग्रामीण भागात तणावाची स्थिती असते. कॉपीमुक्त अभियानासारखे उपक्रम शासनाकडून राबविले जातात. तंत्रज्ञानामुळे पेपरफुटीचे प्रकार घडत असल्याने त्यावर अंकुश मिळविण्याचे आव्हान बोर्डापुढे आहे. विद्यार्थ्यांचे ओळखपत्र वेळेत पोहचणे, परीक्षेच्या वेळेत पेपर पोहचणे. परीक्षा शांततेत पार पाडणे, संवेदनशील-अतिसंवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष ठेवणे या कसरती करताना एक मोठा मॅनपॉवर बोर्डाला खर्ची घालावा लागतो. परीक्षेचे नियोजन बोर्डासाठी एक टेन्शनच असते.असे असतानाही नागपूर बोर्डाकडे नियमित अध्यक्ष व सचिव नाहीत. २०१३ मध्ये चंद्रमणी बोरकर यांच्यानंतर बोर्डाला कायमस्वरुपी अध्यक्षच मिळाले नाहीत. मध्यंतरी गणोरकर हे अध्यक्ष झालेत. परंतु त्यांच्याकडे अमरावती बोर्डाचाही चार्ज होता. तीन ते चार महिन्यापूर्वी गणोरकर निवृत्त झाले. त्यामुळे बोर्डाच्या अध्यक्षपदाचा प्रभार हा शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांच्याकडे सोपविला. बोर्डात सचिवसुद्धा प्रभारीच आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी सचिवांचा कारभार पाहत आहे.नवीन सरकार आल्यानंतर बोर्डावरील शिक्षण मंडळाचे सदस्य बरखास्त केले. त्यानंतर त्यांची नियुक्तीच शिक्षण विभागाने केली नाही. या मंडळाचे बोर्डाच्या कारभारावर नियंत्रण असायचे. बोर्डाच्या वेगवेगळ्या उपक्रमात मंडळाचे सहकार्य लाभायचे. बोर्डाचा कारभार विस्कळीतएखाद्या शाळेत मुख्याध्यापक नसेल, तर शाळेची जी अवस्था होते, तीच अवस्था सध्या बोर्डाची झाली आहे. दरवर्षी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाºया बोर्डाचा कारभार चालविण्यासाठी जबाबदार अधिकारीच नाही, एवढे मोठे नेटवर्क प्रभारींवर सोपविले आहे. कुटुंबात जबाबदार व्यक्ती नसेल तर कुटुंब विस्कळीत होते, तसेच बोर्डाचे झाले आहे.डॉ. अशोक गव्हाणकर, विज्युक्टा महासचिव विद्यार्थी आॅनलाईन पण बोर्ड आॅफलाईनबोर्डाने गेल्या दोन वर्षापासून विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे अर्ज आॅनलाईन भरून घेतले आहे. परंतु बोर्डच स्वत: आॅफलाईन आहे. बोर्डाची वेबसाईट अपडेट नाही. आजही बोर्डाच्या वेबसाईटवर अध्यक्ष म्हणून चंद्रमणी बोरकर यांचे नाव आहे. अतिरिक्त कारभारामुळे लक्ष देऊ शकत नाहीशिक्षण उपसंचालकाकडे सहाही जिल्ह्याचा कारभार असतो. हजारो शाळा त्यांना सांभाळाव्या लागतात. त्यात बोर्डाचाही प्रभार. परीक्षेचे काम अतिशय संवेदनशील असते. दोन महत्त्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना अधिकारीही कार्यक्षमतेने लक्ष देऊ शकत नाही. त्याचे परिणाम परीक्षा हाताळणाऱ्या यंत्रणेला सोसावे लागतात.डॉ. जयंत जांभूळकर, अध्यक्ष, फुले आंबेडकर टीचर्स असो. (फागा-फाटा)

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा