शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

नागपुरातील सदर उड्डाणपुलावर चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:54 IST

सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.

ठळक मुद्देउपद्रवींकडून पूल बळजबरीने सुरू करण्याचा प्रयत्नपुलाचे काम अजूनही अपूर्ण,अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे होईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.सदर येथील हा नवनिर्मित पूल वाहतूक व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु वाहतुकीसाठी मात्र तो अजूनही तयार नाही. एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम केले जात आहे. मार्किंग, पेंटिंग केली जात आहे. सहा ते सात दिवसात काम पूर्ण होईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. ते शुक्रवारी दुपारी पूल वाहतुकसाठी खुला करण्यासाठी पोहोचले. ते स्वत:ला काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांनी पुलावरील बॅरिकेट हटवून खुला केला. वाहन चालकांना पुलावरून जाण्यास सांगितले. अनेक वाहन चालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुलावर वाहन घेऊन गेले. कुठलीही अप्रिय घटना घडली नाही म्हणून ठीक झाले. एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती. याचा विचारही या उपद्रवींनी केला नाही. यातही या उपद्रवींनी येथे एक बोर्ड लावला. यात एका संस्थेला उड्डाण पुलाच्या बांधकामाचे श्रेय देण्यात आले आहे.पक्षाचा काहीही संबंध नाहीज्या काँग्रेस पक्षाचे नाव घेऊन या उपद्रवींनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मात्र पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यांनी एनएचआयकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. काही टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांनी पक्षाच्या नावावर पूल उघडण्याचा प्रयत्न केला.काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक शक्य नाहीसदर उड्डाण पुलाच्या कामात आठ महिन्याचा उशीर झाला आहे. २ जानेवारी रोजी याचे लोकार्पण होणार होते. परंतु काम अपूर्ण असल्याचे ते शक्य झाले नाही. पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरु केली जाऊ शकत नाही, असे एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर