शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपुरातील सदर उड्डाणपुलावर चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:54 IST

सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.

ठळक मुद्देउपद्रवींकडून पूल बळजबरीने सुरू करण्याचा प्रयत्नपुलाचे काम अजूनही अपूर्ण,अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे होईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.सदर येथील हा नवनिर्मित पूल वाहतूक व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु वाहतुकीसाठी मात्र तो अजूनही तयार नाही. एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम केले जात आहे. मार्किंग, पेंटिंग केली जात आहे. सहा ते सात दिवसात काम पूर्ण होईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. ते शुक्रवारी दुपारी पूल वाहतुकसाठी खुला करण्यासाठी पोहोचले. ते स्वत:ला काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांनी पुलावरील बॅरिकेट हटवून खुला केला. वाहन चालकांना पुलावरून जाण्यास सांगितले. अनेक वाहन चालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुलावर वाहन घेऊन गेले. कुठलीही अप्रिय घटना घडली नाही म्हणून ठीक झाले. एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती. याचा विचारही या उपद्रवींनी केला नाही. यातही या उपद्रवींनी येथे एक बोर्ड लावला. यात एका संस्थेला उड्डाण पुलाच्या बांधकामाचे श्रेय देण्यात आले आहे.पक्षाचा काहीही संबंध नाहीज्या काँग्रेस पक्षाचे नाव घेऊन या उपद्रवींनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मात्र पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यांनी एनएचआयकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. काही टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांनी पक्षाच्या नावावर पूल उघडण्याचा प्रयत्न केला.काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक शक्य नाहीसदर उड्डाण पुलाच्या कामात आठ महिन्याचा उशीर झाला आहे. २ जानेवारी रोजी याचे लोकार्पण होणार होते. परंतु काम अपूर्ण असल्याचे ते शक्य झाले नाही. पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरु केली जाऊ शकत नाही, असे एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर