शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केंद्राच्या अखत्यारितील ३४ टक्के 'क्वॉर्टर्स' रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:55 IST

केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उपराजधानीत अठराशेहून अधिक रहिवासी गाळे (‘क्वॉर्टर्स) आहेत. यातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३४ टक्के गाळे रिकामे आहेत.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी उपराजधानीत अठराशेहून अधिक रहिवासी गाळे (‘क्वॉर्टर्स) आहेत. यातील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ३४ टक्के गाळे रिकामे आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत संपदा संचालनालयाकडे विचारणा केली होती. संचालनालयाच्या अखत्यारित किती शासकीय कार्यालये व रहिवासी गाळे येतात, यातील किती कार्यालये व गाळे रिकामे आहेत, रिक्त असलेल्या एकूण जागेचे क्षेत्रफळ किती आहे व संचालनालयात किती रिक्त पदे आहेत, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार संपदा संचालनालय व सहायक संपदा व्यवस्थापन कार्यालयाअंतर्गत नागपुरात ३ लाख ३२ हजार २९४ चौरस फुटांची जागा कार्यालय व रहिवासी गाळ्यांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. याअंतर्गत १ हजार ८८८ रहिवासी गाळे येतात. यातील १ हजार २३३गाळ्यांचेच वाटप झाले असून ६५५ गाळे रिकामे आहेत. उपलब्ध असलेल्यापैकी एकही कार्यालय रिकामे नाही.दरम्यान, संपदा संचालनालय व सहायक संपदा व्यवस्थापन कार्यालयाअंतर्गत १६ मंजूर पदे आहेत. यातील ४ पदे सद्यस्थितीत रिक्त आहेत.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता