शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
4
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
5
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
6
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
7
सोन्या-चांदीला टक्कर! 'या' मौल्यवान धातूच्या किमतीत ७०% ची मोठी वाढ; दागिन्यातही होतो वापर
8
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
9
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
10
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह उघडले या कंपन्यांचे शेअर्स
11
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
12
"त्याने दुसऱ्या महिन्यातच धोका दिला", अखेर धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्र चहलने सोडलं मौन, म्हणाला- "जर मी चीट केलं असतं..."
13
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
14
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
15
थरार! आरटीओला घाबरुन ट्रक पळवला, धडक झाली अन् २०० सिलेंडरांचा स्फोट झाला!
16
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
17
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
18
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
19
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...

आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 10:38 IST

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

ठळक मुद्देभारतातील श्रीमंत लोकांना आरोग्याच्या जास्त समस्या

नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या जगासोबतच आपल्या देशातदेखील अनेक आजार वाढले आहे. या आजारांना ‘मॉडर्न सिव्हिलायझेशन डिजिज’ किंवा ‘वेल्थ डिजिज’ असेदेखील संबोधल्या जाऊ लागले आहे. भारतात तर श्रीमंत लोकांनाच आरोग्याच्या जास्त समस्या दिसून येत आहेत. अमेरिका, यू.के. सह इतर विकसित देशांमध्ये नेमके उलटे चित्र आहे, असे प्रतिपादन मुंबईतील प्रसिद्ध फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी यांनी केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

देशातील श्रीमंत लोकांना विविध जीवनशैलीच्या आजारांनी ग्रासले आहे. लठ्ठपणा हे या आजारांचे एक प्रमुख कारण आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुशिक्षित लोक अशिक्षित लोकांपेक्षा जास्त लठ्ठ आहेत, शहरवासी हे ग्रामीण लोकांपेक्षा जास्त वजनाचे आहेत व महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त लठ्ठपणा आहे. सुमारे ४० टक्के भारतीयांचे वजन सामान्यहून जास्त आहे, असे ते म्हणाले.

आधुनिक आजार आणि मृत्यूचे आणखी एक प्रमुख कारण वाढते प्रदूषण हे आहे. जगातील १०.३ दशलक्ष मृत्यूंपैकी अडीच दशलक्ष मृत्यू प्रदूषणामुळे होतात. महात्मा गांधींनी १०० वर्षांपूर्वी स्वच्छ हवा आणि पाण्याच्या महत्त्वावर भर दिला होता. शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे उदासीनता, चिंता आणि इतर मानसिक आजार वाढत आहेत. लोकांना क्वचितच आराम मिळतो. एखाद्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जितके आनंदी आहात तितके तुम्ही निरोगी असाल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. समदानी यांनी जीवनशैलीतील आजारांचे महत्त्व सांगण्यासाठी महात्मा गांधींचा ‘शरीराचा वापर कचरापेटी म्हणून करायचा नाही’ हा संदेश दिला.

चांगल्या आरोग्यसाठी जीवनशैलीतील दहा बदल

-दर आठवड्याला २.५ ते ३.५ तास व्यायाम केला पाहिजे. यात वेगवान चालणे, पोहणे किंवा गोल्फ इत्यादींचा समावेश असू शकतो.

-जर तुम्ही एरोबिक्स किंवा वेगवान सायकलिंगसाठी गेलात तर दीड तास पुरेसे असतील.

- दिवसातून दहा हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा.

- संतुलित आहारावर भर हवा. सर्व पोषक घटकांचा समावेश असलेली ‘कलरफुल’ थाळी हवी.

- जेवणात पोळी किंवा भात यापैकी एक पदार्थ खावा, दोन्ही खाणे टाळावे. जर दोसा खायचा असेल तर, रवा दोसा खाण्यावर भर द्यावा.

- दारू आणि तंबाखूपासून दूर रहावे.

- दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

- दिवसातून सहा ते आठ तास झोप व्हायला हवी.

- कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.

- ध्यान, योगासने, हलके संगीत याद्वारे तणाव कमी करण्यावर भर द्यावा.

टॅग्स :SocialसामाजिकLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट