शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
3
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
4
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
5
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
6
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
7
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
8
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
9
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
10
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
11
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
12
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
13
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
14
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
15
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
16
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
17
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
18
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; दृश्यम पाहून स्वत:च रचला हत्येचा भयंकर कट
19
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
20
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?

नागपुरातील सदर उड्डाणपुलावर चमकोगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 21:54 IST

सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.

ठळक मुद्देउपद्रवींकडून पूल बळजबरीने सुरू करण्याचा प्रयत्नपुलाचे काम अजूनही अपूर्ण,अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमधील उड्डाण पूल पूर्ण झाल्याचे दिसून येत असले तरी अजूनही या पुलाचे काम सुरू आहे. अशा परिस्थितीत पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे होईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. शुक्रवारी काही उपद्रवींनी पूल वाहतुकीसाठी खुला करीत चमकोगिरी केली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन या उपद्रवींना ताब्यात घेतले आणि पूल पुन्हा बंद केला.सदर येथील हा नवनिर्मित पूल वाहतूक व्यवस्थेसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. हा पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु वाहतुकीसाठी मात्र तो अजूनही तयार नाही. एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम केले जात आहे. मार्किंग, पेंटिंग केली जात आहे. सहा ते सात दिवसात काम पूर्ण होईल. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल. परंतु काही उपद्रवींना याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. ते शुक्रवारी दुपारी पूल वाहतुकसाठी खुला करण्यासाठी पोहोचले. ते स्वत:ला काँग्रेसचे कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांनी पुलावरील बॅरिकेट हटवून खुला केला. वाहन चालकांना पुलावरून जाण्यास सांगितले. अनेक वाहन चालकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुलावर वाहन घेऊन गेले. कुठलीही अप्रिय घटना घडली नाही म्हणून ठीक झाले. एखादा अपघात झाला असता तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती. याचा विचारही या उपद्रवींनी केला नाही. यातही या उपद्रवींनी येथे एक बोर्ड लावला. यात एका संस्थेला उड्डाण पुलाच्या बांधकामाचे श्रेय देण्यात आले आहे.पक्षाचा काहीही संबंध नाहीज्या काँग्रेस पक्षाचे नाव घेऊन या उपद्रवींनी पूल सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या पक्षाचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांनी मात्र पक्षाशी त्यांचे काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ही केंद्र सरकारची योजना आहे. त्यांनी एनएचआयकडे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली होती. काही टिंगल टवाळी करणाऱ्या लोकांनी पक्षाच्या नावावर पूल उघडण्याचा प्रयत्न केला.काम पूर्ण झाल्याशिवाय वाहतूक शक्य नाहीसदर उड्डाण पुलाच्या कामात आठ महिन्याचा उशीर झाला आहे. २ जानेवारी रोजी याचे लोकार्पण होणार होते. परंतु काम अपूर्ण असल्याचे ते शक्य झाले नाही. पुलाचे काम पूर्ण झाल्याशिवाय पुलावरून वाहतूक सुरु केली जाऊ शकत नाही, असे एनएचएआयचे महाव्यवस्थापक नरेश वडेट्टवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर