शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

बदलती पीक पद्धत तणमोरांच्या जीवावर; देशात केवळ २६४ पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 11:24 IST

Nagpur News गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भातील भातशेती ठरू शकते संवर्धक

गोपालकृष्ण मांडवकर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गवताळ भागात राहून कीटकांवर उपजीविका करणारा तणमोर पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असून, तो संकटग्रस्त प्रजातीमध्ये गणला जात आहे. बदलती पीक पद्धती आणि शिकारीमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या देशभरात फक्त २६४ तणमोर उरल्याची नोंद आहे.

धोकाग्रस्त श्रेणीतील तणमोर पक्ष्याची संख्या झपाट्याने घटत आहे. अलीकडेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये लावलेल्या एका कॅमेरा ट्रॅपमध्ये तणमोराची मादी आढळून आली. यामुळे या अभयारण्यात तणमोराचे वास्तव्य असल्याला आधार मिळाला आहे. किमान दोन वर्षे शोध घेऊन अभ्यास केल्यावरच त्याचे अस्तित्व किती, हे सिद्ध होऊ शकणार आहे. नागपुरात सुमारे तीन वर्षांपूर्वी सदरमधील व्हीसीएच्या मैदानावर एक जखमी तणमोर आढळला होता. ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याचाही अभ्यास होऊ शकला नाही.

महाराष्ट्रात याच्या फार कमी नोंदी आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व आंध्र प्रदेशात तो अधिक आढळतो. भारतीय वन्यजीव संस्थेने २०१८ मध्ये केलेल्या अभ्यासात सुमारे २६४ तणमोर पक्षी दिसून आले. राज्यात त्यांचा आकडा चिंताजनक आहे.

अध्ययनच नाही, अडथळे अधिक

तणमोराचे म्हणावे तसे अध्ययनच झालेले नाही. त्यात बरेच अडथळे आहेत. राजस्थानमधील सोंडोपल्ली या गवताळ प्रदेशात तणमोराच्या अध्ययनासाठी एका मादीला कॉलर आयडी लावून काही वर्षांपूर्वी डॉ. बिलाल हबीब यांनी अभ्यासाचा प्रयत्न केला होता. मात्र ती मादी काही अंतर फिरून पुन्हा एकाच ठिकाणी परत येत असल्याने प्रयत्न निष्फळ ठरले. १९८३ मध्ये मध्य प्रदेशातील सैलाना खरमोर अभयारण्य तणमोराच्या संवर्धनासाठी निर्माण करण्यात आले होते. आता ते अभयारण्यच समस्याग्रस्त झाले आहे.

असा असतो तणमोर

पूर्ण वाढ झालेला तणमोर पक्षी फक्त ५१० ते ७४० ग्रॅम वजनाएवढा असतो. नराची लांबी ४५ सेंटीमीटर असून, मादीची ५० सेंटीमीटर असते. प्रजनन काळात मादीला आकृष्ट करण्यासाठी तो पंखांचा आवाज करीत सुमारे पाच फूट उंचापर्यंत उंच उडी घेतो. सहसा हे पक्षी दिसतच नाही. त्यांच्या उडीवरूनच त्यांचे ठिकाण शोधून शिकार केली जाते.

माळरान व पीक पद्धतीमधील बदल घातक

माळरानातील बदल आणि बदललेली पीक पद्धती तणमोरासह अनेक पक्ष्यांसाठी घातक ठरल्याचे मत नागपुरातील पक्षी अभ्यासक तथा सृष्टी पर्यावरण मंडळाचे सचिव विनीत अरोरा यांनी व्यक्त केले आहे. इंग्रज काळात अनेक कुरणांचे रूपांतर कापसाच्या शेतात झाले. रसायनाचा वापर वाढला. पारंपरिक शेतीत पिकांचे वैविध्य होते. पीक पद्धतीत बदल झाल्याने माळरान आणि शेतावर जगणारे अनेक पक्षी संकटात आले व नामशेष झाले. धानाची शेतीही मोडित निघून त्यात अन्य पीक घेणे सुरू झाले. यामुळे पूर्व विदर्भातील धानशेतीमध्ये वाढू पाहणारी तणमोराची संख्या घटली आहे.

जमीन वनविभागाने कुरण विकासासाठी राखीव ठेवलेल्या जमिनीवर कुरण विकासाचे काम केल्यास तणमोराचे संरक्षण होईल, असे मत फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक ॲण्ड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट संस्थेचे संचालक कौस्तुभ पांढरीपांडे यांनीही व्यक्त केले आहे.

...

टॅग्स :wildlifeवन्यजीव