शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

केंद्र सरकारकडून कापसावरील आयात शुल्क रद्द, सध्याचे दर स्थिर राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 11:27 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत कापसाच्या सध्याच्या दरावर काहीही परिणाम हाेणार नाही. सध्याचे दर स्थिर राहणार असून, दरवाढीची शक्यता कमी झाली आहे.

ठळक मुद्दे३० सप्टेंबरपर्यंत शून्य आयात शुल्क आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम

सुनील चरपे

नागपूर : कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी (दि. १३) घेतला असून, हा निर्णय येत्या ३० सप्टेंबरपर्यंत लागू असेल. आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असल्याने सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत कापसाच्या सध्याच्या दरावर काहीही परिणाम हाेणार नाही. सध्याचे दर स्थिर राहणार असून, दरवाढीची शक्यता कमी झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कापसाचे (रुई) दर १ डाॅलर ५५ सेंट प्रति पाऊंड म्हणजेच ९२,२६० रुपये प्रति खंडी (३.५६ क्विंटल रुई) तर भारतात रुईचे दर ९३,००० ते ९४ हजार रुपये आहेत. कापसावरील आयात शुल्क शून्यावर आणल्याने आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत कापसाचे दर समांतर आले आहेत. यावर्षी ‘पॅकिंग’ व ‘शिपिंग चार्जेस’ (वाहतूक खर्च) अडीच ते तिप्पट वाढले आहेत. त्यामुळे भारतीय कापड उद्याेजकांना आयात केलेला कापूस देशांतर्गत कापसाच्या तुलनेत महाग पडणार आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कापसाचा वापर व मागणी २.६६ टक्क्यांनी वाढली

लाॅकडाऊननंतर सर्व कापड उद्याेग पूर्णक्षमतेने सुरू आहेत. याच काळात भारतासह जागतिक पातळीवर कापसाचा वापर व मागणी २.६६ टक्क्यांनी वाढली आहे. कापसाचे उत्पादन कमालीचे घटले आहे. त्यामुळे कापूस बाजारातील ही तेजी जागतिक स्तरावर बघायला मिळत आहे. केंद्र सरकारने आयात शुल्क रद्द केला असला तरी शेतकऱ्यांनी कापसाचा ‘पॅनिक सेल’ करू नये, असा सल्ला कापूस बाजार अभ्यासकांनी दिला आहे.

निर्णयामुळे ‘सायकाॅलाॅजिकल प्रेशर’

देशातील कापड उद्याेजक लाॅबीने कापसावरील आयात शुल्क रद्द करण्याची मागणी सुरुवातीपासून रेटून धरली हाेती. त्याअनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. हा निर्णय कापड उद्याेजकांच्या पथ्यावर पडणारा आहे. या निर्णयामुळे बाजारात ‘सायकाॅलाॅजिकल प्रेशर’ तयार हाेणार आहे. त्यामुळे कापसाचे दर पुन्हा १३ हजारी पार करण्याला ‘ब्रेक’ लागला आहे.२४ तासांत २,२६० रुपयांनी वाढजागतिक बाजारात कापसाचे दर बुधवारी १ डाॅलर ५२ सेंट प्रति पाउंड म्हणजेच ९०,४०० रुपये प्रति खंडी हाेते. केंद्र सरकारने हा निर्णय जाहीर करताच गुरुवारी (दि. १४) सायंकाळी हे दर १ डाॅलर ५५ प्रति पाउंड म्हणजेच ९२,२६० रुपये प्रति खंडी झाले. भारत जेव्हा शेतमाल निर्यात करताे तेव्हा दर कमी असताे. सरकारने आयात अनुकूल निर्णय घेताच २४ तासांत दर वाढतात, याचा प्रत्यय याही वेळी आला.

मार्चअखेरीस १३,३०० रुपयांवर पाेहाेचलेले कापसाचे दर सध्या १२,००० ते १२,५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर झाले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र, देशांतर्गत बाजारात कापसाचे दर काेसळणार नाही, असे मत कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने कापड गिरणी मालकांना मदत करण्यासाठी कापसावरील आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने साखरेप्रमाणे कापसाच्या निर्यातीसाठी वाहतूक सबसिडी द्यावी. त्यामुळे जागतिक बाजारात भारत अमेरिकेशी स्पर्धा करू शकेल.

- विजय जावंधिया, शेतकरी संघटना पाईक

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वाढते दर लक्षात घेता, केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशांतर्गत कापसाच्या दरावर काहीही परिणाम होणार नाही. कापसाचे सध्याचे दर जूनपर्यंत टिकून राहतील. जुलैनंतर हेच दर कमी होतील.

- गोविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूसFarmerशेतकरीTaxकर