शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

By योगेश पांडे | Updated: May 13, 2025 20:56 IST

BJP Nagpur: शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या कार्यकाळ संपायला अवधी असतानाच भाजपने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

योगेश पांडे, नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूका लक्षात घेता भाजपने नागपूर शहर व नागपूर जिल्ह्यात नेतृत्वबदल केला आहे. शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्या कार्यकाळ संपायला अवधी असतानाच भाजपने माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. तर जिल्हा परिषदेचा किल्ला सर करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात प्रथमच दोन जिल्हयाध्यक्षांचा प्रयोग केला आहे. काटोल आणि रामटेक असे दोन विभाग करून तेथे अनुक्रमे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर कुंभारे आणि माजी सभापती आनंदराव राऊत यांना जिल्हाध्यक्ष केले आहे. भाजपच्या या खेळीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढविल्या गेली होती. मात्र त्यांच्या ऐवजी नवीन चेहऱ्याचा शोध सुरू होता. अनेक तरुण नावांवरदेखील भाजपकडून विचार झाला. मात्र मनपा निवडणूकीत भाजपची नस जाणणारा व शहराची चांगली ओळख असलेल्यालाच शहराध्यक्ष करण्यात यावे असे पक्षनेत्यांचे मत पडले. त्यातूनच तिवारी यांच्या नावावर एकमत झाले.

कोण आहेत दयाशंकर तिवारी?माजी महापौर दयाशंकर तिवारी हे चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते २०२१-२२ या कालावधीत शहराचे महापौरदेखील होते. १९९७ मध्ये ते गांधीबाग वॉर्डाचे नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून गेले. २००२ मध्ये बजेरिया, २०१२ व २०१७ मध्ये गांधीबाग येथून ते नगरसेवक झाले. त्यांनी मनपाचे स्थायी समिती अध्यक्षपद, सत्तापक्षनेते, नासुप्रचे विश्वस्त या जबाबदाऱ्यादेखील पार पाडल्या. पक्ष संघटनेतदेखील कामाचा त्यांना अनुभव आहे. १९८८ ते १९९१ या कालावधीत ते भाजयुमोचे शहराध्यक्ष होते. १९९५ मध्ये भाजपचे शहर मंत्री झाले. २००७ ते २०१० या कालावधीत प्रवक्तादेखील होते. याशिवाय शहरातील क्रीडा संघटना व सामाजिक संघटनांशीदेखील ते जुळले आहेत. उत्तम वक्ता अशी ओळख असलेल्या दयाशंकर तिवारी यांचा तळागाळात ‘कनेक्ट’ आहे. विशेष म्हणजे जुन्या व नव्या कार्यकर्त्यांमध्ये ते सहजतेने वावरतात. त्यामुळेच भाजप नेत्यांनी त्यांच्या नावाला हिरवी झेंडी दाखविली.

ग्रामीणमध्ये भाजपचे मिशन जिल्हा परिषदलोकसभा निवडणूकीत भाजपला रामटेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. विधानसभेत भाजपने पाच जागा जिंकून पराभवाचे उट्टे काढले होते. मात्र जिल्हा परिषदेवर सत्ता आणण्यासाठी पूर्ण जिल्हा पिंजणे आवश्यक आहे. जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता एका व्यक्तीकडून हे शक्य नाही हे लक्षात घेऊनच भाजपने रामटेक व काटोल अशी विभागणी केली आहे. काटोल विभागात मनोहर कुंभारे यांना जिल्हाध्यक्ष बनविण्यात आले आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनिल केदार यांचे एके काळी कट्टर समर्थक असलेले कुंभारे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणूकीत आशीष देशमुख यांच्या प्रचारात कुंभारे सक्रिय होते व केदार यांच्या वर्चस्वाला मोडून काढत भाजपने झेंडा फडकविला होता. जिल्हा परिषदेत याची पुनरावृत्ती व्हावी यासाठीच कुंभारे यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. दुसरीकडे माजी सभापती आनंदराव राऊत यांचा रामटेक व आजुबाजूच्या भागात चांगला कनेक्ट आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत असताना पक्षाने राऊत यांच्यावर विश्वास टाकला.

ग्रामीणमध्ये सहा विधानसभांचे विभाजनभाजपने संघटनात्मक दृष्ट्या नागपूर जिल्ह्याचे काटोल व रामटेक अशा दोन भागांत विभाजन केले आहे. काटोलमध्ये हिंगणा, काटोल व सावनेर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तर रामटेक भागात रामटेक, उमरेड व कामठी या मतदारसंघाचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्र