शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी मोबाईलच्या प्रकाशात केली शेतीच्या नुकसानीची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 00:50 IST

परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही.

- शरद मिरेभिवापूर - परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील उभ्या धान व कपाशीसह इतर पिकांना अक्षरश: लोळविले. शेतकरी हवालदिल झाला. मदतीसाठी टाहो फोडला. मात्र मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतक-यांनी नुकसानग्रस्त शेतपिकांची आवरासावर (कापणी) केली. आता शेतातील पिके दिसेनासे झाल्यानंतर केंद्र सरकारचे विशेष पथक सोमवारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता तालुक्यात दाखल झाले. अंधारात शेतक-यांच्या बांधावर पोहोचलेल्या या पथकाने मोबाईलच्या टॉर्चमध्ये शेतातील नुकसानीची पाहणी केली. त्यामुळे मोबाईलच्या प्रकाशात या अधिका-यांना नुकसान दिसले कसे, हा प्रश्नच आहे.  कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक आर.पी. सिंग यांच्या मुख्य उपस्थितीत हे पथक सोमवारी  सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भिवापूर येथे दाखल झाले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले आदी अधिकारी उपस्थित होते. संपूर्ण दिवस सोडून सूर्यास्तानंतर आलेल्या या पथकाला भिवापुरातच अंधाराने घेरले. अंधारातच या पथकाने नक्षी शिवारातील ऋषीकेश लोहकरे यांचे शेत गाठले. अन् कशी-बशी नुकसानीची पाहणी केली. यावेळी सायंकाळचे ६.३० वाजल्यामुळे पूर्णत: अंधार पडला होता. दरम्यान शेतातील नुकसान, नुकसानग्रस्त शेतकरी आणि पथकातील अधिका-यांचे चेहरेसुद्धा एकमेकांना दिसत नव्हते. त्यामुळे मोबाईलच्या टॉर्चमध्ये नुकसानीची पाहणी व शेतक-यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम या पथकाने उरकला. धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर यातून कपाशीचे पीक सुटणार असा प्रश्न कदाचित या पथकाला पडला असावा त्यामुळे लगतच्याच प्रवीण गजभिये या शेतक ºयाच्या कपाशीच्या शेतात पाय ठेवत पथकाने पाहणी केली. अंधारामुळे रस्ता कुठे आणि शेत कुठे? खड्यात पाय ठेवत, या पथकाने नुकसानीचा पाहणी कार्यक्रम अर्ध्या तासात उरकला. दाटलेल्या अंधारात या अधिका-यांना खरंच नुकसान दिसले काय? की निवळ कागदपत्र रंगविण्याचे सोपस्कार पार पाडल्या गेले, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.या दौ-यात उपविभागीय अधिकारी हिरामण झिरवाळ, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, उपविभागीय कृषी अधिकारी पी.एम. डाखळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे, सहायक गट विकास अधिकारी रोषनकुमार दुबे, कृषी अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह नगराध्यक्ष किरण नागरीकर, नंदा नारनवरे, बाळू इंगोले, राहुल गुप्ता, संदीप निंबार्ते, विजय वराडे, विठ्ठल राऊत, तुळशीदास चुटे, राजू गारघाटे, रमेश भजभुजे, वसंता ढोणे, कवडू नागरीकर, दिलीप गुप्ता, चंदू पारवे, विकास जवादे, राकेश धोटे, युवराज करणुके, आनंद पुनवटकर, उमेश ढोरे, भक्तदास चुटे, बंडू ढाकुनकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती