शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आधुनिक जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याचे आव्हान : डॉ. प्रतीत समदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 10:38 IST

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

ठळक मुद्देभारतातील श्रीमंत लोकांना आरोग्याच्या जास्त समस्या

नागपूर : आधुनिक जीवनशैलीमुळे आपल्या जगासोबतच आपल्या देशातदेखील अनेक आजार वाढले आहे. या आजारांना ‘मॉडर्न सिव्हिलायझेशन डिजिज’ किंवा ‘वेल्थ डिजिज’ असेदेखील संबोधल्या जाऊ लागले आहे. भारतात तर श्रीमंत लोकांनाच आरोग्याच्या जास्त समस्या दिसून येत आहेत. अमेरिका, यू.के. सह इतर विकसित देशांमध्ये नेमके उलटे चित्र आहे, असे प्रतिपादन मुंबईतील प्रसिद्ध फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. प्रतीत समदानी यांनी केले. ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स-२०२१’च्या सोहळ्यात त्यांनी ‘जीवनशैली आणि आरोग्यविषयक आजार’ या विषयावर बीजभाषण केले.

देशातील श्रीमंत लोकांना विविध जीवनशैलीच्या आजारांनी ग्रासले आहे. लठ्ठपणा हे या आजारांचे एक प्रमुख कारण आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुशिक्षित लोक अशिक्षित लोकांपेक्षा जास्त लठ्ठ आहेत, शहरवासी हे ग्रामीण लोकांपेक्षा जास्त वजनाचे आहेत व महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त लठ्ठपणा आहे. सुमारे ४० टक्के भारतीयांचे वजन सामान्यहून जास्त आहे, असे ते म्हणाले.

आधुनिक आजार आणि मृत्यूचे आणखी एक प्रमुख कारण वाढते प्रदूषण हे आहे. जगातील १०.३ दशलक्ष मृत्यूंपैकी अडीच दशलक्ष मृत्यू प्रदूषणामुळे होतात. महात्मा गांधींनी १०० वर्षांपूर्वी स्वच्छ हवा आणि पाण्याच्या महत्त्वावर भर दिला होता. शारीरिक स्वास्थ्यासाठी मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे उदासीनता, चिंता आणि इतर मानसिक आजार वाढत आहेत. लोकांना क्वचितच आराम मिळतो. एखाद्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जितके आनंदी आहात तितके तुम्ही निरोगी असाल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. समदानी यांनी जीवनशैलीतील आजारांचे महत्त्व सांगण्यासाठी महात्मा गांधींचा ‘शरीराचा वापर कचरापेटी म्हणून करायचा नाही’ हा संदेश दिला.

चांगल्या आरोग्यसाठी जीवनशैलीतील दहा बदल

-दर आठवड्याला २.५ ते ३.५ तास व्यायाम केला पाहिजे. यात वेगवान चालणे, पोहणे किंवा गोल्फ इत्यादींचा समावेश असू शकतो.

-जर तुम्ही एरोबिक्स किंवा वेगवान सायकलिंगसाठी गेलात तर दीड तास पुरेसे असतील.

- दिवसातून दहा हजार पावले चालण्याचा प्रयत्न करा.

- संतुलित आहारावर भर हवा. सर्व पोषक घटकांचा समावेश असलेली ‘कलरफुल’ थाळी हवी.

- जेवणात पोळी किंवा भात यापैकी एक पदार्थ खावा, दोन्ही खाणे टाळावे. जर दोसा खायचा असेल तर, रवा दोसा खाण्यावर भर द्यावा.

- दारू आणि तंबाखूपासून दूर रहावे.

- दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

- दिवसातून सहा ते आठ तास झोप व्हायला हवी.

- कुटुंब आणि मित्रांसोबतच्या नात्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.

- ध्यान, योगासने, हलके संगीत याद्वारे तणाव कमी करण्यावर भर द्यावा.

टॅग्स :SocialसामाजिकLokmatलोकमतLokmat Eventलोकमत इव्हेंट