शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 10:38 IST

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

ठळक मुद्देभारतातील श्रीमंत लोकांना आरोग्याच्या जास्त समस्या

नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या जगासोबतच आपल्या देशातदेखील अनेक आजार वाढले आहे. या आजारांना ‘मॉडर्न सिव्हिलायझेशन डिजिज’ किंवा ‘वेल्थ डिजिज’ असेदेखील संबोधल्या जाऊ लागले आहे. भारतात तर श्रीमंत लोकांनाच आरोग्याच्या जास्त समस्या दिसून येत आहेत. अमेरिका, यू.के. सह इतर विकसित देशांमध्ये नेमके उलटे चित्र आहे, असे प्रतिपादन मुंबईतील प्रसिद्ध फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी यांनी केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

देशातील श्रीमंत लोकांना विविध जीवनशैलीच्या आजारांनी ग्रासले आहे. लठ्ठपणा हे या आजारांचे एक प्रमुख कारण आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुशिक्षित लोक अशिक्षित लोकांपेक्षा जास्त लठ्ठ आहेत, शहरवासी हे ग्रामीण लोकांपेक्षा जास्त वजनाचे आहेत व महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त लठ्ठपणा आहे. सुमारे ४० टक्के भारतीयांचे वजन सामान्यहून जास्त आहे, असे ते म्हणाले.

आधुनिक आजार आणि मृत्यूचे आणखी एक प्रमुख कारण वाढते प्रदूषण हे आहे. जगातील १०.३ दशलक्ष मृत्यूंपैकी अडीच दशलक्ष मृत्यू प्रदूषणामुळे होतात. महात्मा गांधींनी १०० वर्षांपूर्वी स्वच्छ हवा आणि पाण्याच्या महत्त्वावर भर दिला होता. शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे उदासीनता, चिंता आणि इतर मानसिक आजार वाढत आहेत. लोकांना क्वचितच आराम मिळतो. एखाद्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जितके आनंदी आहात तितके तुम्ही निरोगी असाल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. समदानी यांनी जीवनशैलीतील आजारांचे महत्त्व सांगण्यासाठी महात्मा गांधींचा ‘शरीराचा वापर कचरापेटी म्हणून करायचा नाही’ हा संदेश दिला.

चांगल्या आरोग्यसाठी जीवनशैलीतील दहा बदल

-दर आठवड्याला २.५ ते ३.५ तास व्यायाम केला पाहिजे. यात वेगवान चालणे, पोहणे किंवा गोल्फ इत्यादींचा समावेश असू शकतो.

-जर तुम्ही एरोबिक्स किंवा वेगवान सायकलिंगसाठी गेलात तर दीड तास पुरेसे असतील.

- दिवसातून दहा हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा.

- संतुलित आहारावर भर हवा. सर्व पोषक घटकांचा समावेश असलेली ‘कलरफुल’ थाळी हवी.

- जेवणात पोळी किंवा भात यापैकी एक पदार्थ खावा, दोन्ही खाणे टाळावे. जर दोसा खायचा असेल तर, रवा दोसा खाण्यावर भर द्यावा.

- दारू आणि तंबाखूपासून दूर रहावे.

- दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

- दिवसातून सहा ते आठ तास झोप व्हायला हवी.

- कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.

- ध्यान, योगासने, हलके संगीत याद्वारे तणाव कमी करण्यावर भर द्यावा.

टॅग्स :SocialसामाजिकLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट